शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

पेरण्या खोळंबल्या आठवड्यात २० टक्केच

By admin | Updated: July 10, 2015 00:56 IST

जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पावसात प्रदीर्घ खंड असल्याने खरिपाच्या पेरण्या थांबविल्या आहेत.

अमरावती : जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पावसात प्रदीर्घ खंड असल्याने खरिपाच्या पेरण्या थांबविल्या आहेत. १ जुलै अखेर ५५.६६ टक्के क्षेत्रात पेरणी झाली होती तर ८ जुलै अखेर ७६.४३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. या एका आठवड्यात २० टक्केच पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असा सल्ला कृषी विभागाचा आहे. जिल्ह्यात २४ जूनपासून पाऊस नाही. १ जून ते ८ जुलैदरम्यान पावसाची २२६.३ मि.मी. सरासरी अपेक्षित असताना २१२.४ मि.मी. पाऊस पडला. खरिपाच्या हंगामात या ३८ दिवसांत फक्त १० दिवस पाऊस पडला आहे. मान्सूनचे १२ जूनला आगमन झाल्यानंतर १८ ते २२ जून दरम्यान दमदार पाऊस पडला. परंतु २४ जुलैनंतर पावसाने दडी मारली. अद्यापही पावसाचा पत्ता नाही. यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून खरिपाच्या पेरण्या थांबविल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्राचे नियोजन असताना ८ जुलै अखेर ५ लाख ४६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. ही ७६.४३ सरासरी आहे. मागील आठवड्यात १ जुलै अखेर ३ लाख ९७ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. ही ५५.६६ टक्के सरासरी आहे. पावसाने डोळे वटारल्याने जमिनीत पेरणीयोग्य आर्द्रता नाही याचा थेट परिणाम पेरणी क्षेत्रावर झाला आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक २ लाख ६० हजार ४०१ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली आह. कपाशीचे १ लाख ५७ हजार ८०० हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. ८० हजार ८०५ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली आहे. १७ हजार ६६६ हेक्टर मूग, ४ हजार ८२१ हेक्टर उडीद, ११ हजार ७९६ हेक्टर ज्वारी, ४ हजार ३१३ हेक्टर मका, ५८० हेक्टर भुईमूग पिके आहेत. पावसाअभावी पिकांची रोपे माना टाकत आहेत. जमिनीतील बिजांकुर करपत असल्याने मोड येण्याची शक्यता आहे. सततच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)