शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात २२६ डेंग्यू पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:01 IST

गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूने जिल्ह्यात थैमान घातले आहे. खासगी डॉक्टरांकडे हजार रुग्णांनी उपचार घेतला असून, एनएस-वन ही डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली रक्तजल चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ठळक मुद्देशासकीय अहवाल : महापालिका हद्दीत १९० रुग्ण

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूने जिल्ह्यात थैमान घातले आहे. खासगी डॉक्टरांकडे हजार रुग्णांनी उपचार घेतला असून, एनएस-वन ही डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली रक्तजल चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता खुद्द यवतमाळ शासकीय सेंटिनल सेंटरने जिल्ह्यात २२६ डेंग्यूरुग्ण आतापर्यंत पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला. यामध्ये १९० सर्वाधिक रुग्ण हे अमरावती महापालिका हद्दीतील आहेत.महापालिका, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, उपजिल्हा रुग्णालयांकडून प्राप्त २४३० रक्तजल नमुने यवतमाळ येथील शासकीय सेंटनल सेंटरला तपासणीसाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने पाठविले. दीड हजारांवर रक्तजल नमुने हे एकट्या महापालिका हद्दीतील आहेत. प्रत्येक एमडी (मेडिसीन) डॉक्टरांकडे रोज दोन ते तीन डेंग्यू रुग्णांची प्राथमिक चाचणी ही पॉझिटिव्ह निघत आहेत. त्या कारणाने अद्यापही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. गेल्या दोन आठवड्यात खासगी डॉक्टरांकडे ७० पेक्षा जास्त डेंग्यूरुग्ण आढळून आले. या महिन्यात अनेकांचा डेंग्यूने बळीदेखील घेतला. मात्र, आरोग्य यंत्रणेने हा विषय अद्यापही गांभीर्याने घेतलेला नाही. शुक्रवारी २१ डेंग्यूरुग्णांचे रक्तजल नमुने हे पॉझिटिव्ह आले. यवतमाळ येथे पाठविण्यात आलेल्या हजारो रक्तजल नमुन्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. त्या कारणाने डेंग्यूरुग्णाचा निश्चित आकडा प्राप्त नसला तरी संख्या निश्चितच वाढली आहे. या ठिकाणी एनएस-वन किट उपलब्ध नसल्याने आठ दिवसानंतर आयजीएम व आयजीजी ही चाचणी करण्यात येते. त्या कारणाने अनेक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असतानाही अहवाल मात्र निगेटिव्ह येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.झेडपीकडे २७ रुग्णांची नोंदआतापर्यंत २७ डेंग्यूरुग्ण ग्रामीण भागात आढळून आल्याची नोंद जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लोकदरबारात मांडल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी घेतली. डेंग्यूबाबत योग्य उपाययोजना करण्याचे व सर्तकता बागळण्याचे निर्देश त्यांनी दिले.सक्षम यंत्रणा नाही?डेंग्यूची एनएस-वन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेला आपल्याकडे डेंग्यूचा रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती खासगी डॉक्टर देतात. मात्र, रक्तजल नमुने घेण्यासाठी सक्षम यंत्रणा महापालिकेकडे नाही. दोन आरोग्य कर्मचारी ४० ते ५० डॉक्टरांकडे ते पोहोचू शकत नाहीत. यामुळे ज्या पॅथालॉजिस्टकडून डेंग्यूची चाचणी करण्यात येते, तेथूनच रक्तजल (सिरम) नमुने महापालिकेचे हे आरोग्य कर्मचारी मिळवतात. खासगी डॉक्टर महापालिकेला पूर्वीपासूनच मदत करीत आहेत.मलातपूर येथील माजी सरपंचाचा मृत्यूधामणगाव रेल्वे : बदलत्या वातावरणाने तालुकाभर डेंग्यूसह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. अशातच तालुक्यातील मलातपूर येथे माजी महिला सरपंचाचा डेंग्यूसदृष्य तापाने मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयही रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे.मंदा ज्ञानेश्वर घरडे (५०) मृताचे नाव आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयात बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. डेंग्यूच्या तापाने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. डेंग्यूसदृश तापाचा एका वर्षात ही महिला चौथा बळी ठरली आहे. यापूर्वी तळेगाव दशासर येथील भूमिका शरद बुल्ले या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला, तर झाडगाव येथील चिमुकलीचाही या आजाराने घात केला. आता देवगाव , जळका पटाचे, सावळा, नारगावंडी या ठिकाणीही तापाचे रुग्ण आढळत आहेत.दरम्यान, शहरातील रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. त्याचबरोबर विविध साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे होऊन गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, काविळ, विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. सद्यस्थितीत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये डायरिया व टायफॉइडचे रुग्ण सर्वाधिक आहेत. ग्रामीण रुग्णालयात दररोज दोनशे बाह्यरुग्ण तपासणी करण्यासाठी येत असल्याची माहिती अधीक्षक महेश साबळे यांनी दिली.