शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वऱ्हाडातील २१ हजार पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:23 IST

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ७६ हजार ४५३ पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात आली. यातून हा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. ...

ठळक मुद्दे२८ प्रयोगशाळांमध्ये तपासणीरासायनिक, जैविक चाचण्यांमधून स्पष्ट

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ७६ हजार ४५३ पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात आली. यातून हा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही नमुन्यांत फ्लोराईड हा धोकादायक घटक आढळला.पाण्यात विरघळलेले रासायनिक घटक आणि पाण्यात संचार करणारे सूक्ष्म जीवजंतू मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. या परिणामांना आळा घालण्यासाठी पाणी प्रदूषणाच्या स्त्रोतांची माहिती करून त्यावर उपाययोजना करणे अगत्याचे ठरते. एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत रासायनिक ३१,७२४ व जैविक ४४,२३९ अशा एकूण ७६, ४५३ पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.यामध्ये १३,८१६ रासायनिक व ७,३३१ जैैविक असे एकूण २१,१४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घेऊन उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.रासायनिक व जैविक पृथ:करण कामात अचुकता व सातत्य असल्यामुळे येथील विभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला ‘राष्ट्रीय अधिस्वीकृती प्रमाणपत्र’ (एनएबीएल) मानांकन प्राप्त आहे. अमरावती विभागात विभागस्तरावर १, जिल्हास्तर ५ व उपविभागस्तरावर २२ अशा एकूण २८ प्रयोगशाळांद्वारा पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येते.

जिल्हानिहाय दूषित नमुन्यांची संख्याच् रासायनिक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात ७१२८ पैकी ४१७०, अकोला ४,०१६ पैकी २,०६१, यवतमाळ १५,१२८ पैकी ५,१२३, वाशिम १,५२८ पैकी ४५३ तर बुलडाणा जिल्ह्यात ३,८५४ पैकी २००९ नमुने पिण्यास अयोग्य आहेत. जैविक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात २,९७४ पैकी ३१८, अकोला ५,१४९ पैकी १,१९१, यवतमाळ १६,७८० पैकी ३,७७६, वाशिम १,४६९ पटकी २५०, तर बुलडाणा जिल्ह्यात ४,३३७ पैकी ६६० नमुने पिण्यास अयोग्य आढळते आहेत.

भूपृष्ठावरील पाणी, भूजल प्रदूषणांची कारणेच्प्रक्रिया न केलेले किंवा प्रक्रिया पूर्ण न झालेल्या औद्योगिक सांडपाण्याचा नदी-नाल्यात होणारा विसर्ग, शेती व्यवसायात वापरली जाणारे रासायनिक खते, आम्ल वर्षा, जमिनीत टाकण्यात येणारे टाकाऊ पदार्थ व भूगर्भात आढळून येणारी खनिजे पाण्यात विरघळल्याने भुपृष्ठावरील पाणी व भूजल प्रदूषित होत असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Waterपाणी