शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

वऱ्हाडातील २१ हजार पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:23 IST

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ७६ हजार ४५३ पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात आली. यातून हा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. ...

ठळक मुद्दे२८ प्रयोगशाळांमध्ये तपासणीरासायनिक, जैविक चाचण्यांमधून स्पष्ट

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ७६ हजार ४५३ पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात आली. यातून हा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही नमुन्यांत फ्लोराईड हा धोकादायक घटक आढळला.पाण्यात विरघळलेले रासायनिक घटक आणि पाण्यात संचार करणारे सूक्ष्म जीवजंतू मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. या परिणामांना आळा घालण्यासाठी पाणी प्रदूषणाच्या स्त्रोतांची माहिती करून त्यावर उपाययोजना करणे अगत्याचे ठरते. एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत रासायनिक ३१,७२४ व जैविक ४४,२३९ अशा एकूण ७६, ४५३ पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.यामध्ये १३,८१६ रासायनिक व ७,३३१ जैैविक असे एकूण २१,१४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घेऊन उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.रासायनिक व जैविक पृथ:करण कामात अचुकता व सातत्य असल्यामुळे येथील विभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला ‘राष्ट्रीय अधिस्वीकृती प्रमाणपत्र’ (एनएबीएल) मानांकन प्राप्त आहे. अमरावती विभागात विभागस्तरावर १, जिल्हास्तर ५ व उपविभागस्तरावर २२ अशा एकूण २८ प्रयोगशाळांद्वारा पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येते.

जिल्हानिहाय दूषित नमुन्यांची संख्याच् रासायनिक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात ७१२८ पैकी ४१७०, अकोला ४,०१६ पैकी २,०६१, यवतमाळ १५,१२८ पैकी ५,१२३, वाशिम १,५२८ पैकी ४५३ तर बुलडाणा जिल्ह्यात ३,८५४ पैकी २००९ नमुने पिण्यास अयोग्य आहेत. जैविक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात २,९७४ पैकी ३१८, अकोला ५,१४९ पैकी १,१९१, यवतमाळ १६,७८० पैकी ३,७७६, वाशिम १,४६९ पटकी २५०, तर बुलडाणा जिल्ह्यात ४,३३७ पैकी ६६० नमुने पिण्यास अयोग्य आढळते आहेत.

भूपृष्ठावरील पाणी, भूजल प्रदूषणांची कारणेच्प्रक्रिया न केलेले किंवा प्रक्रिया पूर्ण न झालेल्या औद्योगिक सांडपाण्याचा नदी-नाल्यात होणारा विसर्ग, शेती व्यवसायात वापरली जाणारे रासायनिक खते, आम्ल वर्षा, जमिनीत टाकण्यात येणारे टाकाऊ पदार्थ व भूगर्भात आढळून येणारी खनिजे पाण्यात विरघळल्याने भुपृष्ठावरील पाणी व भूजल प्रदूषित होत असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Waterपाणी