शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

देशात १२ वर्षांत वाघाच्या हल्ल्यात १३५० मृत्यू; एकट्या विदर्भात ३० वाघांचा मुक्त संचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:32 IST

जागतिक व्याघ्र दिन विशेष : ५०% मृत्यू प्रकल्पाबाहेरील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जगात वाघांच्या संख्येत भारत अव्वल स्थानी असला, तरी व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांच्या संवर्धनासाठी फारशा उपाययोजना होताना दिसत नाहीत. देशात २०१२ ते २०२४ यादरम्यान १३५० ताांचा मृत्यू झाला असून, यात ५० टक्के मृत्यू हे प्रकल्पाबाहेरील असल्याची नोंद राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडे आहे. देशातील ५८ व्याघ्र प्रकल्पांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाघांच्या संख्येमुळे प्रकल्पाच्या सीमा कमी पडू लागल्या. परिणामी प्रकल्पाबाहेर वाघांचा मुक्त संचार अलीकडे सर्वसाधारण झाला आहे. त्यातूनच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

राज्यात ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, मेळघाट, बोर व सह्याद्री, असे सहा व्याघ्घ्र प्रकल्प आहेत. तर ४८ अभयारण्ये असून, ४ संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. व्याघ्र प्रकल्पात जागा अपुरी पडत असल्याने वाघांनी नवा कॉरिडॉर शोधला असून, नजीकच्या राखीव क्षेत्रात मुक्काम चालविला आहे. एकट्या विदर्भात ३० वाघांचा राखीव क्षेत्रात मुक्त संचार आहे. वाघांच्या सुरक्षिततेसाठी रक्षकांची नियमित गस्त, मॉनिटरिंग सुरूच असते, अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी यांनी दिली. 

सर्वाधिक मृत्यू कुठे ?मध्य प्रदेश - ३५५महाराष्ट्र - २६१कर्नाटक - १७९उत्तराखंड - १३२तामिळनाडू - ८९आसाम - ८५केरळ - ७६उत्तर प्रदेश - ६७राजस्थान - ३६बिहार - २२आंध्र प्रदेश - १४प. बंगाल - १३ओडिशा - १३गोवा - ४नागालैंड, दिल्ली - प्रत्येकी २

टॅग्स :AmravatiअमरावतीTigerवाघ