शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अमरावती विभागात २२.४४ लाख हेक्टर बाधित; १५४३.६७ कोटींची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:19 IST

पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल; पश्चिम विदर्भात २०.२५ लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

अमरावती : विभागात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या परतीच्या पावसाने २० लाख २५ हजार १९७ शेतकऱ्यांच्या २२ लाख ४४ हजार ३९८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याने विभागीय आयुक्तांनी तसा अहवाल महसूल विभागाच्या उपसचिवांना पाठविला आहे. यामध्ये ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १५४३ कोटी ६७ लाखांच्या अपेक्षित निधीची मागणी केली आहे.

अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे विभागात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश २९ ऑक्टोबरला दिले होते. त्यानुसार गुरुवारी हा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील १२ लाख २६ हजार ३७६ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे.

कपाशीचे ८ लाख २१ हजार २७० हेक्टर, खरीप ज्वारी ४२ हजार ९६ हेक्टर, तुरीचे ५१ हजार ३४३ हेक्टर, मका पिकाचे ३१ हजार ३४१ हेक्टर, धान पिकाचे ५ हजार ५३८ हेक्टर, उदीड पिकाचे ९ हजार २८९ हेक्टर व इतर खरीप पिकांचे ३६ हजार ६६९ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे संयुक्त पंचनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी राट्रीय आपदा कोषातून (एनडीआरएफ) १५१२ कोटी २८ लख ९८ हजारांच्या अपेक्षित मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांनी महसूल विभागाकडे केली आहे. जिल्हा व पिकनिहाय नुकसान (हेक्टर/लाखात)

जिल्हा         शेतकरी       सोयाबीन       कपाशी        बाधित क्षेत्र      अपेक्षित निधीअमरावती    ३७४८०४    २१२३२९        १३५४७२      ३७३०१९        २५३६५.३५    अकोला       २९७६६८     १७३४०५      १५३०९५      ३६३०५९       २४८२४.७१यवतमाळ    ४३२१००      २०९६८६      ३०२१४७      ५२१००४        ३५४२८.२७बुलडाणा    ६३४०७९      ३७१२५४      २०९९२०      ६८१२०५        ४६३२१.९८वाशीम        २४६३९४     २५९७०१      २०६३५        २८३६५६        १९२८८.६७एकूण       १९,८५,०४५   १२,२६,३४६   ८,२१,२७०   २२,२३,९५५    १५१२,२७९८

असे आहे बागायती व फळपिकांचे नुकसान

विभागात २७ हजार ५६९ शेतकºयांच्या १२ हजार २३ हेक्टरमधील बागायती पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये केळी/पपई ८६१ हेक्टर, भाजीपाला ९३३८ हेक्टर, हरभरा ४०७ हेक्टर, ५.४० हेक्टर गहू, ४.४ हेक्टर मका, १५५ हेक्टर हळद व इतर पिकांचे १२५० हेक्टरमध्ये नुकसान झाले. यासाठी १६ कोटी २३ लाख १७ हजारांच्या निधीची मागणी करण्यात आली. 

विभागात १२ हजार ५८३ शेतकºयांच्या ८४१९ हेक्टरमधील फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये ४०३२ हेक्टरमधील संत्रा, मोसंबी, लिंबू, ८७ हेक्टरमध्ये आंबा, ९०८ हेक्टरमध्ये डाळिंब, १९३७ हेक्टरमध्ये केळी, पपई, ४८ हेक्टरमध्ये पेरू, २०६ हेक्टरमध्ये द्राक्ष व इतर फळपिकांचे ११९८ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. यासाठी १५ कोटी १५ लाखांची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती