शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

हिंसाचाराच्या तक्रारींचा ओघ अटकेतील आरोपी 278 पार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

शहरातील  विविध ठिकाणी १३ नोव्हेंबर रोजी उफाळलेल्या हिंसाचार, दगडफेक, नासधूस, लूटपाट व प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजीदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते रात्रीपर्यंत झालेल्या अनेक घटनांमध्ये १७ नोव्हेंबर रोजी शहर कोतवाली, नागपुरी गेट, खोलापूरी गेट, गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शुक्रवार, शनिवारी शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचा ओघ सुरूच असून, विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची संख्या ५० वर पोहोचली आहे. तब्बल १६ हजार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरूवारी सायंकाळपर्यंत अटक आरोपींची संख्या २७८ पार पोहोचली आहे. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले. शहरातील  विविध ठिकाणी १३ नोव्हेंबर रोजी उफाळलेल्या हिंसाचार, दगडफेक, नासधूस, लूटपाट व प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजीदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते रात्रीपर्यंत झालेल्या अनेक घटनांमध्ये १७ नोव्हेंबर रोजी शहर कोतवाली, नागपुरी गेट, खोलापूरी गेट, गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या कालावधीत संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जातीय सलोखा बळकट करण्याच्या हेतूने शहरातील संवदेनशील भागात पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपीद्वय विक्रम साळी व एम.एम. मकानदार, सहायक आयुक्त भारत गायकवाड व पूनम पाटील ही मंडळी अहोरात्र कॉर्नर मीटिंग घेऊन एकात्मतेचा जागर करीत आहेत.

प्रक्षोभक वक्तव्यापोटी गुन्हे शहर कोतवाली पोलिसांनी आमदार प्रवीण पोटे, भाजपचे महापालिकेतील गटनेता तुषार भारतीय, माजी मंत्री अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, माजी मंत्री जगदीश गुप्ता व अन्य ५० ते ६० जणांविरुद्ध भादंविचे कलम २९५ अ, १५३, १५३ ब, ५०५ अ, ब, २९८ अन्वये गुन्हे दाखल केले. आमदार प्रवीण पोटे, तुषार भारतीय, एक महिला, शिवराय कुळकर्णी, अनिल बोंडे यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी स्वतंत्र असा कलम १४३, १४७, १४८, , १४९, ३५३, ३३३, ३३६, १०७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. शासकीय कामकाजात अडथळा, जिवे मारण्याच्या हेतूने हल्ल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर ठेवण्यात आला. ठाणेदार नीलिमा आरज यांनी प्रसारित ध्वनीचित्रफितीच्या आधारे ते गुन्हे दाखल केले.

याप्रकरणी आतापर्यंत २५० पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली. जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी, बळकट करण्यासाठी संवेदनशील भागात मोहल्ला कमिटीच्या कॉर्नर मीटिंग घेतल्या जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. शहर शांततेकडे वाटचाल करीत आहे. - डॉ. आरती सिंहपोलीस आयुक्त

 

टॅग्स :Policeपोलिस