शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत ऑन ड्युटी 17 पोलीस मृत्युमुखी, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 20:12 IST

येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे.

चेतन घोगरेअमरावती : येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे. अमरावती कल्याण शाखेच्या माहितीनुसार, दोन वर्षांत 17 पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. 

अमरावती ग्रामीण विभागातील पोलिसांच्या मृत्युबाबत सन 2017 मध्ये दोन मोटार वाहन अपघातात दोघांचा मृत्यू झाला, एक आत्महत्या, तर अल्पशा आजाराने चार अशा एकूण सात पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, सन 2018 मधील आतापर्यंतच्या सात महिन्यांच्या कालावधीत 10 पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामध्ये अल्पशा आजाराने तीन, मोटर वाहन चालवताना दोन, हृदयविकाराने एक, पाण्यात बुडून एक, तर दोघांनी आत्महत्या केल्या व एकाचा कर्तव्यावर मारहाणीत मृत्यू झाला. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस कल्याण निधीमधून, ज्या दिवशी मृत्युमुखी पडले, त्याच दिवशी त्यांच्या परिजनांना 12 हजारांची तत्काळ मदत देण्यात आली. दरम्यान, इतर लाभाशिवाय प्रत्येक कुटुंबातील एकजण अनुकंपा तत्त्वावर पोलीस विभागात नोकरीवर लावून घेतला जाईल, असे शासन परिपत्रकात नमूद आहे. 

अ‍ॅक्सिसच्याच खातेदारांसाठी ३० लाखांचा निधी अपघाती निधन झालेल्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पगारी खाते अ‍ॅक्सिस बँकेत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रसंगासाठी ३० लाखांचा लाभ मिळतो, तसेच ओरिएन्टल इंश्यूरन्सकडून 10 लाखांपर्यंत मदत मिळते. गत चार वर्षांपासून सेवेत रुजू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना याच बँकेत खाते काढणे अनिवार्य आहे. त्यामुळे अशाप्रसंगी सदर कर्मचारी लाभार्थी होऊ शकेल. परंतु, सन 2012 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे बँक खाते इतर (स्टेट) बँकांमध्ये होते. अशा कर्मचाऱ्यांना सदर लाभ दिला जात नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी शासनाने वेगळी तरतूद का करू नये, असा सवालही काही पोलीस कर्मचारी करीत आहेत. आतापर्यंत संदीप राठोड यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांचा लाभ मिळाला, तर पवन जाधव या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना स्टेट बँकेकडून एक लाखांची मदत मिळाली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नऊ लाखांची मदतचांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संतोष मडावी यांचा कर्तव्यावर असताना झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यांना अमरावती ग्रामीण पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नऊ लाखांची मदत त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. कर्तव्य बजावत असताना पोलीस शिपाई संतोष मडावी हे मारहाणीत ठार झाले. त्यामुळे त्यांना शहिदाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण पोलीस विभागातर्फे शासनाकडे पाठविण्यात आला आहे. - एम.एन. मकानदार, पोलीस उपअधीक्षक, अमरावती ग्रामीण

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावतीPolice Stationपोलीस ठाणे