शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील पारंपरिक गोटमार यात्रेत २२६ जखमी

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: September 10, 2018 20:32 IST

श्रद्धेचे प्रतीक : ७१ वर्षांत १२ जणांचा मृत्यू, हजारोंना अपंगत्व, अनेकांचे संसार उघड्यावर, प्रशासन हतबल  

संजय खासबागे

वरुड (अमरावती) : येथून ३५ किमी अंतरावरावरील मध्यप्रदेशातील जांब नदीपात्रात पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला जांब नदीपात्रात पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत परंपरेनुसार गोटमार यात्रा भरली. यामध्ये एकमेकांवर केलेल्या गोटमारीत २२६ जण जखमी झालेत. 

मध्यप्रदेश प्रशासनाने गोटमार यात्रा बंद करण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. यावर्षीसुध्दा पोळयाच्या करीला विधिवत पळसाचे झाड लावून पूजाअर्चा झाल्यांनतर गोटमार यात्रा सुरू झाली. यात जे ४०० जण जखमी झालेत ते श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. या प्रकारात ७१ वर्षांत यामध्ये १२ लोकांचे प्राण गेले, तर हजारो नागरिकांना अपंगत्व आले आहे. परंतु ही कूप्रथा सुरूच असल्याने नागरिक याला कंटाळले असले तरी पोळ्याच्या करीला हा प्रघात नित्याने सुरुच असतो. येथे मोठी यात्रा भरत असून, विदर्भासह मध्यप्रदेशातील भाविकांची मोठी गर्दी असते.

देशात ही गोटमार यात्रा एकमेव असून, केवळ अधंश्रद्धेपाटी निर्माण झालेली श्रद्धा जागृत होऊन हा अघोरी प्रकार येथे दरवर्षी केला जातो.  ही प्रथा  ३०० वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. सावरगाव येथील युवतीसोबत पांढुर्णा येथील युवकाचे प्रेमसूत जुळले होते. ते विवाहबंधनात अडणार तेवढ्यात मान-प्रतिष्ठेच्या अडथळा निर्माण झाल्याने युवतीला सावरगावातून पांढुर्णा येथे नेत असताना दोन्ही गावातील लोकांनी त्यांना जांब नदीपात्रात हेरून दोन्हीकडून दगडांचा वर्षाव प्रेमियुगुलांवर करण्यात आला. त्यात दोघे दगावले, त्यांना चंडिका मातेच्या मंदिरात पूजाअर्चा करून सहमतीने समाधी देण्यात आली. ही घटना पोळ्याची करीला घडल्याने या दिवशी  या दोन्ही गावांतील लोकं या नदीत गोटमार यात्रा भरवित असल्याची आख्यायिका आहे. या दोन्ही आख्यायिका आजही येथील नागरिक श्रद्धेने जोपासतात. यावर्षी गोटमार यात्रेत २२६ भाविक जखमी झाल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये शंकर भलावी (२५, रा. भुयारी जि. छिंदवाडा) यांचा मृत्यू झाला, तर जखमींमध्ये बाबुराव कळम्बे (५०), मनोज रेवतकर (४०, दोन्ही रा.पांढुर्णा) गंभीर जखमी झाल्याने नागपूरला हलविण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत २२६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र