शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिका लाखो रुग्णांकरिता ठरली देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:46 IST

शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे.

ठळक मुद्देराज्यात बीव्हीजीकडून संचालन३३ लाख लोकांना मिळाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कवैभव बाबरेकरअमरावती : शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे. पाच वर्षांत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने राज्यातील ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना रुग्णालयांत पोहचवून अनेकांचे विश्वास संपादन केले आहे.या रुग्णवाहिका सेवेचे संचालन महाराष्ट्रात बीव्हीजी इंडिया लिमिटेड व यूके सास यांच्यामार्फत केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी या रुग्णवाहिका सेवेची सुरुवात झाली. २३ मूलभूत जीवनरक्षक प्रणाली आणि सहा अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणालीने सज्ज असलेल्या या रुग्णवाहिका १२ प्रकारच्या तातडीच्या आजारी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून उपचार मिळण्यास यशस्वी ठरल्या आहेत. त्यामध्ये अपघात (वाहन) प्रकरणी २ लाख ८७ हजार २३०, मारहाणप्रकरणी ४० हजार १३०, जाळून घेतलेल्या १७ हजार ६५०, हृदयविकारचे ११ हजार ४०, बाल जन्मप्रकरणी २१ हजार ३९१, उंचावरून पडलेले ९१ हजार ९५७, उन्माद/ विषबाधा प्रकरणी १ लाख ९ हजार ७१४, गर्भवती/प्रसूतीप्रकरणी ८ लाख ९ हजार ६९९, मोठ्या दुर्घटनेतील १७ हजार ३८४, वैद्यकीय उपचाराकरिता १५ लाख ६२ हजार ७०८, पॉली ट्रॉमाचे ७४१४ आणि इतर ३ लाख १२ हजार ५५३ अशा वर्गवारीतून तब्बल ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना राज्यातील विविध कानाकोपऱ्यांतून संबंधित जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून दाखल करण्यात आले आहे.अमरावतीत २९ रुग्णवाहिकाअमरावती जिल्ह्याकरिता १०८ क्रमांकाच्या २९ रुग्णवाहिका विविध आरोग्य केंद्रांना संलग्न आहेत. २०१४ पासून या रुग्णवाहिकांकडून वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढतीच आहे. २०१४ मध्ये ६९३०, २०१५ मध्ये ११ हजार २५, २०१६ मध्ये २२ हजार ३४३, २०१७ मध्ये २२ हजार ५२६, २०१८ मध्ये आतापर्यंत ४५ हजार ५५५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.मेळघाटात मोबाइल रुग्णवाहिकामेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात चारचाकी वाहने पोहोचणे कठीण असलेल्या ठिकाणाहून रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी दुचाकी सज्ज केल्या आहेत. अशा पाच मोबाइल रुग्णवाहिका या भागात देण्यात आल्या आहेत.भारत विकास ग्रुप इंडियाकडून रुग्णांना उपचार मिळण्यासाठी तत्पर सेवा दिली जाते. १०८ रुग्णवाहिकांद्वारे आजपर्यंत लाखो जणांना आपत्कालीन मदत देण्यात आली आहे. पुढेही ही सेवा अविरत सुरू राहील.- सूरज धारपवार, जिल्हा व्यवस्थापक, बीव्हीजी

टॅग्स :Healthआरोग्य