शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अस्मानी, सुलतानी संकटाचे १० हजार बळी दुर्लक्षित; संघर्षावर नैराश्य भारी, पश्चिम विदर्भातील वास्तव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 21, 2023 14:53 IST

आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

अमरावती : पश्चिम विदर्भात सन २००१ पासून सुरु झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेल नाही, आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी ९०७७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत १०१४१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांना शासन मदत मिळाली नसल्याचे वास्तव आहे. याशिवाय १८९ शेतकरी आत्महत्यांची अद्याप चौकशी करण्यात न आल्याने प्रलंबित आहेत.

राज्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्या प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील १३ जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण आहेत. या सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयातया अनुषंगाने कक्ष सुरु करण्यात आलेले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारी, वसुलीचा तगादा, मुलिंचे लग्न याशिवाय अन्य कारणांनी नैराश्य येऊन शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहेत.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात व त्याही अमरावती जिल्ह्यात होत आहे. विभागात २०२३ च्या सहा महिन्यात तब्बल ५४२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये २२७ प्रकरणे शासन मदतीला प्राप्त ठरली आहे. याशिवाय १३५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. अद्याप १८० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीDeathमृत्यूAmravatiअमरावती