शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

१०८ रुग्णवाहिका लाखो रुग्णांकरिता ठरली देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:46 IST

शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे.

ठळक मुद्देराज्यात बीव्हीजीकडून संचालन३३ लाख लोकांना मिळाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कवैभव बाबरेकरअमरावती : शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे. पाच वर्षांत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने राज्यातील ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना रुग्णालयांत पोहचवून अनेकांचे विश्वास संपादन केले आहे.या रुग्णवाहिका सेवेचे संचालन महाराष्ट्रात बीव्हीजी इंडिया लिमिटेड व यूके सास यांच्यामार्फत केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी या रुग्णवाहिका सेवेची सुरुवात झाली. २३ मूलभूत जीवनरक्षक प्रणाली आणि सहा अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणालीने सज्ज असलेल्या या रुग्णवाहिका १२ प्रकारच्या तातडीच्या आजारी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून उपचार मिळण्यास यशस्वी ठरल्या आहेत. त्यामध्ये अपघात (वाहन) प्रकरणी २ लाख ८७ हजार २३०, मारहाणप्रकरणी ४० हजार १३०, जाळून घेतलेल्या १७ हजार ६५०, हृदयविकारचे ११ हजार ४०, बाल जन्मप्रकरणी २१ हजार ३९१, उंचावरून पडलेले ९१ हजार ९५७, उन्माद/ विषबाधा प्रकरणी १ लाख ९ हजार ७१४, गर्भवती/प्रसूतीप्रकरणी ८ लाख ९ हजार ६९९, मोठ्या दुर्घटनेतील १७ हजार ३८४, वैद्यकीय उपचाराकरिता १५ लाख ६२ हजार ७०८, पॉली ट्रॉमाचे ७४१४ आणि इतर ३ लाख १२ हजार ५५३ अशा वर्गवारीतून तब्बल ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना राज्यातील विविध कानाकोपऱ्यांतून संबंधित जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून दाखल करण्यात आले आहे.अमरावतीत २९ रुग्णवाहिकाअमरावती जिल्ह्याकरिता १०८ क्रमांकाच्या २९ रुग्णवाहिका विविध आरोग्य केंद्रांना संलग्न आहेत. २०१४ पासून या रुग्णवाहिकांकडून वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढतीच आहे. २०१४ मध्ये ६९३०, २०१५ मध्ये ११ हजार २५, २०१६ मध्ये २२ हजार ३४३, २०१७ मध्ये २२ हजार ५२६, २०१८ मध्ये आतापर्यंत ४५ हजार ५५५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.मेळघाटात मोबाइल रुग्णवाहिकामेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात चारचाकी वाहने पोहोचणे कठीण असलेल्या ठिकाणाहून रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी दुचाकी सज्ज केल्या आहेत. अशा पाच मोबाइल रुग्णवाहिका या भागात देण्यात आल्या आहेत.भारत विकास ग्रुप इंडियाकडून रुग्णांना उपचार मिळण्यासाठी तत्पर सेवा दिली जाते. १०८ रुग्णवाहिकांद्वारे आजपर्यंत लाखो जणांना आपत्कालीन मदत देण्यात आली आहे. पुढेही ही सेवा अविरत सुरू राहील.- सूरज धारपवार, जिल्हा व्यवस्थापक, बीव्हीजी

टॅग्स :Healthआरोग्य