शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 9, 2024 19:30 IST

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र

अमरावती : महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी केली होती. मात्र, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. पश्चिम विदर्भात २०२३ मध्ये म्हणजेच ३६५ दिवसांत तब्बल ११४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्या आहेत. हे सर्व शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत.

पश्चिम विदर्भात दर दिवशी तीन म्हणजेच दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे विदारक चित्र आहे. याची कारणे शोधण्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक दिवस अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील आदिवासीबहुल शेतकऱ्याच्या घरी एक दिवस मुक्कामी राहिलेत. त्यानंतर त्यांनी शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा कार्यक्रम दिला व शेतकरी आत्महत्या होण्यामागची कारणे व अहवाल मागितला. शासनाचा उद्देश चांगला असला तरी अभियान मात्र फोटोसेशनपुरते मर्यादित राहिले.

पश्चिम विदर्भात गेल्या वर्षभरात ११४० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये शासन मदतीसाठी ५१७ प्रकरणे पात्र ठरली. याशिवाय ३१७ प्रकरणे शासन मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहेत, तर ११ महिन्यांपासून तब्बल २३५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने शासन-प्रशासन याविषयी गंभीर नसल्याचा आरोप होत आहे.

सन २००१ पासूनची स्थितीआतापर्यंत शेतकरी आत्महत्या : २०,००६शासन मदतीसाठी पात्र प्रकरणे : ९,३७३आतापर्यंत अपात्र प्रकरणे : १०,३९८चौकशीसाठी अद्याप प्रलंबित : २३५शेतकरी आत्महत्यांची प्रथमदर्शनी कारणे१) विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार पश्चिम विदर्भात जानेवारी महिन्यात १०३, फेब्रुवारी ७३, मार्च १०३, एप्रिल ८६, मे १०६, जून ९६, जुलै ८६, ऑगस्ट १०१, सप्टेंबर १०७, ऑक्टोबर १०४, नोव्हेंबर ८७, डिसेंबरमध्ये ८८२) शेतकरी आत्महत्या होण्यामागे नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, बँकांचे व खासगी सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलीचे लग्न, आजारपण व यासह इतर बाबींमुळे येणारा मानसिक तणाव कारणीभूत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ