शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

१६ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST

अमरावती : राज्यात वनविभागात १६ वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश यापूर्वी निर्गमित झाले. मात्र, हे आरएफओे पदस्थापनेच्या जागी रुजू झाले ...

अमरावती : राज्यात वनविभागात १६ वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश यापूर्वी निर्गमित झाले. मात्र, हे आरएफओे पदस्थापनेच्या जागी रुजू झाले नाहीत. त्यामुळे तत्काळ बदलीच्या जागी रुजू व्हावेेत, असे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १५ मार्च रोजी जारी केले आहेत. रुजू न होणाऱ्या आरएफओ गट - ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न होणे ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजली जाईल, असे आदेशात नमूद आहे. १० ऑगस्ट २०२० रोजी आदेशानुसार बदलीच्या ठिकाणी रुजू होणे आवश्यक होते. मात्र, आता आरएफओंनी पदस्थापनेच्या जागी रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी सांगितले.

यात बंडू चिडे (गोंदिया), भाविक चिवंडे (नवेगाव नागिझरा), रत्नाकर निखाडे (नवेगाव नागझिरा), सिद्धेश्र्वर परिहार (प्रमुख मुख्य वनसंरक्षक कार्यालय), राजीव वैद्य (सामाजिक वनीकरण, वर्धा), रवींद्र चौधरी (ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प), उल्हास चव्हाण (भामरागड), मंगेश सातभाई (वडसा, गडचिरोली), विलास पवळे (सामाजिक वनीकरण, ईंदापूर), राघू आटोळे (सामाजिक वनीकरण, पंढरपूर) कल्याण साबळे (सामाजिक वनीकरण सातारा), भगवंत मेश्राम (वन्यजीव पांढरकवडा), पांडुरंग पाटील (पिंपळनेर, धुळे), कैलास सोनवणे (देवझिरी, यावल), ज्ञानेश्वर बेंडकुळे (जालना, धुळे), योगेश सातपुते (सिंधुदूर्ग, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.