शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

पेरण्या खोळंबल्या आठवड्यात २० टक्केच

By admin | Updated: July 10, 2015 00:56 IST

जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पावसात प्रदीर्घ खंड असल्याने खरिपाच्या पेरण्या थांबविल्या आहेत.

अमरावती : जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पावसात प्रदीर्घ खंड असल्याने खरिपाच्या पेरण्या थांबविल्या आहेत. १ जुलै अखेर ५५.६६ टक्के क्षेत्रात पेरणी झाली होती तर ८ जुलै अखेर ७६.४३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. या एका आठवड्यात २० टक्केच पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असा सल्ला कृषी विभागाचा आहे. जिल्ह्यात २४ जूनपासून पाऊस नाही. १ जून ते ८ जुलैदरम्यान पावसाची २२६.३ मि.मी. सरासरी अपेक्षित असताना २१२.४ मि.मी. पाऊस पडला. खरिपाच्या हंगामात या ३८ दिवसांत फक्त १० दिवस पाऊस पडला आहे. मान्सूनचे १२ जूनला आगमन झाल्यानंतर १८ ते २२ जून दरम्यान दमदार पाऊस पडला. परंतु २४ जुलैनंतर पावसाने दडी मारली. अद्यापही पावसाचा पत्ता नाही. यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून खरिपाच्या पेरण्या थांबविल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्राचे नियोजन असताना ८ जुलै अखेर ५ लाख ४६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. ही ७६.४३ सरासरी आहे. मागील आठवड्यात १ जुलै अखेर ३ लाख ९७ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. ही ५५.६६ टक्के सरासरी आहे. पावसाने डोळे वटारल्याने जमिनीत पेरणीयोग्य आर्द्रता नाही याचा थेट परिणाम पेरणी क्षेत्रावर झाला आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक २ लाख ६० हजार ४०१ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली आह. कपाशीचे १ लाख ५७ हजार ८०० हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. ८० हजार ८०५ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली आहे. १७ हजार ६६६ हेक्टर मूग, ४ हजार ८२१ हेक्टर उडीद, ११ हजार ७९६ हेक्टर ज्वारी, ४ हजार ३१३ हेक्टर मका, ५८० हेक्टर भुईमूग पिके आहेत. पावसाअभावी पिकांची रोपे माना टाकत आहेत. जमिनीतील बिजांकुर करपत असल्याने मोड येण्याची शक्यता आहे. सततच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)