शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

दुसऱ्या महायुद्धातील सैनिक, विधवा पत्नीच्या मानधनात वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 15:18 IST

दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या आणि डिसेंबर १९४९ पर्यंत व त्यानंतर पदमुक्त झालेल्या राज्यातील माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विधवांना सामान्य प्रशासनाकडून मिळणाऱ्या तीन हजार रुपये दरमहा मानधनात घसघशीत वाढ करून ती सहा हजार रुपये करण्यात आली आहे.

चेतन घोगरे 

अमरावती - दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या आणि डिसेंबर १९४९ पर्यंत व त्यानंतर पदमुक्त झालेल्या राज्यातील माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विधवांना सामान्य प्रशासनाकडून मिळणाऱ्या तीन हजार रुपये दरमहा मानधनात घसघशीत वाढ करून ती सहा हजार रुपये करण्यात आली आहे.

राज्यातील दुसऱ्या महायुद्धात लढलेले माजी सैनिक, वीरगतीला प्राप्त सैनिकांच्या विधवांना सर्वप्रथम ऑक्टोबर १९८९ ला सामान्य प्रशासन विभागाकडून ३०० रुपये निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आले होते. १ मे २०११ पासून दरमहा तीन हजार रुपये देण्यास सुरुवात करण्याचा सामान्य प्रशासनाने निर्णय घेतला. ही रक्कम सध्याच्या घडीला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तोकडी पडत असल्याचे लक्षात घेऊन १ एप्रिल २०१८ पासून दरमहा सहा हजार इतके अर्थसाहाय्य करण्याची मान्यता दिली होती. त्यानंतर दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेले माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विधवा पत्नी यांना दरमहा सहा हजारांचे अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. त्यासाठी येणारा खर्च क्रमांक ए-५ लेखाशिर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ६० - इतर सामाजिक व कल्याण कार्यक्रम १०२, सामाजिक सुरक्षा योजनेखाली निवृत्तीवेतन, राज्यात आदिवासी असलेल्या, दुसऱ्या जागतिक महायुद्धातील सैनिक व त्यांच्या निवृत्तीवेतन लेखाशीर्षाखाली मंजुरी अनुदानातून भागविण्यात येणार आहे.

वेळोवेळी खातरजमा करण्याचे आदेश 

दुसऱ्या महायुद्धात योगदान देणारे माजी सैनिक, विधवा पत्नींना अर्थसहाय्य वितरण करताना लाभार्थी जिवंत आहे किंवा नाही, याची जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी सैनिक कल्याण विभाग (पुणे) येथील संचालकांच्या मदतीने पडताळणी तसेच त्याबाबतची खातरजमा करावी, असे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात नमूद आहे.

अमरावती जिल्ह्यात १४२ वीरपत्नी

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाइट लेफ्टनंट (नि.) रत्नाकर चरडे यांच्याशी संपर्क केला असता, जिल्ह्यात दुसऱ्या महायुद्धात लढलेले तीन माजी सैनिक व १४२ वीरपत्नी हयात असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून दरमहा सहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :warयुद्धAmravatiअमरावती