शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

८३९ ग्रामपंचायतींमध्ये वर्षभरात १३६९ दूषित पाणी नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:02 IST

जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देआरोग्याला धोका : १५० दूषित नमुने अमरावतीत

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.दूषित पाणी पिल्याने जलजन्य आजार होत असून १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान, सदर पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले होते. त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांना सादर करण्यात आला.दूषित पाणी नमुने आढळल्याची सरासरी टक्केवारी ७.३७ एवढी आहे. तर २५१९ ब्लिचिंग पावडर नमुनेसुद्धा घेण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण यंत्रणेफार्मत १६८७ गावांतील जानेवारी महिन्यांत ८३९ पाणी नमुने घेण्यात आले. यामध्ये ११५ पाणीनमुने दूषित आढळले. या पाणी नमुन्यांमध्ये सार्वधिक दूषित नमुने १६५ अमरावती तालुक्यातील आहेत. १५० चिखलदार तालुक्यात, १३४ अचलपुरमध्ये, तर सर्वात कमी २१ चांदूररेल्वे तालुक्यात आढळले आहेत. साधारणत: पावसाळ्यात सार्वधिक दूषित पाणी नमुने आढळतात. पिण्याच्या पाण्यात कॉलीफॉर्म नावाचा बॅक्टेरीया आढळला तर याला दूषित पाणी मानला जातो. हा बॅक्टेरीयाच विविध जलजन्य आजाराला कारणीभूत ठरत असून दूषित पाणी वारंवार पिल्याने टायफाईड, कावीळ, गॅस्ट्रो (अतिसार), कॉलरा आजार होतात. म्हणून जिल्हा आरोग्य ग्रामीण यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या पाणीपुरवठा योजनेतून किंवा बोरवेल वरून नागरिकांना पिण्याकरिता पाणीपुरवठा करण्यात येतो ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? याची तपासणी केल्यानंतर पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत खासगीत आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.जलजन्य आजाराची २१६ जणांना लागणदूषित पाण्यामुळे कावीळ, टायफाईड, कॉलरा असे आजार कारणीभूत ठरत असून, तालुकानिहाय प्राप्त झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार वर्षभरात चांदूर रेल्वे तालुक्यात कॉलरा गॅस्ट्रोचे ४४ जणांना लागण झाली होती. तिवसा तालुक्यात गॅस्ट्रोचे १०, वरूडमध्ये ४२, मोर्शीत २३, चिखलदार येथे ९६ असे एकूण २१६ जणांना जलजन्य आजाराची लागण झाली होती. तापाने धामणगाव तालुक्यातील एका रुग्णाचा, अतिसाराने तिवसा येथील एकाचा, तर गॅस्ट्रोने मोर्शी तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्याकारणाने मृत्यूलाही कारणीभूत ठरणारे व दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजाराकडे दुर्लक्षित करून चालणार नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणी दर तीन महिन्यांत पाणी नमुने तपासणी करण्यात येते. पहिल्यांदा पाणीनमुने दूषित आढळल्यास तेथे सुपरक्लोरिनेशन करण्यात येते.- सुरेश असोले. जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती.