शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

३७ गावांना अधिग्रहण, टँकरचे पाणी

By admin | Updated: April 15, 2016 00:42 IST

एम़जी़ मोमीन ल्ल जळकोट तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना

टंचाईची तीव्रता वाढली : घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंतीएम़जी़ मोमीन ल्ल जळकोट तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना २० टँकरने तसेच या गावांसह अन्य ३७ गावांना ५१ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ यंदा १९७२ पेक्षा अधिक कठीण परिस्थिती झाली आहे़जळकोट तालुक्यात ४७ गावे आहेत़ जळकोट शहर वगळले तर सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत आहेत़ त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ पाणीटंचाई दूर करण्यासाठी माळहिप्परगा तलावात एक सार्वजनिक विहिर घेऊन तेथून टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश पाणीपुरवठा विभागाला १० मार्चला देण्यात आले होते़ परंतु, अद्यापही त्याचे अंदाजपत्रक तयार झाले नसल्याने ते मंजुरीसाठी पाठविण्यात आले नसल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांनी दिली़ जगळपूर पंचायत समिती गणातील अधिग्रहण करण्यात आलेले जलस्त्रोत आटल्याने तेथे सुरु असलेले टँकर पाण्याअभावी जागवेर उभे आहेत़ तसेच जगळपूर, हावरगा, डोमगाव येथील टँकरलाही पाणी मिळेनासे झाले आहे़ होकर्णा, उमरदरा, शेलदरा, सिंदगी या गावांना नांदेड जिल्ह्यातील नंदनशिवणी तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे़ याशिवाय, तालुक्यातील करंजी, सोनवळा, बेळसांगवी, बोरगाव आदी तांड्यावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे़ तालुक्यातील पशूधन संख्या ५५ हजार आहे़ शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळल्याने कडब्याचे उत्पन्न घटले आहे़ यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अत्यल्प प्रमाणात ज्वारीचा पेरा झाला होता़ त्यामुळे कडब्याची पेंढी २३ रूपयांना विक्री केली जात आहे़ त्यामुळे पशूपालकांना चाऱ्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे़ तसेच तालुक्यात मजूरांची संख्या २५ हजार आहे़ सध्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर गाव सोडून जाण्याची पाळी येऊन ठेपली आहे़ काही मजुरांनी मोठ्या शहरांकडे धाव घेतली आहे़ मजुरांना काम, नागरिकांना पाणी व जनावरांना चारा देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मन्मथ किडे, सरपंच बालाजी आगलावे, बालाजी बारमळे, मारोती पांडे, संतोष तिडके, दत्ता पवार, बाबुराव जाधव, रामराव राठोड, शांताबाई अदावळे, अर्जुन पाटील आदींनी केली आहे़चारा छावण्यांसाठी ; संस्थांचा पुढाकार हवा़़़पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे़ आवश्यक तिथे टँकर मंजूर केले जात आहेत़ पशूधनांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरु करण्याकरिता सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शिवनंदा लंगडापूरे, गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी केले आहे़ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी डॉ़ विकास खरात यांनी सांगितले़दुष्काळामुळे मागेल त्याला काम, आवश्यक तिथे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत़ उदगीर व जळकोट तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तात्काळ परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले़