शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

३२६ ग्रामपंचायती 'हायटेक' !

By admin | Updated: July 28, 2015 00:23 IST

केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया योजनेंतर्गत नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) प्रकल्पाद्वारे ३२६ ग्रामपंचायतींची ब्रॉडबँडने जोडणी केली जाणार आहे.

डिजिटल योजना : ‘एनओएफएन’ प्रकल्पाद्वारे ब्रॉडबँडने करणार जोडणीलोकमत विशेष

अमरावती : केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया योजनेंतर्गत नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) प्रकल्पाद्वारे ३२६ ग्रामपंचायतींची ब्रॉडबँडने जोडणी केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती हायटेक होऊन थेट दिल्लीशी जोडल्या जाणार आहेत. केंद्र शासनाने ‘डिजिटल इंडिया’ ही संकल्पना जाहीर केली. यामध्ये भारत संचार निगमची महत्त्वाची भूमिका आहे. केंद्र शासनाच्या संपूर्ण अर्थसाहाय्याने ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे उभारण्यासाठी ‘नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ प्रकल्पाची योजना आखून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात ३२६ ग्रामपंचायतींमध्ये आॅप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून ब्रॉडबँड जोडणी करणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवडक तालुक्यांतील ग्रामपंचायती जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित ग्रामपंचायतीसुद्धा जोडण्यात येणार असून ब्रॉडबँड जोडणीद्वारे पंचायत समिती पुढे जिल्हा परिषदेला तर सर्व जिल्हा परिषदा याच जोडणीने मुंबईला जोडली जाईल. याशिवाय ई-लर्निंग योजनेंतर्गत सर्व ग्रामीण व शहरी शाळा ब्रॉडबँड सेवेद्वारे जोडली जाईल. टपाल कार्यालयेदेखील हायटेक होणार असून बँकिंग क्षेत्रातील सुविधा टपालाच्या माध्यमातून गावपातळीवर दिली जाईल. यासाठी जिल्ह्यातील ३२६ गावांसाठी ७५४ किलोमिटरचे केबल टाकण्यात येणार आहे. यामुळे पंचायतीची माहिती एका क्लिकवर गल्ली ते दिल्लीपर्यंत उपलब्ध होईल. यासाठी तब्बल ७५४ किलोमीटरपर्यंत केबल टाकण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत सर्व ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. येत्या दोन महिन्यांत पहिल्या फेजचे काम पूर्ण होईल. यामुळे ग्रामपंचायतींमध्ये हायटेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. - जे.एन. आभाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.