शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात दोन वर्षांत २२ वाघ मारले; माजी वनमंत्र्यांच्या पत्राने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 13:42 IST

गत दाेन वर्षांत २२ वाघ मारले गेल्याच्या घटना या व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पत्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देखबऱ्यांच्या हालचालींवर संशय, व्याघ्र संरक्षणाचे प्रशासनासमोर आव्हान

अमरावती : देशात बहुतांश वाघ महाराष्ट्रात असून त्यातही विदर्भात सर्वाधिक वाघ आहेत. मात्र, गत दाेन वर्षांत २२ वाघ मारले गेल्याच्या घटना या व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पत्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाने खबऱ्यांवरही सूक्ष्म नजर ठेवावी, असा सल्ला देखील मुनगंटीवार यांनी वन खात्याला दिला आहे.

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सन जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत वाघ, बिबट्यांच्या शिकारीचा दाखला देत सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत विशेष समिती नेमावी, असे पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिले होते. तथापि, या पत्राच्या अनुषंगाने वन खात्याने वाघांची शिकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, हे वास्तव आहे.

ब्रम्हपुरी वनविभागात वन विभागाने ताब्यात घेतलेला आराेपीच खबऱ्या बनून वन्यजीव शिकारीची माहिती देऊन बक्षीस घेत असल्याची बाब समोर आली होती. अटकेतील आरोपीचा गत दोन वर्षांत चंद्रपूर जिल्हा अथवा विदर्भात वाघांच्या शिकार प्रकरणी हस्तक्षेप असावा, असा अंदाज मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे गत दोन वर्षांत २२ वाघ मारले गेले, याप्रकरणी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत विशेष चौकशी नेमावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.

वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १५ ऐवजी २० लाखांची मदत मिळावी, यासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देण्यात येणार आहे. आर्थिक मदत मिळण्यासाठी वन विभागाने निगेटिव्ह प्रणाली सुरू करावी, असा प्रयत्न असेल. विशेषत: व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी खबऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवावी.

- सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री तथा आमदार.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे मृत्यू

  • कापसी (ता. सावली), २८ जानेवारी २०२०
  • मुडझा (ता. ब्रम्हपुरी), ११ जानेवारी २०२०
  • पिंपळखुट (ता.चंद्रपूर), १८ जून २०२०
  • मुधोली (ता. भद्रावती), २४ जुलै २०२०
  • रत्नापूर (ता.सिंदेवाही ) ४ नोव्हेंबर २०२०
  • चक बोर्डा (ता.चंद्रपूर), २५ एप्रिल २०२१
  • धानोरा (ता. सिंदेवाही), ८ जून २०२१
  • पाचगाव (ता. गाेंडपिंपरी) , २१ ऑगस्ट २०२१
  • भटारी (ता. पोंभुर्णा), १० सप्टेबर २०२१
  • चिंचबोडी (ता. सावली), ८ ऑक्टोबर २०२१
  • खरकाडा- वाढोणा (ता. नागभीड), २२ नोव्हेंबर २०२१
  • नलफाडी (ता. राजुरा), १० जानेवारी २०२१
  • तोरगाव (ता. ब्रह्मपुरी), ९ फेब्रुवारी २०२२
टॅग्स :TigerवाघSocialसामाजिकSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार