शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

८३९ ग्रामपंचायतींमध्ये वर्षभरात १३६९ दूषित पाणी नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:02 IST

जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देआरोग्याला धोका : १५० दूषित नमुने अमरावतीत

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.दूषित पाणी पिल्याने जलजन्य आजार होत असून १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान, सदर पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले होते. त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांना सादर करण्यात आला.दूषित पाणी नमुने आढळल्याची सरासरी टक्केवारी ७.३७ एवढी आहे. तर २५१९ ब्लिचिंग पावडर नमुनेसुद्धा घेण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण यंत्रणेफार्मत १६८७ गावांतील जानेवारी महिन्यांत ८३९ पाणी नमुने घेण्यात आले. यामध्ये ११५ पाणीनमुने दूषित आढळले. या पाणी नमुन्यांमध्ये सार्वधिक दूषित नमुने १६५ अमरावती तालुक्यातील आहेत. १५० चिखलदार तालुक्यात, १३४ अचलपुरमध्ये, तर सर्वात कमी २१ चांदूररेल्वे तालुक्यात आढळले आहेत. साधारणत: पावसाळ्यात सार्वधिक दूषित पाणी नमुने आढळतात. पिण्याच्या पाण्यात कॉलीफॉर्म नावाचा बॅक्टेरीया आढळला तर याला दूषित पाणी मानला जातो. हा बॅक्टेरीयाच विविध जलजन्य आजाराला कारणीभूत ठरत असून दूषित पाणी वारंवार पिल्याने टायफाईड, कावीळ, गॅस्ट्रो (अतिसार), कॉलरा आजार होतात. म्हणून जिल्हा आरोग्य ग्रामीण यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या पाणीपुरवठा योजनेतून किंवा बोरवेल वरून नागरिकांना पिण्याकरिता पाणीपुरवठा करण्यात येतो ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? याची तपासणी केल्यानंतर पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत खासगीत आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.जलजन्य आजाराची २१६ जणांना लागणदूषित पाण्यामुळे कावीळ, टायफाईड, कॉलरा असे आजार कारणीभूत ठरत असून, तालुकानिहाय प्राप्त झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार वर्षभरात चांदूर रेल्वे तालुक्यात कॉलरा गॅस्ट्रोचे ४४ जणांना लागण झाली होती. तिवसा तालुक्यात गॅस्ट्रोचे १०, वरूडमध्ये ४२, मोर्शीत २३, चिखलदार येथे ९६ असे एकूण २१६ जणांना जलजन्य आजाराची लागण झाली होती. तापाने धामणगाव तालुक्यातील एका रुग्णाचा, अतिसाराने तिवसा येथील एकाचा, तर गॅस्ट्रोने मोर्शी तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्याकारणाने मृत्यूलाही कारणीभूत ठरणारे व दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजाराकडे दुर्लक्षित करून चालणार नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणी दर तीन महिन्यांत पाणी नमुने तपासणी करण्यात येते. पहिल्यांदा पाणीनमुने दूषित आढळल्यास तेथे सुपरक्लोरिनेशन करण्यात येते.- सुरेश असोले. जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती.