शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यात ३५ टक्के गळती

By admin | Updated: July 8, 2014 23:12 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबानगरीला पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करताना ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी ‘पाणी हेच जीवन आहे’,

हजारो लिटर पाण्याची नासाडी : जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्षवैभव बाबरेकर - अमरावतीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबानगरीला पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करताना ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी ‘पाणी हेच जीवन आहे’, असे घोषवाक्य जाहीर करताना पाणी वाचविण्यात खुद्द जीवन प्राधिकरणच अपयशी ठरल्याचे चित्र आहे. मोर्शीजवळील सिंभोरा धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा केला जातो. सुमारे २३ किलोमिटरच्या पाईपलाईनद्वारे हा पाणीपुरवठा अमरावती शहरातील मार्डी मार्गावर जल शुध्दीकरण केंद्रापर्यंत केला जात आहे. त्या ठिकाणी पाणी शुध्दीकरणाची प्रक्रिया पुर्ण होऊन अमरावतीकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. दररोज हजारो लिटर पाणी पाईप लाईनद्वारे ग्रॅव्हीटी पध्दतीने शहरवासियाच्या घरापर्यंत पोहचविले जात आहे. मात्र यातून ३५ टक्के गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईन लिकेज, सार्वजनिक नळ व पाणी चोरीचाही समावेश आहे. महापालिकेकडून सर्वाधिक पाण्याची नासाडीमहापालिकेच्या नावे जीवन प्राधिकरणाकडून नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिकेतंर्गत येणारे कार्यालये, शाळा व सार्वजनिक नळाचा समावेश आहे. यासर्व ठिकाणी अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा सुरु आहे. याकरिता दरमहिन्याला २७.५ लाखांचे देयक महापालिकेकडे थकित आहे. आतापर्यंत थकित देयकांची रक्कम ६१ कोटींपर्यंत पोहोचली आहे. महापालिकेच्या नावे सुमारे १ हजाराच्यावर सार्वजनिक नळजोडणी आहे. त्यातील अनेक ठिकाणी नळाला तोट्या नाहीत. महापालिकेच्या नावे असलेल्या नळ कनेक्शनमधून सर्वाधिक पाण्याची नासाडी होत आहे.