शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात वर्षभरात २४ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 12:14 IST

Amravati News agriculture सततची नापिकी व कर्जामुळे २०२० या वर्षात १४ नोव्हेंबरपर्यंत दर्यापूर तालुक्‍यातील २४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्दे१९ शासकीय मदतीसाठी पात्र, १४ कुटुंबांना मदत

सचिन मानकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती: सततची नापिकी व कर्जामुळे २०२० या वर्षात १४ नोव्हेंबरपर्यंत दर्यापूर तालुक्‍यातील २४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. यापैकी १९ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत, तर पाच जणांची आत्महत्या विविध कारणांनी मदतीस अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.

सततची नापिकी, अस्मानी व सुलतानी संकट, बँका, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या चिंतेतून दर्यापूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली. काहींनी गळफास घेतला, तर काहींनी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. दर्यापूर तालुका खारपाणपट्ट्यात असल्यामुळे येथील शेतकरी पिकांच्या उत्पादनासाठी पावसावरच अवलंबून असतात. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्य पीक असलेले मूग, सोयाबीन, उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दुसरीकडे घरी आलेल्या मालाला भाव नसल्याने व शासनाने कर्जमाफीचा आव आणून फसवणूक केल्याचा रोष तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

या गावांत झाल्या आत्महत्या

तालुक्यातील सांगवा बुद्रुक, येवदा, लेहेगाव, पिंपळोद, सासन, रामामपूर, जैनपूर, कुकसा, लासूर, भुईखेडा, गणेशपूर, गौरखेडा, शिंगणवाडी, उमरी ममदाबाद, थिलोरी, सुकळी, कांडली, लोतवाडा, वडनेरगंगाई, अंतरगाव, पिंपळोद या गावांमध्ये शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

शासनाने ठरविले अपात्र...

अंतरगाव येथील देवराव दादाराव घुगे , वडनेरगंगाई येथील नानीबाई दिवाकर गोंडवर, पिंपळोद येथील रामा हरिभाऊ गावंडे, वडनेरगंगाई येथील अजय जीवन वानखडे व आम्रपाली दादाराव लोणारे (रा. सांगवा खुर्द) यांची आत्महत्याप्रकरणे शासनाने अपात्र ठरविली आहेत. काही कर्ज नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आली, तर सांगवा खुर्द येथील मुलगी अल्पवयीन व आजारामुळे आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिला मदतीस अपात्र ठरविण्यात आले.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे बँकेचे थकीत कर्ज असल्यास त्यांच्या कुटुंबाला शासनाचा लाभ देण्यात आला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीवर कर्ज नाही किंवा कुटुंबाच्या नावे शेतीवर कर्ज नाही, अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात समितीने चौकशी केली. जे निकषात बसतील, त्यांना मदत दिली जाईल.

- योगेश देशमुख, तहसीलदार, दर्यापूर

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या