शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३७ गावांना अधिग्रहण, टँकरचे पाणी

By admin | Updated: April 15, 2016 00:42 IST

एम़जी़ मोमीन ल्ल जळकोट तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना

टंचाईची तीव्रता वाढली : घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंतीएम़जी़ मोमीन ल्ल जळकोट तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना २० टँकरने तसेच या गावांसह अन्य ३७ गावांना ५१ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ यंदा १९७२ पेक्षा अधिक कठीण परिस्थिती झाली आहे़जळकोट तालुक्यात ४७ गावे आहेत़ जळकोट शहर वगळले तर सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत आहेत़ त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ पाणीटंचाई दूर करण्यासाठी माळहिप्परगा तलावात एक सार्वजनिक विहिर घेऊन तेथून टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश पाणीपुरवठा विभागाला १० मार्चला देण्यात आले होते़ परंतु, अद्यापही त्याचे अंदाजपत्रक तयार झाले नसल्याने ते मंजुरीसाठी पाठविण्यात आले नसल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांनी दिली़ जगळपूर पंचायत समिती गणातील अधिग्रहण करण्यात आलेले जलस्त्रोत आटल्याने तेथे सुरु असलेले टँकर पाण्याअभावी जागवेर उभे आहेत़ तसेच जगळपूर, हावरगा, डोमगाव येथील टँकरलाही पाणी मिळेनासे झाले आहे़ होकर्णा, उमरदरा, शेलदरा, सिंदगी या गावांना नांदेड जिल्ह्यातील नंदनशिवणी तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे़ याशिवाय, तालुक्यातील करंजी, सोनवळा, बेळसांगवी, बोरगाव आदी तांड्यावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे़ तालुक्यातील पशूधन संख्या ५५ हजार आहे़ शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळल्याने कडब्याचे उत्पन्न घटले आहे़ यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अत्यल्प प्रमाणात ज्वारीचा पेरा झाला होता़ त्यामुळे कडब्याची पेंढी २३ रूपयांना विक्री केली जात आहे़ त्यामुळे पशूपालकांना चाऱ्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे़ तसेच तालुक्यात मजूरांची संख्या २५ हजार आहे़ सध्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर गाव सोडून जाण्याची पाळी येऊन ठेपली आहे़ काही मजुरांनी मोठ्या शहरांकडे धाव घेतली आहे़ मजुरांना काम, नागरिकांना पाणी व जनावरांना चारा देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मन्मथ किडे, सरपंच बालाजी आगलावे, बालाजी बारमळे, मारोती पांडे, संतोष तिडके, दत्ता पवार, बाबुराव जाधव, रामराव राठोड, शांताबाई अदावळे, अर्जुन पाटील आदींनी केली आहे़चारा छावण्यांसाठी ; संस्थांचा पुढाकार हवा़़़पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे़ आवश्यक तिथे टँकर मंजूर केले जात आहेत़ पशूधनांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरु करण्याकरिता सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शिवनंदा लंगडापूरे, गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी केले आहे़ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी डॉ़ विकास खरात यांनी सांगितले़दुष्काळामुळे मागेल त्याला काम, आवश्यक तिथे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत़ उदगीर व जळकोट तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तात्काळ परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले़