शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३५ बळी; ३.५२ लाख हेक्टर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 20:04 IST

Amravati News अमरावती विभागात आपत्तीमुळे १ जूनपासून ३५ नागरिकांचा मृत्यू व अतिवृष्टीमुळे ३.५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनदी-नाल्यांच्या पुरामुळे ३२१ गावातील ५,५३२ व्यक्ती स्थलांतरित

अमरावती : विभागात आपत्तीमुळे १ जूनपासून ३५ नागरिकांचा मृत्यू व अतिवृष्टीमुळे ३.५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १३ तालुक्यात ३२१ गावांमधील ३,१६४ कुटुंब व ६,२८० व्यक्ती बाधित झाल्या आहेत. याशिवाय ५,५३२ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचा विभागीय उपायुक्तांचा अहवाल आहे.

आपत्तीमध्ये अमरावती जिल्ह्यात १२, यवतमाळ ९, अकोला ४, वाशिम ४ व बुलडाणा जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात १२ जण आहेत. २८ मृतांच्या वारसांना १.१२ कोटींची मदत देण्यात आली. अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील १० तालुके बाधित झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील २,३०३, यवतमाळ ३,१६१ अशा एकूण ५,५३२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

जुलै महिन्यात वर्षभराच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत ३४८.६ मिमी. सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४८३.३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ही टक्केवारी १३८.८ आहे. पाचही जिल्ह्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. यादरम्यान चार वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. ४ जुलैपासून सुरु झालेली पावसाची रिपरिप अद्याप थांबलेली नसल्याने प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत व नदी - नाल्यांना पूर आल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे.

३.४६ लाख हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान

अतिवृष्टीमुळे ३,४६ लाख हेक्टरमध्ये शेतीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १,३२,२६३ हेक्टर, यवतमाळ १,३४,७३५, अकोला ७२,०३६, वाशिम २१ व बुलडाणा जिल्ह्यात ७,००४ हेक्टर बाधित झालेले आहे. याशिवाय ३,७४५ हेक्टरमध्ये पुरामुळे गाळ साचला आहे तर नदी-नाल्यांना आलेल्या पुरात २,२३१ हेक्टर शेती खरडून गेली आहे.

१९० जनावरे मृत, ७,२२० घरांची पडझड

आपत्तीमध्ये लहान - मोठ्या १९० जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दुधाळ ७३, लहान ६२ व ओढकाम करणारी ७ जनावरे मृत झाली, याशिवाय ३५९ पक्क्या व ६,८६४ कच्च्या अशा एकूण ७,२२० घरांची पडझड झालेली पडझड झाली आहे. ९१ गोठ्यांचेदेखील नुकसान झालेले आहे. पाऊस सुरु असल्यामुळे पंचनाम्याची गती मंदावली आहे.

टॅग्स :floodपूर