शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात विदर्भात नैसर्गिक आपत्तीचे २५ बळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 18:31 IST

२३४ गावे बाधित : ४,५०८ नागरिक विस्थापित, ३,७२५ हेक्टर जमीन खरडली

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १६ जुलैपर्यंत नेसर्गिक आपत्तीमुळे विभागातील २५ नागरिकांचा बळी गेला. यामध्ये २४ नागरिक जखमी झालेत. संततधार पावसाने २३४ गावे बाधित झालीत, तर १,५१३ कुटुंबांतील ४,५०८ नागरिक बेघर झाले आहेत. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ३,७३५ हेक्टर शेतजमीन खरडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. विभागात १ जून ते १७ जुलै या कालावधीत बुलडाणा वगळता अमरावती, यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केली. सरासरीच्या १३० टक्के पाऊस अधिक झाला. यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे १६ जण वाहून गेले, तर वीज पडल्याने ९ असे एकूण २५ नागरिकांचा बळी गेला. या कालावधीत संततधार पावसामुळे २३४ गावांत १,५१३ कुटुंबांतील ४,५०८ व्यक्ती बाधित झाल्यात. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १३९ कुटुंबांतील १३९, अकोला जिल्ह्यात ३५ कुटुंबातील २,७७६, व यवतमाळ जिल्ह्यात ६८० कुटुंबातील १,५९३ व्यक्ती बाधित झाल्यात. या दीड महिन्याच्या कालावधीत २५ नागरिकांचा बळी गेला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७, अकोला १, यवतमाळ ९, बुलडाणा ३, व वाशिम जिल्ह्यात ५ व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १३, अकोला जिल्ह्यातील ६, व अमरावती जिल्ह्यातील ५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या कालावधीत नदीनाल्यांना पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ३,७२५ हेक्टरमधील शेतजमिन खरडल्या गेली, तर अकोला जिल्ह्यात २९४, यवतमाळ २८ व वाशिम जिल्ह्यातील २१ हेक्टर जमिनीतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. महसूल व कृषी विभागाद्वारा बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मृताच्या वारसांना ६० लाखांची मदतया आपत्तीमध्ये २५ नागरिकांचा बळी गेला यामध्ये १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, या प्रकरणात ६० लाखांची मदत देण्यात आली. यामध्ये ७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या आपत्तीमध्ये मोठी दुधाळ २४ जनावरे मृत झाली. यापैकी १३ प्रकरणांत ३.४८ लाखांची मदत देण्यात आली. ४६ लहान दुधाळ जनावरे मृत झाली यापैकी १५ प्रकरणांत ४५ हजारांची मदत देण्यात आली. ओढकाम करणारी २९ जनावरे दगावली. यामध्ये २० प्रकरणांत ४.७६ लाखांची मदत देण्यात आली.

आपत्तीमध्ये १,८१६ घरांची पडझडया दीड महिन्याच्या कालावधीत ५२ घरांची पूर्ण, २९ घरांची अंशत:, १८१६ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. ७५ झोपड्या, तर २७ गोठ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. आतापर्यंत ५१ हजारांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. आपत्तीमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे ११ व्यक्ती, अंगावर वीज पडल्याने ९ व आपत्तीच्या इतर कारणांमुळे ५ व्यक्ती अस्या एकूण २५ नागरिकांचा बळी गेला आहे.