शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१४ हजार ८० जण मेळघाटाबाहेर; पाण्याअभावी स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:59 IST

मेळघाटातील ४ हजार ४५२ कुटुंबांतील १४ हजार ८० लोक मेळघाटबाहेर गेले आहेत. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ८ हजार ५०८ बालकांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे२७ नळ योजनांसह २४७ हँडपंप बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअनिल कडूअमरावती : मेळघाटातील ४ हजार ४५२ कुटुंबांतील १४ हजार ८० लोक मेळघाटबाहेर गेले आहेत. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ८ हजार ५०८ बालकांचा समावेश आहे. बेरोजगारी पाठोपाठ पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी हा पवित्रा घेतला आहे. मेळघाटातील २७ नळयोजनांसह २४७ हँडपंप बंद पडले आहेत. यात धारणी तालुक्यातील १८९ हँडपंप व सात नळयोजना आणि चिखलदरा तालुक्यातील ५८ हँडपंपांसह २० नळयोजना बंद आहेत.मेळघाटातील धारणी तालुक्यातील २७, तर चिखलदरा तालुक्यातील १४ अशा एकूण ४१ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, १३ बोअरवेलसह ५९ विहिरी कोरड्या पडल्या आहेत. मेळघाटातील ६६ ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने जोखीमसदृश पिवळे कार्ड देण्यात आले आहेत.मेळघाटबाहेर पडणाऱ्या लोकांमध्ये चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक १० हजार ३९४ नागरिक आहेत. यात एकट्या सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ हजार ७४९, तर टेम्ब्रुसोंडा अंतर्गत २ हजार ८६० नागरिकांचा समावेश आहे. धारणी तालुक्यातील ३ हजार ६८६ लोक मेळघाटबाहेर आहेत. यात कळमखारमधून सर्वाधिक १ हजार ७, तर साद्राबाडीमधून ८७५ स्त्री-पुरुष मेळघाटबाहेर पडले आहेत.दरवर्षी रोजगाराकरिता आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात मेळघाटबाहेर स्थलांतरित होतात. मेळघाटात रोजगार असला तरी गावपातळीवर त्यांची माहिती सर्वांनाच उपलब्ध होत नाही. ही कामे मेळघाटबाहेरील मजूर, ठेकेदार, यंत्राच्या साहाय्याने करून घेतली जातात. यात मेळघाटातील मजूर रोजगारापासून वंचित राहतात, शिवाय ते कामावर येत नसल्याची ओरड केली जाते.दरम्यान, मेळघाटातील सिपना वन्यजीव विभागांतर्गत सेमाडोह, रायपूर, हतरू, चौराकुंडसह अन्य क्षेत्रांत नदीत वडार बंधारे बांधले गेले. हे काम भिमा कोरेगाव, पुणे, सातारा येथील ठेकदार व मजुरांकडून घेण्यात आले. एक ते दीड महिना हे मजूर मेळघाटात मुक्कामी होते. शासकीय वाहनांसह सेमाडोह संकुल आणि वनविश्रामगृह त्यांच्या दिमतीला होते. मेळघाट (प्रादेशिक) वनविभागातील जारिदा वनपरिक्षेत्रात जाळीचे बंधारे बुलडाणा जिल्ह्यातील ठेकेदार व मजुरांकडून बांधून घेतले गेले.स्रोत आटलेमेळघाटात पिण्याचे पाणी नाही. जे पाणी आहे, ते मेळघाट वासियांना अपुरे पडत आहे. पाण्याची त्यांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे. बहुतांश पाण्याचे स्रोत आटले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नळ योजना व हँडपंप बंद पडले आहेत. उपलब्ध होणारे किंवा येणारे पाणी मिळविण्याकरिता त्यांना संघर्ष करावा लागत आहे.कोरड्या विहिरीत उतरून पाण्याचा झारा, पाणी शोधण्याचा प्रयत्न आदिवासी करीत आहेत. तासन्तास विहिरीच्या कठड्यावर बसून तळाशी बादली बुडण्याएवढे पाणी कधी गोळा होते, यातच ते गुंतून राहत आहेत. ज्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होते, तेथे थेट पुरवठा न करता टँकर विहिरीत रिता केला जातो. मोथा येथील मनीषा धांडे मृत्यूप्रकरण अशाच प्रकारातून घडले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई