शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१०८ रुग्णवाहिका लाखो रुग्णांकरिता ठरली देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:46 IST

शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे.

ठळक मुद्देराज्यात बीव्हीजीकडून संचालन३३ लाख लोकांना मिळाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कवैभव बाबरेकरअमरावती : शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे. पाच वर्षांत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने राज्यातील ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना रुग्णालयांत पोहचवून अनेकांचे विश्वास संपादन केले आहे.या रुग्णवाहिका सेवेचे संचालन महाराष्ट्रात बीव्हीजी इंडिया लिमिटेड व यूके सास यांच्यामार्फत केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी या रुग्णवाहिका सेवेची सुरुवात झाली. २३ मूलभूत जीवनरक्षक प्रणाली आणि सहा अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणालीने सज्ज असलेल्या या रुग्णवाहिका १२ प्रकारच्या तातडीच्या आजारी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून उपचार मिळण्यास यशस्वी ठरल्या आहेत. त्यामध्ये अपघात (वाहन) प्रकरणी २ लाख ८७ हजार २३०, मारहाणप्रकरणी ४० हजार १३०, जाळून घेतलेल्या १७ हजार ६५०, हृदयविकारचे ११ हजार ४०, बाल जन्मप्रकरणी २१ हजार ३९१, उंचावरून पडलेले ९१ हजार ९५७, उन्माद/ विषबाधा प्रकरणी १ लाख ९ हजार ७१४, गर्भवती/प्रसूतीप्रकरणी ८ लाख ९ हजार ६९९, मोठ्या दुर्घटनेतील १७ हजार ३८४, वैद्यकीय उपचाराकरिता १५ लाख ६२ हजार ७०८, पॉली ट्रॉमाचे ७४१४ आणि इतर ३ लाख १२ हजार ५५३ अशा वर्गवारीतून तब्बल ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना राज्यातील विविध कानाकोपऱ्यांतून संबंधित जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून दाखल करण्यात आले आहे.अमरावतीत २९ रुग्णवाहिकाअमरावती जिल्ह्याकरिता १०८ क्रमांकाच्या २९ रुग्णवाहिका विविध आरोग्य केंद्रांना संलग्न आहेत. २०१४ पासून या रुग्णवाहिकांकडून वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढतीच आहे. २०१४ मध्ये ६९३०, २०१५ मध्ये ११ हजार २५, २०१६ मध्ये २२ हजार ३४३, २०१७ मध्ये २२ हजार ५२६, २०१८ मध्ये आतापर्यंत ४५ हजार ५५५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.मेळघाटात मोबाइल रुग्णवाहिकामेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात चारचाकी वाहने पोहोचणे कठीण असलेल्या ठिकाणाहून रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी दुचाकी सज्ज केल्या आहेत. अशा पाच मोबाइल रुग्णवाहिका या भागात देण्यात आल्या आहेत.भारत विकास ग्रुप इंडियाकडून रुग्णांना उपचार मिळण्यासाठी तत्पर सेवा दिली जाते. १०८ रुग्णवाहिकांद्वारे आजपर्यंत लाखो जणांना आपत्कालीन मदत देण्यात आली आहे. पुढेही ही सेवा अविरत सुरू राहील.- सूरज धारपवार, जिल्हा व्यवस्थापक, बीव्हीजी

टॅग्स :Healthआरोग्य