शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी १७ लाख शस्त्रक्रिया, तात्याराव लहानेंकडे जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 22:34 IST

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशनअंतर्गत येत्या १८ महिन्यांमध्ये राज्यातील १७ लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

अमरावती : मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशनअंतर्गत येत्या १८ महिन्यांमध्ये राज्यातील १७ लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मिशन यशस्वितेची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने या ध्येयवेड्या डॉक्टरांवर सोपविण्यात आली आहे.‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशन २०१९’ हे मिशन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने संयुक्तपणे राबवावे. हे मिशन १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत राहील व यात आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाची अतिरिक्त मदत घ्यावी, असे निर्देश शासनाचे उपसचिव सुरेंद्र चानकर यांनी दिले आहेत. देशात मोतीबिंदुमुळे येणाºया अंधत्वाची विकृती मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यात महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांमध्ये ही समस्या अधिक आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असला तरी समस्येवर पूर्णपणे नियंत्रण राखता आलेले नाही. त्या पार्श्वभूमिवर ऑगस्ट २०१९ पर्यंत महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला आहे. या मिशनचे राज्यस्तरीय समन्वयक म्हणून डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग या मिशनसाठी नेत्र शल्यचिकित्सक, तंत्रज्ञ व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संस्था, सर्व डॉक्टर्स व इतर मनुष्यबळाने मिशन समन्यवकांना संपूर्ण सहकार्य करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचा संकल्पमहाराष्टlत मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये जवळपास १७ लाखांचा अनुशेष आहे. यातील सुमारे पाच लाख मोतीबिंदू हे परिपक्वहोऊन गेले असून त्यातील बहुतेक जण वृद्ध व ग्रामीण भागातील आहेत. आरोग्याच्या योजनांचा आढावा घेताना ही बाब लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धपातळीवर ‘मोतीबिंदू’मुक्त महाराष्टची योजना आखण्यास सांगितले होते. त्यानुसार या संकल्प यज्ञात १७ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतील. मोफत चष्मे वाटपही होईल.