शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

३२६ ग्रामपंचायती 'हायटेक' !

By admin | Updated: July 28, 2015 00:23 IST

केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया योजनेंतर्गत नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) प्रकल्पाद्वारे ३२६ ग्रामपंचायतींची ब्रॉडबँडने जोडणी केली जाणार आहे.

डिजिटल योजना : ‘एनओएफएन’ प्रकल्पाद्वारे ब्रॉडबँडने करणार जोडणीलोकमत विशेष

अमरावती : केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया योजनेंतर्गत नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) प्रकल्पाद्वारे ३२६ ग्रामपंचायतींची ब्रॉडबँडने जोडणी केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती हायटेक होऊन थेट दिल्लीशी जोडल्या जाणार आहेत. केंद्र शासनाने ‘डिजिटल इंडिया’ ही संकल्पना जाहीर केली. यामध्ये भारत संचार निगमची महत्त्वाची भूमिका आहे. केंद्र शासनाच्या संपूर्ण अर्थसाहाय्याने ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे उभारण्यासाठी ‘नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ प्रकल्पाची योजना आखून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात ३२६ ग्रामपंचायतींमध्ये आॅप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून ब्रॉडबँड जोडणी करणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवडक तालुक्यांतील ग्रामपंचायती जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित ग्रामपंचायतीसुद्धा जोडण्यात येणार असून ब्रॉडबँड जोडणीद्वारे पंचायत समिती पुढे जिल्हा परिषदेला तर सर्व जिल्हा परिषदा याच जोडणीने मुंबईला जोडली जाईल. याशिवाय ई-लर्निंग योजनेंतर्गत सर्व ग्रामीण व शहरी शाळा ब्रॉडबँड सेवेद्वारे जोडली जाईल. टपाल कार्यालयेदेखील हायटेक होणार असून बँकिंग क्षेत्रातील सुविधा टपालाच्या माध्यमातून गावपातळीवर दिली जाईल. यासाठी जिल्ह्यातील ३२६ गावांसाठी ७५४ किलोमिटरचे केबल टाकण्यात येणार आहे. यामुळे पंचायतीची माहिती एका क्लिकवर गल्ली ते दिल्लीपर्यंत उपलब्ध होईल. यासाठी तब्बल ७५४ किलोमीटरपर्यंत केबल टाकण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत सर्व ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. येत्या दोन महिन्यांत पहिल्या फेजचे काम पूर्ण होईल. यामुळे ग्रामपंचायतींमध्ये हायटेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. - जे.एन. आभाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.