शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३५ बळी; ३.५२ लाख हेक्टर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 20:04 IST

Amravati News अमरावती विभागात आपत्तीमुळे १ जूनपासून ३५ नागरिकांचा मृत्यू व अतिवृष्टीमुळे ३.५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनदी-नाल्यांच्या पुरामुळे ३२१ गावातील ५,५३२ व्यक्ती स्थलांतरित

अमरावती : विभागात आपत्तीमुळे १ जूनपासून ३५ नागरिकांचा मृत्यू व अतिवृष्टीमुळे ३.५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १३ तालुक्यात ३२१ गावांमधील ३,१६४ कुटुंब व ६,२८० व्यक्ती बाधित झाल्या आहेत. याशिवाय ५,५३२ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचा विभागीय उपायुक्तांचा अहवाल आहे.

आपत्तीमध्ये अमरावती जिल्ह्यात १२, यवतमाळ ९, अकोला ४, वाशिम ४ व बुलडाणा जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात १२ जण आहेत. २८ मृतांच्या वारसांना १.१२ कोटींची मदत देण्यात आली. अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील १० तालुके बाधित झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील २,३०३, यवतमाळ ३,१६१ अशा एकूण ५,५३२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

जुलै महिन्यात वर्षभराच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत ३४८.६ मिमी. सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४८३.३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ही टक्केवारी १३८.८ आहे. पाचही जिल्ह्यात पावसाची सरासरी पार झालेली आहे. यादरम्यान चार वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. ४ जुलैपासून सुरु झालेली पावसाची रिपरिप अद्याप थांबलेली नसल्याने प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत व नदी - नाल्यांना पूर आल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे.

३.४६ लाख हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान

अतिवृष्टीमुळे ३,४६ लाख हेक्टरमध्ये शेतीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १,३२,२६३ हेक्टर, यवतमाळ १,३४,७३५, अकोला ७२,०३६, वाशिम २१ व बुलडाणा जिल्ह्यात ७,००४ हेक्टर बाधित झालेले आहे. याशिवाय ३,७४५ हेक्टरमध्ये पुरामुळे गाळ साचला आहे तर नदी-नाल्यांना आलेल्या पुरात २,२३१ हेक्टर शेती खरडून गेली आहे.

१९० जनावरे मृत, ७,२२० घरांची पडझड

आपत्तीमध्ये लहान - मोठ्या १९० जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दुधाळ ७३, लहान ६२ व ओढकाम करणारी ७ जनावरे मृत झाली, याशिवाय ३५९ पक्क्या व ६,८६४ कच्च्या अशा एकूण ७,२२० घरांची पडझड झालेली पडझड झाली आहे. ९१ गोठ्यांचेदेखील नुकसान झालेले आहे. पाऊस सुरु असल्यामुळे पंचनाम्याची गती मंदावली आहे.

टॅग्स :floodपूर