शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

वऱ्हाडातील २१ हजार पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:23 IST

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ७६ हजार ४५३ पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात आली. यातून हा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. ...

ठळक मुद्दे२८ प्रयोगशाळांमध्ये तपासणीरासायनिक, जैविक चाचण्यांमधून स्पष्ट

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ७६ हजार ४५३ पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात आली. यातून हा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही नमुन्यांत फ्लोराईड हा धोकादायक घटक आढळला.पाण्यात विरघळलेले रासायनिक घटक आणि पाण्यात संचार करणारे सूक्ष्म जीवजंतू मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. या परिणामांना आळा घालण्यासाठी पाणी प्रदूषणाच्या स्त्रोतांची माहिती करून त्यावर उपाययोजना करणे अगत्याचे ठरते. एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत रासायनिक ३१,७२४ व जैविक ४४,२३९ अशा एकूण ७६, ४५३ पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.यामध्ये १३,८१६ रासायनिक व ७,३३१ जैैविक असे एकूण २१,१४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घेऊन उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.रासायनिक व जैविक पृथ:करण कामात अचुकता व सातत्य असल्यामुळे येथील विभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला ‘राष्ट्रीय अधिस्वीकृती प्रमाणपत्र’ (एनएबीएल) मानांकन प्राप्त आहे. अमरावती विभागात विभागस्तरावर १, जिल्हास्तर ५ व उपविभागस्तरावर २२ अशा एकूण २८ प्रयोगशाळांद्वारा पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येते.

जिल्हानिहाय दूषित नमुन्यांची संख्याच् रासायनिक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात ७१२८ पैकी ४१७०, अकोला ४,०१६ पैकी २,०६१, यवतमाळ १५,१२८ पैकी ५,१२३, वाशिम १,५२८ पैकी ४५३ तर बुलडाणा जिल्ह्यात ३,८५४ पैकी २००९ नमुने पिण्यास अयोग्य आहेत. जैविक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात २,९७४ पैकी ३१८, अकोला ५,१४९ पैकी १,१९१, यवतमाळ १६,७८० पैकी ३,७७६, वाशिम १,४६९ पटकी २५०, तर बुलडाणा जिल्ह्यात ४,३३७ पैकी ६६० नमुने पिण्यास अयोग्य आढळते आहेत.

भूपृष्ठावरील पाणी, भूजल प्रदूषणांची कारणेच्प्रक्रिया न केलेले किंवा प्रक्रिया पूर्ण न झालेल्या औद्योगिक सांडपाण्याचा नदी-नाल्यात होणारा विसर्ग, शेती व्यवसायात वापरली जाणारे रासायनिक खते, आम्ल वर्षा, जमिनीत टाकण्यात येणारे टाकाऊ पदार्थ व भूगर्भात आढळून येणारी खनिजे पाण्यात विरघळल्याने भुपृष्ठावरील पाणी व भूजल प्रदूषित होत असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Waterपाणी