शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

अमरावतीतील स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 31 डिसेंबरची 'डेडलाइन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 16:59 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी 31 डिसेंबरची 'डेडलाइन' देण्यात आली आहे.

अमरावती : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी 31 डिसेंबरची 'डेडलाइन' देण्यात आली आहे. 1  नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेतील कामे पूर्ण केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी स्वत: पाहणी करावी तथा त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. एकीकडे राज्यातील संपूर्ण नागरी भाग हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली.

त्याचवेळी शहरांमधील सार्वजनिक, सामुदायिक शौचालयांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्या अनुषंगाने हगणदारीमुक्तीचा दर्जा कायम राखून त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी राज्यातील सर्व शहरांमध्ये १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सामुदायिक, सार्वजनिक शौचालय देखभाल, दुरुस्ती, व्यवस्थापन व सुशोभिकरण मोहीम राबविली जात आहे. महापालिका आयुक्त आणि मुख्याधिका-यांकडे या मोहिमेच्या यशस्वीतेची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यात १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान शहरातील सामुदायिक सार्वजनिक शौचालयांची सद्यस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश होते. करारनामा स्वच्छतागृहांच्या जिओ टॅग छायाचित्रे काढण्याचे निर्देशही होते. ६ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पाहणीत आढळलेल्या स्थितीच्या अनुषंगाने दुरुस्तीसाठी आराखडे व अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर १३ ते २२ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिका-यांनी अंदाजपत्रकास मान्यता देणे बंधनकारक आहे.

२३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान स्वच्छतागृहांच्या आवश्यक दुरुस्ती व व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया केली जाईल. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पात्र कंत्राटदारांना वर्कआॅर्डर देऊन त्यांचेकडून दुरुस्तीचे कामे करून घेण्यात येणार आहेत. सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांची नियमितपणे देखभाल दुरुस्तीसाठी शहरातील महिला बचतगटांना प्राधान्याने विचार करावा, अशा सूचना नगरविकासने दिल्या आहेत. याशिवाय सामुदायिक सार्वजनिक शौचालयांच्या एकूण सिटपैकी किमान एक सिट दिव्यांगांना वापरण्यासाठी त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. 

'पीएम-सीएम'चा फ्लॅगशिप कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या ‘फ्लॅगशिप’ कार्यक्रम आहे. त्यामुळे या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाने प्रादेशिक उपसंचालक, जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी वेळोवेळी तपासणी करावी, अन्यथा संबंधितांविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सामुदायिक व सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापनासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी नागरी स्वराज्य संस्थांची असेल.- सोमनाथ शेटे, नोडल अधिकारी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान