शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

१२ लाखांवर केळी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:25 IST

वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत.

ठळक मुद्दे२१ जूनच्या वादळातही उद्ध्वस्त : शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत. आधी उन्हान आणि आता वादळाने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.अचलपूर कृषी उपविभागांतर्गत अचलपूर तालुक्यातील ३८० हेक्टर क्षेत्रांपैकी १८७.७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी करपली, तर अंजनगाव तालुक्यातील ४५१ हेक्टरपैकी २१७ हेक्टर क्षेत्रातील केळी वाढते तापमान आणि उन्हामुळे भाजल्या गेली. केळीचे घड बरोबर निसवले नाहीत. केळीच्या घाडांची संख्या कमी असून घडातील वरच्या फण्याही करपल्या आहेत.२१ जूनच्या तुफान वादळामुळे केळीच्या झाडांची पाने फाटली आहेत. दोन्ही तालुक्यातील केळीचे बहुतांश पीक यात खराब झाले आहे. दरम्यान २१ जूनच्या सायंकाळी वादळाने केळीची झाडे घडांसह जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील चमक येथील सरला सुखदेव पवार यांच्या ८० आर शेतातील संपूर्ण केळी वादळाने झोपली. चमकसह हरम, खानापूर, नवबाग, शहापूर, दारापूर शिवारात प्रचंड नुकसान झाले. सदर नुकसानाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.असे झाले नुकसानअचलपुरतील वेणी येथील मंगेश बुंदेले यांच्या शेतातील ४ हजार केळीची झाडे, प्रल्हाद बदुकले यांच्या शेतात तीन हजार, वडगाव फत्तेपूर येथील सुंदरलाल चौधरी यांच्या शेतातील तीन हजार, तर अंजनगावमधील पांढरी खानापूर येथील रवींद्र डाबरे यांच्या शेतातील ३ हजार २५ केळीची झाडे उन्हामुळे करपल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विशेष तज्ज्ञांनी आपल्या पाहणी अहवालात म्हटले आहे.विशेषतज्ज्ञांचा अभिप्रायअधिक तापमानामुळे बागेतील तापमान वाढले. आर्द्रता कमी झाली. बाष्पीभवनाचा वेग वाढला. याचा परिणाम झाडांच्या वाढीवर झाला. घड बरोबर निसवले नाहीत. जे घड निसवलेत त्याच्या वरील बाजूच्या फण्यासुद्धा तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपल्याचा अभिप्राय कृषी विद्यापीठासह कृषी विभागातील विशेष तज्ज्ञांनी दिला आहे.शेतकऱ्यांची मागणीमोठ्या प्रमाणावर केळी पिकांचे नुकसान झाल्यामुळे केळी पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे हवालदिल शेतकºयांनी केळी पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याकरिता अचलपूर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अंजनगाव तहसीलदारांकडे शेतकºयांसह राजकीय, सामाजिक मंडळींनी निवेदने दिली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती