शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

जिल्ह्यांत १२ तासात धावल्या २३ बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST

महामंडळाची जीवनवाहिनी ‘लाल परी’ शुक्रवारी सामान्य प्रवाशांकरिता उपलब्ध होताच, शहरातील मुख्य बाजारपेठेत ये-जा करण्याची सोय झाल्याने ग्रामीण प्रवाशांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले होते. शुक्रवारी सहा आगारांतून २३ बसने ७४ फेºया केल्या. त्यामधून एकूण १२४ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. प्रत्येक बसमधून अवघ्या दोन ते पाच प्रवाशांनी प्रवास केला.

ठळक मुद्देप्रवाशांचा अल्प प्रतिसाद : अमरावती ‘रेड झोन’मधून प्रवास नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाने दोन महिन्यांनंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजतापासून सामान्य नागरिकांकरिता बससेवा सुरू केली. जिल्ह्यातील सहा आगारांतून दिवसभराकरिता ६१ बसचे नियोजन केले होते. मात्र, १२ तासांत केवळ २३ बस धावल्या. बस स्थानकावर फारशी गर्दी नव्हती. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद होता. बसचे चालक-वाहक व प्रवाशांनी मास्क लावले तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आला.महामंडळाची जीवनवाहिनी ‘लाल परी’ शुक्रवारी सामान्य प्रवाशांकरिता उपलब्ध होताच, शहरातील मुख्य बाजारपेठेत ये-जा करण्याची सोय झाल्याने ग्रामीण प्रवाशांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले होते. शुक्रवारी सहा आगारांतून २३ बसने ७४ फेºया केल्या. त्यामधून एकूण १२४ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. प्रत्येक बसमधून अवघ्या दोन ते पाच प्रवाशांनी प्रवास केला. बस आगारातून इतर ठिकाणी सुटण्यापूर्वी तिचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना एन्ट्री होती. अमरावती महापालिकेचा रेड झोन क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील इतर सहा आगारांतून शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बससेवा सुरू होती.वाहक-चालकांना सॅनिटायझर व मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. ६५ वर्षांवरील वृद्ध व १० वर्षांखालील मुलांच्या प्रवासाला महामंडळाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंध घातला आहे. मात्र, अत्यावश्यक वैद्यकीय कारणास्तव प्रवास करता येणार आहे.४७ एसटी बस ९९५ मजूर पोहोचविलेलॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यांतील कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील कामगारांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी मागील १२ दिवसांत ४७ एसटी बस धावल्या. या बसमधून ९९५ प्रवाशांना मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूपपणे सोडण्यात आले. पायी जाणाºया मजुरांना ‘लाल परी’ने दिलेल्या सेवेमुळे मजुरांना कुटुंबीयांसह आपल्या राज्यात जाणे सोयीचे झाले. अमरावती विभागातून मध्यवर्ती बस स्थानक, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे या एसटी आगारांमधून ५ ते २० मे दरम्यान राज्य परिवहन महामंडळाकडून ४७ बस सोडण्यात आल्याचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :state transportएसटी