शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

दोन वर्षांमध्ये २४९ आंतरजातीय विवाह

By admin | Updated: July 23, 2015 00:14 IST

समाजातील जातीयतेला काही प्रमाणात अंकुश लागावा, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची शासनाची योजना आहे.

प्रोत्साहन : दाम्पत्यांना शासनाद्वारे देण्यात आले अनुदानअमरावती : समाजातील जातीयतेला काही प्रमाणात अंकुश लागावा, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची शासनाची योजना आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना या योजनेंतर्गत ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात मागील दोन वर्षात २४९ जोडप्यांची आंतरजातीय विवाह केले आहे. शासनाच्या योजनेनुसार त्यांना १ कोटी रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात ११० आंतरजातीय जोडप्याने अनुदानासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. समाजात सवर्ण आणि मागासवर्गीय असा भेदाभेद असल्याने शासनाद्वारे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी अनुदानाची योजना सुरू करण्यात आली. जातीय भेदाभेद नष्ट करण्यासाठी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे दरवर्षी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन योजनेला लाभ देण्यात येतो. जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना १५ हजार रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येत होते. यामध्ये दोन वर्षांपासून वाढ करण्यात आली आहे. आता ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली आहे. समाजातील जातीभेदाचा प्रकार नष्ट व्हावा, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार मागील वर्षी जिल्हा परिषदेने अनुदानासाठी २४९ जोडप्यांचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानुसार आंतरजातीय विवाहित जोडप्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी अनुदानासाठी त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करायला हवे. योजनेपासून कोणतेही दाम्पत्य वंचित राहू नये, असा प्रयत्न आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाह केलेल्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा. -भाऊराव चव्हाण, समाज कल्याण अधिकारी