शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

दीड महिन्यात विदर्भात नैसर्गिक आपत्तीचे २५ बळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 18:31 IST

२३४ गावे बाधित : ४,५०८ नागरिक विस्थापित, ३,७२५ हेक्टर जमीन खरडली

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १६ जुलैपर्यंत नेसर्गिक आपत्तीमुळे विभागातील २५ नागरिकांचा बळी गेला. यामध्ये २४ नागरिक जखमी झालेत. संततधार पावसाने २३४ गावे बाधित झालीत, तर १,५१३ कुटुंबांतील ४,५०८ नागरिक बेघर झाले आहेत. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ३,७३५ हेक्टर शेतजमीन खरडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. विभागात १ जून ते १७ जुलै या कालावधीत बुलडाणा वगळता अमरावती, यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केली. सरासरीच्या १३० टक्के पाऊस अधिक झाला. यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे १६ जण वाहून गेले, तर वीज पडल्याने ९ असे एकूण २५ नागरिकांचा बळी गेला. या कालावधीत संततधार पावसामुळे २३४ गावांत १,५१३ कुटुंबांतील ४,५०८ व्यक्ती बाधित झाल्यात. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १३९ कुटुंबांतील १३९, अकोला जिल्ह्यात ३५ कुटुंबातील २,७७६, व यवतमाळ जिल्ह्यात ६८० कुटुंबातील १,५९३ व्यक्ती बाधित झाल्यात. या दीड महिन्याच्या कालावधीत २५ नागरिकांचा बळी गेला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७, अकोला १, यवतमाळ ९, बुलडाणा ३, व वाशिम जिल्ह्यात ५ व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १३, अकोला जिल्ह्यातील ६, व अमरावती जिल्ह्यातील ५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या कालावधीत नदीनाल्यांना पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ३,७२५ हेक्टरमधील शेतजमिन खरडल्या गेली, तर अकोला जिल्ह्यात २९४, यवतमाळ २८ व वाशिम जिल्ह्यातील २१ हेक्टर जमिनीतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. महसूल व कृषी विभागाद्वारा बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मृताच्या वारसांना ६० लाखांची मदतया आपत्तीमध्ये २५ नागरिकांचा बळी गेला यामध्ये १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, या प्रकरणात ६० लाखांची मदत देण्यात आली. यामध्ये ७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या आपत्तीमध्ये मोठी दुधाळ २४ जनावरे मृत झाली. यापैकी १३ प्रकरणांत ३.४८ लाखांची मदत देण्यात आली. ४६ लहान दुधाळ जनावरे मृत झाली यापैकी १५ प्रकरणांत ४५ हजारांची मदत देण्यात आली. ओढकाम करणारी २९ जनावरे दगावली. यामध्ये २० प्रकरणांत ४.७६ लाखांची मदत देण्यात आली.

आपत्तीमध्ये १,८१६ घरांची पडझडया दीड महिन्याच्या कालावधीत ५२ घरांची पूर्ण, २९ घरांची अंशत:, १८१६ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. ७५ झोपड्या, तर २७ गोठ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. आतापर्यंत ५१ हजारांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. आपत्तीमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे ११ व्यक्ती, अंगावर वीज पडल्याने ९ व आपत्तीच्या इतर कारणांमुळे ५ व्यक्ती अस्या एकूण २५ नागरिकांचा बळी गेला आहे.