कृषी विभागाची कारवाई : रासायनिक खतांच्या तीन हजार बॅगा जप्त अमरावती : खरीप हंगामाच्या तोंडावरच चार विविध कंपन्यांचा अंदाजे ११ लाख ७७ हजार रूपये किमतीचा अप्रमाणित खतसाठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने बडनेरा येथील तीन कृषी सेवा केंद्रांच्या गोडाऊनमधून शनिवारी जप्त केला. खरीप हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना बाजारपेठेत अप्रमाणित रासायनिक खते व बोगस बियाण्यांची घुसखोरी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने धडक मोहिम आरंभली आहे. आरएम फॉस्फेट अँन्ड केमिकल्स धुळे या कंपनीकडून बाजारपेठेत विपनण करणार्या श्रीराम फर्टीलायझर अँन्ड केमिकल्सकडून २00 बॅग, बीईसी फर्टीलायझर, पुलगाव या कंपनीच्या १६0 बॅग, मध्यभागात फॉस्फेट लि. मध्यप्रदेश या कंपनीचे विपणन करणार्या श्रीराम फर्टीलायझरमधून ३२0, आरसी फर्टीलाझर प्रा.लि. नाशिक या कंपनीचे ३00 बॅग आणि दत्त अँग्रो सर्विस प्रा.लि. जळगाव खान्देश या कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) १९४0 बॅग जप्त करण्यात आल्या. कृषी विभागाच्या भरारी पथकाने एसएसपी कंपनीच्या रासायनिक खतांची गुणवत्ता पडताळणी केली असता हे रासायनिक खत अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले. या अप्रमाणित खताचा मोठा साठा बडनेरा येथील महावीर कृषी सेवा केंद्र, कृषी आनंद सेवा केंद्र आणि कृषी सेवा केंद्र, बडनेरा यांच्या गोडाऊनमधून कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला. या प्रकरणी दोषी कंपन्यांविरुध्द फर्टीलायझर कंन्ट्रोल ऑर्डर १९९५ च्या कलम १९ अ नुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई कृषी सेवा संचालक अशोक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय तंत्र अधिकारी जी.टी. देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी दिलीप काकडे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी पुरुषोत्तम कडू, कृषी अधिकारी डी.ए. पतंगराव यांनी केलीे. या कारवाईचा अहवाल सोमवारी जिल्हाधिर्यांना सादर केला जाईल.
बडनेरा येथून ११ लाखांचा खतसाठा जप्त
By admin | Updated: May 24, 2014 23:11 IST