शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विधानसभा निवडणुकीसाठी वाढले ३० हजार मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 11:03 IST

Amravati : मतदारयादीत आपल्या नावाची खात्री करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदारयादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पश्चात २९,८४४ मतदारांची भर पडली आहे. मतदारांनी यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी, काही दुरुस्ती असल्यास G संबंधित नमुना अर्ज भरून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केले.

आयोगाच्या निर्देशानुसार ६ ऑगस्टला सर्व मतदान केंद्र, सर्व तहसील कार्यालये तथा उपविभागीय अधिकारी कार्यालये येथे मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमात ज्यांचे मतदारयादीत नाव नाही तसेच ज्यांचे वय १ जुलै २०२४ला १८ वर्षे पूर्ण झाले आहे. अशा सर्व मतदारांची नोंदणी करता येणार आहे. याशिवाय मतदारांची नावे या केंद्रातून दुसऱ्या केंद्रात स्थलांतरित करता येणार आहेत. मृत मतदारांचे नाव कमी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली लोकसभा निवडणुकीदरम्यान यादीत नाव नसल्याबाबत काही मतदारांच्या तक्रारी प्राप्त होत्या. या सर्व मतदारांनी आपल्या नावाची खातरजमा करावी व नाव नसल्यास नमुना ६ अर्ज जवळच्या मतदान केंद्रावरील बीएलओ यांना रहिवासी व वयाचा पुराव्यासह द्यावा. तसेच VHA (Voter Help Line App) किंवा voter.eci.gov.in या पोर्टलवर ऑनलाइनसुद्धा नोंदणी करता येते. अंतिम मतदारयादी ३० ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

नवीन १८ मतदान केंद्रांची निर्मितीजिल्ह्यात २,६८२ मतदान केंद्र आहेत. यामध्ये १८ नवीन केंद्रांची निर्मिती करण्यात आलीआहे. शिवाय ७१ ठिकाणी एका केंद्राचे मतदार दुसऱ्या केंद्राला जोडले आहेत. ५९ ठिकाणी एका मतदार केंद्रामधून त्याच इमारतीमधून दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. १० मतदान केंद्रांच्या नावामध्ये बदल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या मतदान केंद्रांमध्ये सर्व आवश्यक सुविधा करण्याचे निर्देश दिले आहे.

२० ऑगस्टपर्यंत नावनोंदणी, नावात दुरुस्तीमतदारयादीमध्ये नव्याने नाव नोंदणी, काही बदल असल्यास दुरुस्ती, नाव स्थलांतरित करणे, याबाबतची प्रक्रिया २० ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. या कालावधीत १० व ११ तसेच १७ व १८ ऑगस्ट रोजी विशेष मोहीम आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर सर्व बीएलओ उपस्थित राहतील, अनुपस्थित राहिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. 

टॅग्स :AmravatiअमरावतीVotingमतदानvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024