शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यातील २०४ लाचखोर अद्यापही लोकसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

निलंबन रखडले : ग्रामविकास विभागात सर्वाधिक ‘रखडगाडी’ प्रदीप भाकरे अमरावती : लक्षावधी रुपयांची लाच घेऊनही राज्यातील २०४ लाचखोरांचे ...

निलंबन रखडले : ग्रामविकास विभागात सर्वाधिक ‘रखडगाडी’

प्रदीप भाकरे

अमरावती : लक्षावधी रुपयांची लाच घेऊनही राज्यातील २०४ लाचखोरांचे निलंबन अद्यापही रखडले आहे. संबंधित विभागाने त्या लाचखोरांच्या निलंबनाचे आदेश न काढल्याने ते उजळमाथ्याने सरकारी नोकरी करीत आहेत. यात ग्रामविकास विभागाच्या सर्वाधिक ४९ लाचखोर सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

एसीबीच्या संकेत स्थळानुसार, यात प्रथम श्रेणीचे १९, द्वितीय श्रेणीचे १७, तृतीय श्रेणीचे ९९, चतुर्थ श्रेणीचे सहा, तर ६३ अन्य लोकसेवकांचा समावेश आहे. शासकीय सेवेतील कुठल्याही विभागातील कार्यरत अधिकारी-कर्मचारी लाच घेताना पकडल्यास वा लाचेची मागणी सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येतो. त्यानंतर अटकदेखील केली जाते. अशा अटक झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाने, विभागप्रमुखाने निलंबित करणे अनिवार्य आहे. मात्र, एसीबीच्या सापळा प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या राज्यातील तब्बल २०४ लाचखोरांचे निलंबन त्या-त्या विभागांकडे रखडले आहे.

बॉक्स १

दोषारोपपत्राला उशीर

शासकीय सेवेत कार्यरत असताना गैरकृत्य किंवा पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याला निलंबित केले जाते. यामध्ये प्रामुख्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत गुन्हे वा अटक झालेल्यांची संख्या अधिक आहे. फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये संबंधितांना अटक होऊन ४८ तास किंवा त्याहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळल्यास त्याचे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) कलमानुसार आपसुकच निलंबन होते. त्यानंतर त्या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र बनवावे लागते. त्यावर संबंधित अधिकारी, कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहेत, त्या प्रमुखांची मंजुरी घेऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे लागते. मात्र, अपवाद वगळता बहुतांश प्रकरणामध्ये निर्धारित मुदतीमध्ये दोषारोपपत्र दाखल होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

बॉक्स २

निलंबनापासून दूर असलेले खातेनिहाय लाचखोर

ग्रामविकास - ४९, शिक्षण व क्रीडा - ४४, महसूल - २०, पोलीस, कारागृह, होमगार्ड - १७, सहकार, पणन - १५, नगर विकास - १३, आरोग्य - १०, विधी व न्याय, धर्मादाय आयुक्त - ४, वने - ४, नगर परिषद विभाग - ३, समाजकल्याण विभाग - २, कृषी व पशुसंवर्धन - २, तर वित्त, बेस्ट, आरटीओ, कौशल्य विकास, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण, आदिवासी, महात्मा फुले मागासवर्गीय मंडळ या विभागांत प्रत्येकी एक लाचखोर कर्मचारी निलंबनापासून दूर आहे.

बॉक्स ३

नागपूर विभागातील ५५ जण अद्यापही सेवेत

मुंबई परिक्षेत्रातील १७, ठाणे - २७, पुणे - १२, नाशिक - २, नागपूर सर्वाधिक ५५, अमरावती - २६, औरंगाबाद - १९, नांदेड परिक्षेत्रातील - ४६ लाचखोर अधिकारी, कर्मचारी निलंबनापासून दूर आहेत.

कोट

ज्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली, अटक करण्यात आली, अशांबाबत एसीबी संबंधित विभागांना प्रस्ताव पाठवितो. निलंबन कारवाई संबंधित विभागाकडून केली जाते.

- विशाल गायकवाड, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र