शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

अमरावती येथील मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्यावर १४ वनमजूर; थेट मुख्य सचिवांकडे तक्रार!

By गणेश वासनिक | Updated: June 17, 2025 12:59 IST

वरिष्ठांकडून तक्रारीची चाचपणी सुरू : तक्रारकर्ता म्हणतात, तो मी नव्हेच

गणेश वासनिक  अमरावती :अमरावती वन विभाग (प्रादेशिक)च्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांच्या बंगल्यावर एक, दोन नव्हे तर तब्बल १४ वनमजूर दिमतीला असल्याची तक्रार थेट मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आली आहे. या नियमबाह्य कारनाम्याची चौकशी व्हावी, यासाठी एका विधिज्ञांच्या नावाचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र या तक्रारीशी आपला काहीही संबंध नाही. आपल्या नावाचा वापर करून कोणीतरी मुख्य सचिवांकडे तक्रार केल्याचे ‘त्या’ विधिज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही तक्रार खरी की खोटी? याचा शोध आता वन विभाग घेत आहे.

वन विभागाचा कारभार हा ब्रिटिशकालीन असाच असतो. याचा प्रत्यय अनेकदा बड्या वनाधिकाऱ्यांच्या वागणुकीतून अनुभवता येतो. मग मुख्य वनसंरक्षक असो वा क्षेत्र संचालक, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, सहायक वनसंरक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे वनमजूर हा त्यांचा घरगडी म्हणून दिमतीला असतो. यात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्य आयोजना या उपविभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, सीसीएफ जयोती बॅनर्जी यांच्या बंगल्यांवर १४ वनमजूर कार्यरत असल्याची तक्रार नेमकी काेणी, का केली? याचा शोध घेतला जात आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अमरावती वन विभागातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अमरावती येथील ॲड. मनीष देशमुख हे तक्रारदार असून, सीसीएफ बॅनर्जी यांच्या बंगल्यावर १४ वनमजूर नियमबाह्य दिमतीला असल्याचे पत्र थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती वन विभागातील ‘टॉप टू बॉटम’ अधिकारी धास्तावले आहेत. यासंदर्भात सीसीएफ जयोती बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत. 

सहायक वनसंरक्षकांना नियमबाह्य बंगला कोणी दिला?मोर्शी येथील सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे यांना गत काही महिन्यांपूर्वी अमरावती येथील सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षकांचा नियमबाह्य बंगला देण्यात आला आहे. एसीएफ आणि सीएफ या दोन संवर्गातील पदांमध्ये मोठी तफावत असताना वरिष्ठांनी हा निर्णय कोणाच्या आदेशाने घेतला, याचा शोध घेणे आवश्यक आहे. एसीएफ डॉ. भैलुमे यांचे मुख्यालय मोर्शी असूनही ते अमरावतीतून कारभार हाकतात, याकडे वरिष्ठ लक्ष देणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

"मुख्य वनसंरक्षकाच्या बंगल्यात वनमजूर असल्याबाबतच्या तक्रारीशी काहीही संबंध नाही. मला तर पहिल्यांदाच कळाले की माझ्या नावाचा वापर करून कोणीतरी मुख्य सचिवांकडे तक्रार दिली आहे."- ॲड. मनीष देशमुख, अमरावती

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती