शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

३.७३ लाख कुटुंबांना ‘आरोग्य विमा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:58 IST

प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देआयुष्यमान भारत : महापालिका क्षेत्रात ५४ हजार लाभार्थी, सर्वेक्षणास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ५ लाखांचे आरोग्य विमा कवच या अंतर्गत देण्यात येणार असून, देशात कुठेही आरोग्य उपचार घेता येणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ३.७३ लाख कुटुंब या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.आयुष्यमान भारत आरोग्य योजनेसाठी शहर व ग्रामीण भागातील लाभार्थी ठरविण्यासाठी कुटुंब सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सन २०११ च्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार संपूर्ण जिल्ह्यात ३.७३ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा व शहर आरोग्य यंत्रणेला १५ जूनची 'डेडलाईन' देण्यात आली आहे. सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण घेऊन सात वर्षे झाल्याने या काळात संबंधित कुटुंबाचा आर्थिक स्तर कसा आहे, याची पाहणी व माहिती संकलन या नव्या सर्वेक्षण मोहिमेत केले जाणार आहे. संबंधित कुटुंबांची आर्थिक स्थिती, कुटुंबप्रमुखांचा मोबाईल नंबर, शिधापत्रिका क्रमांक, आधार तसेच कुटुंबातील मागील सात वर्षांतील जन्म-मृत्यू तसेच कुटुंबात पडलेली नव्या सदस्यांची भर आदी मुद्यांची माहिती संकलित केली जात आहे. या योजनेचे जिल्हा समन्वयक इंद्रजित किल्लेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीणमधील २.८३ लाख कुटुंब, तर एक महापालिका व १० नगरपरिषद क्षेत्रातील सुमारे ९०,०३७ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. यात महापालिका क्षेत्रातील ५४ हजार कुटुंबाचे सर्वेक्षणही हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेण्यात आल्या. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या याद्या आरोग्य विभागाकडून ‘डाऊनलोड’ करण्यात आल्या असून त्या याद्या ‘अप टू डेट’ करण्यात येणार आहेत. ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका आणि पारिचारिकांची या सर्वेक्षणासाठी मदत घेण्यात येत आहे. महापालिका स्तरावर १२६ आशा, ४० अधिपरिचारिका (एएनएम), १२ वैद्यकीय अधिकारी व ६ पीएचएनच्या सहाय्याने सर्वेक्षणास प्रारंभ झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलीअशी आहे योजनालाभार्थी कुटुंबाला पाच लाख रूपये विमा संरक्षण मिळणार आहे. सर्वेक्षण पूर्णत्वानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल. एकूण ९७२ आजारांवर नामांकित रुग्णालयात या कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहेत. १०९७ या टोल फ्री क्रमांकावर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाची माहिती संकलन करून आॅनलाईन पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला आधार आयडी देण्यात येणार आहे.आयुष्यमान भारत’ या योजनेसाठी महापालिका स्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात आलेत. २७ मे पासून कुटुंब सर्वेक्षणास सुरूवात झाली. आशा आणि एएनएमला प्रशिक्षित करण्यात आले. शहरातील ५४ हजार लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल.- सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा