शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

३७ गावांना अधिग्रहण, टँकरचे पाणी

By admin | Updated: April 15, 2016 00:42 IST

एम़जी़ मोमीन ल्ल जळकोट तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना

टंचाईची तीव्रता वाढली : घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंतीएम़जी़ मोमीन ल्ल जळकोट तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना २० टँकरने तसेच या गावांसह अन्य ३७ गावांना ५१ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ यंदा १९७२ पेक्षा अधिक कठीण परिस्थिती झाली आहे़जळकोट तालुक्यात ४७ गावे आहेत़ जळकोट शहर वगळले तर सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत आहेत़ त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ पाणीटंचाई दूर करण्यासाठी माळहिप्परगा तलावात एक सार्वजनिक विहिर घेऊन तेथून टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश पाणीपुरवठा विभागाला १० मार्चला देण्यात आले होते़ परंतु, अद्यापही त्याचे अंदाजपत्रक तयार झाले नसल्याने ते मंजुरीसाठी पाठविण्यात आले नसल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांनी दिली़ जगळपूर पंचायत समिती गणातील अधिग्रहण करण्यात आलेले जलस्त्रोत आटल्याने तेथे सुरु असलेले टँकर पाण्याअभावी जागवेर उभे आहेत़ तसेच जगळपूर, हावरगा, डोमगाव येथील टँकरलाही पाणी मिळेनासे झाले आहे़ होकर्णा, उमरदरा, शेलदरा, सिंदगी या गावांना नांदेड जिल्ह्यातील नंदनशिवणी तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे़ याशिवाय, तालुक्यातील करंजी, सोनवळा, बेळसांगवी, बोरगाव आदी तांड्यावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे़ तालुक्यातील पशूधन संख्या ५५ हजार आहे़ शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळल्याने कडब्याचे उत्पन्न घटले आहे़ यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अत्यल्प प्रमाणात ज्वारीचा पेरा झाला होता़ त्यामुळे कडब्याची पेंढी २३ रूपयांना विक्री केली जात आहे़ त्यामुळे पशूपालकांना चाऱ्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे़ तसेच तालुक्यात मजूरांची संख्या २५ हजार आहे़ सध्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर गाव सोडून जाण्याची पाळी येऊन ठेपली आहे़ काही मजुरांनी मोठ्या शहरांकडे धाव घेतली आहे़ मजुरांना काम, नागरिकांना पाणी व जनावरांना चारा देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मन्मथ किडे, सरपंच बालाजी आगलावे, बालाजी बारमळे, मारोती पांडे, संतोष तिडके, दत्ता पवार, बाबुराव जाधव, रामराव राठोड, शांताबाई अदावळे, अर्जुन पाटील आदींनी केली आहे़चारा छावण्यांसाठी ; संस्थांचा पुढाकार हवा़़़पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे़ आवश्यक तिथे टँकर मंजूर केले जात आहेत़ पशूधनांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरु करण्याकरिता सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शिवनंदा लंगडापूरे, गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी केले आहे़ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी डॉ़ विकास खरात यांनी सांगितले़दुष्काळामुळे मागेल त्याला काम, आवश्यक तिथे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत़ उदगीर व जळकोट तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तात्काळ परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले़