शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावच्या एमआयडीसीची १८८ हेक्टर जमीन उद्योगांशिवाय पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:43 IST

Amravati : नव्या उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी एमआयडीसीत जागा नाही, रोजगार मिळणार कसा?

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : एकीकडे नव्या उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी एमआयडीसीमध्ये जमीन मिळत नाही, तर दुसरीकडे गरजेपेक्षा पाच-सात पट अधिक ताब्यात घेतलेली जमीन उद्योगाविना वर्षानुवर्षे पडून आहे. एवढेच नव्हे, तर लाखो रुपये दराने ही जमीन परस्पर विक्री वा हस्तांतरित केली जात आहे. ९९ वर्षांच्या लीजवर दिलेली ही जमीन एमआयडीसी परत का घेत नाही, असा सवाल धामणगाव रेल्वे तालुक्यातील नागरिकांचा आहे.

जळगाव आर्वी येथील एमआयडीसी परिसरात वीज, पाणी उपलब्ध आहे. येथून समृद्धी महामार्ग, धामणगाव रेल्वेस्थानक तीन किलोमीटर अंतरावर आहे. तथापि, जवाहर सहकारी सूतगिरणी सोडली, तर एकही मोठा उद्योग येथे नाही. जे उद्योग सुरू आहेत, ते अखेरच्या घटका मोजत आहेत. उद्योजकांच्या अनेक अपेक्षा, सूचना, तक्रारी, समस्या आहेत. दुसरीकडे त्यांचे कारनामेही पुढे येत आहेत. ताब्यात आलेली जादा जमीन उद्योग बंद पडल्यानंतर ९९ वर्षाच्या लीजवरील या जमिनी आता लाखांच्या दराने बिल्डर लॉबीला विक्री वजा हस्तांतरित केल्या जात आहेत. वास्तविक आजचा बाजारभाव देऊन या जमिनी एमआयडीसीनेच ताब्यात घ्याव्यात आणि नव्या उद्योजकांना उपलब्ध कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

छोट्या उद्योजकांचा होतोय छळउद्योगाबाबत तीन दशकांपूर्वीची स्थिती व आजची स्थिती यात खूप फरक पडल्याचे उद्योजक सांगतात. पूर्वीची सहकार्याची भावना आता राहिली नाही. त्याऐवजी बहुतांश ठिकाणी 'अपेक्षा' बाळगली जाते. छोट्या उद्योजकांचे छळ होत असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत.

शासनाचे कधी मिळणार पाठबळ ?एमआयडीसीकडे १८८ हेक्टर जमीन पडून आहे. लघुउद्योजकांसाठी योग्य दिशा, मार्गदर्शन, जमीन, भांडवल, बैंक गॅरंटी याचा अभाव आहे. झारीतील शुक्राचार्यामुळे उद्योजक त्रस्त असल्याचे सांगण्यात येते. लघुउद्योजकांना पाठबळ देण्याचे काम शासन कधी करणार आहेत, असा सवाल निर्माण होत आहे.

"एमआयडीसी परिसरात मोठा उद्योग यावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. येथे उद्योग येण्यासाठी आपली धडपड सुरू आहे."- प्रताप अडसड, आमदार

"रोजगाराच्या अपेक्षेने ३५ वर्षापूर्वी आम्ही अल्प किमतीत आमच्या शेतजमिनी शासनाला दिल्या. पण रोजगार आले नाहीत. आता आमच्या नशिबाला दोष जगावे लागत आहे."- अजय देशमुख, जळगाव आर्वी

"ज्या उद्योजकांनी प्लॉट घेतले. मात्र, उद्योग सुरू केला नाही, त्यांचे प्लॉट शासनदरबारी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांत नव्या उद्योजकांना येथील प्लॉट वितरित करण्यात येतील."- राम लंके, प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीMIDCएमआयडीसी