शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी १४ सुपुत्रांचे बलिदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:17 IST

बलिदान अन् संघर्षातून साकारलले भारताचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर सैन्यातील जवान २४ तास खडा पहरा देत आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५५० युवक देशसेवेत : १०५ जवान होते सीमेवर तैनात

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती / धामणगाव रेल्वे : बलिदान अन् संघर्षातून साकारलले भारताचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर सैन्यातील जवान २४ तास खडा पहरा देत आहेत. स्वातंत्र्याचे मोल जोपण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील १४ वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशावर अनेक हल्ले करून स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न शत्रू राष्ट्रांनी केला. १९६५ सालच्या भारत-चीन युद्धापासून अलीकडच्या कारगील युद्धातही अमरावतीच्या जवानांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. जिल्ह्यातील १४ जवान, तर धामणगाव तालुक्यातील आजनगाव व पिंपळखुटा येथील दोन जवान यापूर्वी शहीद झाले आहेत़ विशेष म्हणजे, एकट्या धामणगाव तालुक्यातून आतापर्र्यंत १०५ पुत्रांनी देशसेवेसाठी सैन्यात प्रवेश घेऊन सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावली, तर सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५५० हून अधिक युवक सैन्यात दाखल असून देशसेवा करीत आहेत, अशी माहिती सैन्य अधिकारी धनंजय सदाफळे यांनी दिली.जन्म देणाºया आईपेक्षा भारत मातेला अधिक सन्मान देणारे सीमेवर धामणगाव तालुक्यातील १०५ सैनिक आहेत़ उत्तरपूर्व, सागरी सीमा असलेल्या त्रिकोणी भागात भारतीय संरक्षण खात्यातील तीनही विभागात धामणगाव तालुक्यातील सैनिक कार्यरत आहेत़ सावळा व निंबोली हे गाव आजही सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते़ सावळ्यातील चिकटे कुटुंबातील दोन सदस्य सैनिकांचे कार्य पार पडत आहेत, तर निंबोली येथील विशाल प्रशांत वैरागडे, विजय बढीये, ठाकरे, कैकाडे, बुटले, कुºहडकर, यांच्यासह अनेक तालुक्यातील गावांमधील सैनिक देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत़धामणगाव शहरातील तब्बल अकरा, तर मंगरूळ दस्तगीर येथील आठ सैनिकांनी आपले आयुष्य देशसेवसाठी वेचले आहे. शेंदुरजना खुर्द, काशीखेड, आसेगाव, निंभोरा बोडका, वरूड बगाजी, ढाकुलगाव, रायपूर कासरखेड, वकनाथ, नारगावंडी, बोरगाव निस्ताने, पिंपळखुटा, झाडगाव, वाढोणा येथील तरूण सैन्यात भरती झाले आहेत.स्वातंत्र्य लढ्यात कावलीचेही योगदानतालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे असलेल्या कावली या गावाचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान राहिले आहे़ सन १९४२ मध्ये स्वातंत्र्य लढ्याचा संग्राम सुरू असताना येथील गुलाबराव झाडे, देवराव इंगळे यांनी 'चले जाव'चा नारा देत मोठा मोर्चा काढला होता़ त्यावेळी इंग्रजांच्या गुलामी विरूद्ध मोठी चळवळ झाडे व इंगळे या स्वातंत्र्य सैनिकांनी उभारली होती़