शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून ११ महिन्यांत ३०१ दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:12 IST

अमरावती : २०२० च्या ११ महिन्यांत ३०१ दुचाकी शहर हद्दीतून चोरीला गेल्या. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या किंचित घटली आहे. ...

अमरावती : २०२० च्या ११ महिन्यांत ३०१ दुचाकी शहर हद्दीतून चोरीला गेल्या. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या किंचित घटली आहे. त्यापैकी फक्त ४७ दुचाकी पोलिसांनी रिकव्हर केल्या आहेत. ही आकडेवारी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यानची आहे.

गतवर्षी २०१९ मध्ये ३३७ दुचाकी लंपास करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६७ दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले. ही आकडेवारी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ दरम्यान ११ महिन्यांची आहे.

शहरातून मुख्य चौकातून, हॉस्पिटलजवळून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरल्यानंतर फारच कमी पैशांत चोरटे ती इतरांना विकून मोकळे होत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अलीकडे काही दुचाकीचोर गजाआड केले आहेत.

बॉक्स:

उसने पैसे देण्याच्या नावावर दुचाकींची विक्री

गरीब गरजू लोकांना चोरटे हेरतात. मला पैशांचे खूप काम आहे. तात्पुरते पैसे द्या. जोपर्यंत पैसे परत करीत नाही, तोपर्यंत ही दुचाकी तुमच्याकडेच ठेवा. कागतपत्रे घरी आहेत, आणून देतो, अशी बतावणी करून हजार ते पाच हजारांच्या बदल्यात चोरलेल्या दुचाकी नागरिकांच्या स्वाधीन केल्या जातात. चोरटा पैसे मिळाल्यानंतर पुन्हा कधी येत नाही. ही बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाली. म्हणून तपास करण्यास किंवा चोरलेले दुचाकी रिकव्हर करण्यात विलंब लागतो.

बॉक्स:

काही टोळ्या पकडल्या

यंदा ३०१ दुचाक्या चोरीला गेल्या. त्यापैकी ४७ दुचाकी पोलिसांनी परत मिळविल्या. गुन्हे शाखेने काही आठवड्यांपूर्वी चोरट्यांच्या पाच टोळ्या जेरबंद केल्या. त्यांच्याकडून इतर जिल्ह्यातील चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या. दुचाकीचोरांचे नेटवर्क संपूर्ण विदर्भात फोफावले आहे.

वर्षभरात चोरीला गेलेल्या दुचाकी - ३०१

वर्षभरात दुचाकींचा शोध - ४७

बॉक्स:

तीन वर्षे कारावास

दुचाकीचोरीचा अपराध सिद्ध झाल्यास त्याला भादंविचे कलम ३७९ अन्वये तीन वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. भादंविचे कलम ३८० अन्वये सात वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. यंदा कोरोनामुळे अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. नेमकी किती जणांना शिक्षा झाली, हे कळू शकले नाही.

कोट

शहरातून चोरलेले दुचाकी ही ग्रामीण भागात किंवा वर्धा, वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात विक्री करण्यात येत असल्याची माहिती काही गुन्ह्यांमध्ये निदर्शनास आले. आतापर्यंत पाच दुचाकी चोरणाऱ्या टोळ्या पकडल्या. त्यामध्ये इतर जिल्ह्यातीलसुद्धा दुचाकी रिकव्हर करण्यात आल्या.

आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती