शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 09, 2024 7:29 PM

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र

अमरावती : महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी केली होती. मात्र, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. पश्चिम विदर्भात २०२३ मध्ये म्हणजेच ३६५ दिवसांत तब्बल ११४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्या आहेत. हे सर्व शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत.

पश्चिम विदर्भात दर दिवशी तीन म्हणजेच दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे विदारक चित्र आहे. याची कारणे शोधण्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक दिवस अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील आदिवासीबहुल शेतकऱ्याच्या घरी एक दिवस मुक्कामी राहिलेत. त्यानंतर त्यांनी शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा कार्यक्रम दिला व शेतकरी आत्महत्या होण्यामागची कारणे व अहवाल मागितला. शासनाचा उद्देश चांगला असला तरी अभियान मात्र फोटोसेशनपुरते मर्यादित राहिले.

पश्चिम विदर्भात गेल्या वर्षभरात ११४० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये शासन मदतीसाठी ५१७ प्रकरणे पात्र ठरली. याशिवाय ३१७ प्रकरणे शासन मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहेत, तर ११ महिन्यांपासून तब्बल २३५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने शासन-प्रशासन याविषयी गंभीर नसल्याचा आरोप होत आहे.

सन २००१ पासूनची स्थितीआतापर्यंत शेतकरी आत्महत्या : २०,००६शासन मदतीसाठी पात्र प्रकरणे : ९,३७३आतापर्यंत अपात्र प्रकरणे : १०,३९८चौकशीसाठी अद्याप प्रलंबित : २३५शेतकरी आत्महत्यांची प्रथमदर्शनी कारणे१) विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार पश्चिम विदर्भात जानेवारी महिन्यात १०३, फेब्रुवारी ७३, मार्च १०३, एप्रिल ८६, मे १०६, जून ९६, जुलै ८६, ऑगस्ट १०१, सप्टेंबर १०७, ऑक्टोबर १०४, नोव्हेंबर ८७, डिसेंबरमध्ये ८८२) शेतकरी आत्महत्या होण्यामागे नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, बँकांचे व खासगी सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलीचे लग्न, आजारपण व यासह इतर बाबींमुळे येणारा मानसिक तणाव कारणीभूत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ