शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांमध्ये २४९ आंतरजातीय विवाह

By admin | Updated: July 23, 2015 00:14 IST

समाजातील जातीयतेला काही प्रमाणात अंकुश लागावा, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची शासनाची योजना आहे.

प्रोत्साहन : दाम्पत्यांना शासनाद्वारे देण्यात आले अनुदानअमरावती : समाजातील जातीयतेला काही प्रमाणात अंकुश लागावा, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची शासनाची योजना आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना या योजनेंतर्गत ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात मागील दोन वर्षात २४९ जोडप्यांची आंतरजातीय विवाह केले आहे. शासनाच्या योजनेनुसार त्यांना १ कोटी रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात ११० आंतरजातीय जोडप्याने अनुदानासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. समाजात सवर्ण आणि मागासवर्गीय असा भेदाभेद असल्याने शासनाद्वारे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी अनुदानाची योजना सुरू करण्यात आली. जातीय भेदाभेद नष्ट करण्यासाठी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे दरवर्षी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन योजनेला लाभ देण्यात येतो. जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना १५ हजार रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येत होते. यामध्ये दोन वर्षांपासून वाढ करण्यात आली आहे. आता ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली आहे. समाजातील जातीभेदाचा प्रकार नष्ट व्हावा, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार मागील वर्षी जिल्हा परिषदेने अनुदानासाठी २४९ जोडप्यांचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानुसार आंतरजातीय विवाहित जोडप्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी अनुदानासाठी त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करायला हवे. योजनेपासून कोणतेही दाम्पत्य वंचित राहू नये, असा प्रयत्न आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाह केलेल्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा. -भाऊराव चव्हाण, समाज कल्याण अधिकारी