शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

१२ लाखांवर केळी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:25 IST

वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत.

ठळक मुद्दे२१ जूनच्या वादळातही उद्ध्वस्त : शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत. आधी उन्हान आणि आता वादळाने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.अचलपूर कृषी उपविभागांतर्गत अचलपूर तालुक्यातील ३८० हेक्टर क्षेत्रांपैकी १८७.७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी करपली, तर अंजनगाव तालुक्यातील ४५१ हेक्टरपैकी २१७ हेक्टर क्षेत्रातील केळी वाढते तापमान आणि उन्हामुळे भाजल्या गेली. केळीचे घड बरोबर निसवले नाहीत. केळीच्या घाडांची संख्या कमी असून घडातील वरच्या फण्याही करपल्या आहेत.२१ जूनच्या तुफान वादळामुळे केळीच्या झाडांची पाने फाटली आहेत. दोन्ही तालुक्यातील केळीचे बहुतांश पीक यात खराब झाले आहे. दरम्यान २१ जूनच्या सायंकाळी वादळाने केळीची झाडे घडांसह जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील चमक येथील सरला सुखदेव पवार यांच्या ८० आर शेतातील संपूर्ण केळी वादळाने झोपली. चमकसह हरम, खानापूर, नवबाग, शहापूर, दारापूर शिवारात प्रचंड नुकसान झाले. सदर नुकसानाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.असे झाले नुकसानअचलपुरतील वेणी येथील मंगेश बुंदेले यांच्या शेतातील ४ हजार केळीची झाडे, प्रल्हाद बदुकले यांच्या शेतात तीन हजार, वडगाव फत्तेपूर येथील सुंदरलाल चौधरी यांच्या शेतातील तीन हजार, तर अंजनगावमधील पांढरी खानापूर येथील रवींद्र डाबरे यांच्या शेतातील ३ हजार २५ केळीची झाडे उन्हामुळे करपल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विशेष तज्ज्ञांनी आपल्या पाहणी अहवालात म्हटले आहे.विशेषतज्ज्ञांचा अभिप्रायअधिक तापमानामुळे बागेतील तापमान वाढले. आर्द्रता कमी झाली. बाष्पीभवनाचा वेग वाढला. याचा परिणाम झाडांच्या वाढीवर झाला. घड बरोबर निसवले नाहीत. जे घड निसवलेत त्याच्या वरील बाजूच्या फण्यासुद्धा तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपल्याचा अभिप्राय कृषी विद्यापीठासह कृषी विभागातील विशेष तज्ज्ञांनी दिला आहे.शेतकऱ्यांची मागणीमोठ्या प्रमाणावर केळी पिकांचे नुकसान झाल्यामुळे केळी पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे हवालदिल शेतकºयांनी केळी पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याकरिता अचलपूर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अंजनगाव तहसीलदारांकडे शेतकºयांसह राजकीय, सामाजिक मंडळींनी निवेदने दिली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती