शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

१०६ तलाठी साझे, १८ मंडळांची निर्मिती, महसुली कामकाज होणार गतिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 16:27 IST

अमरावती : नागपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या परिमाणानुसार विभागातील तलाठी साझे व मंडळ यांची पुनर्रचना करण्यात आलीे.

- गजानन मोहोडअमरावती : नागपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या परिमाणानुसार विभागातील तलाठी साझे व मंडळ यांची पुनर्रचना करण्यात आलीे. यानुसार संबंधित जिल्हाधिका-यांनी ३१ आॅक्टोबरला अंतिम प्रारूप तयार केले आहे.लोकसंख्या, खातेदार व भौगोलिक क्षेत्राच्या गुणांकानुसार विभागात १०६ तलाठी साझांची व १८ महसूल मंडळांची वाढ करण्यात आली. यामुळे महसुली कामकाज सोईचे होणार आहे. तलाठी साझांच्या संख्यावाढीबाबत शासनाच्या महसूल विभागाने २५ मे २०१८ व प्रधान सचिवांनी १ जून रोजी आदेशित केले होते. विभागीय आयुक्त अनूपकुमार समितीने जाहीर केलेल्या निकषानुसार तलाठी साझ्यांची संख्यावाढ करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती विभागातील महापालिका क्षेत्रात १६ व महापालिकेच्या झालर (१० किमी परिसर) क्षेत्रात २, अकोला महापालिका क्षेत्रात ३ व झालर क्षेत्रात ५ साझ्यांची पुनर्रचना करण्यात आली. नगरपालिका क्षेत्रात ५, नगरपंचायत क्षेत्रात १४, ग्रामीणमध्ये ३९, आदिवासी क्षेत्रात १६ नवीन साझ्यांची निर्मिती करण्यात आली.राज्यातील तलाठी साझा निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी सन १९७४ मध्ये कपूर समिती स्थापित करण्यात आली होती. या समितीच्या निकषानुसार १९८३ मध्ये नवीन साझांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता २०१५ मध्ये अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने सुचविलेल्या निकषानुसार १०० गुणांचे सूत्र तयार करण्यात आले. त्यानुसार ५०० खातेदार असल्यास ४० गुण, १८०० हेक्टर शेती कार्यक्षेत्रात असल्यास ३० गुण, हजार लोकसंख्या असल्यास १० गुण व चार गावांची संख्या असल्यास १० गुण या निकषानुसार साझ्यांची निर्मिती करण्यात आली.ग्रामीणमध्ये ३९, अदिवासी क्षेत्रात १६ साझांची वाढधारणी उपविभागातील धारणी तालुक्यात ९ व चिखलदरा तालुक्यात ७ असे एकूण १६ साझ्यांची संख्यावाढ होणार आहे. हे दोन्ही तालुके अतिदुर्गम व जंगलाने व्याप्त आहेत. त्यामुळे येथील पुनर्रचना करताना भौगोलिक संरचना, दोन गावांमधील अंतर, उपलब्ध दळणवळणाच्या साधनांचा विचार करण्यात आला. पेसा कायद्यांतर्गत जी महसुली गावे नाहीत, ती महसुली गावे म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात महसुली गावे वाढणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीणमध्ये १६ साझ्यांची वाढ होणार आहे.नव्याने साझ्यांची संख्यावाढविभागात साझ्यांच्या संख्येत १०६ ने वाढ झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात ५५८ साझे झालेत. ३४ नवीन साझे आहेत. अकोला जिल्ह्यात अस्तित्वातील ३१० व ८ नवीन असे ३१८, यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वातील ६२८ व नवीन ५४ असे ६८२, बुलडाणा जिल्ह्यात अस्तित्वातील ५२५ व नव्याने १० असे ५३५ साझे झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात जैसे थे स्थिती आहे. विभागात अस्तित्वातील ३७७ व नव्याने १८ असे ३९५ महसूल मंडळांची संख्या राहणार आहे. यामध्ये अमरावती ६, अकोला १, यवतमाळ ९ व बुलडाणा जिल्ह्यात २ मंडळे वाढणार आहेत.तलाठी, कोतवाल पदांची होणार निर्मितीजिल्ह्यासह राज्यात ३,१६५ तलाठी साझे व ५२८ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती होणार असल्याने स्वाभाविकच तलाठी व कोतवालपदांची भरती होणार आहे तसेच मंडळ अधिकाºयांची पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. विभागात तलाठ्यांची २,२८९ पदे मंजूर आहेत. यापैकी १११ रिक्त आहेत. मंडळ अधिकाºयांची ४०२ पदे आहेत. यामध्ये सात पदे रिक्त आहेत. आता नव्याने वाढलेली पदनिर्मिती होणार आहे.