शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

१०६ तलाठी साझे, १८ मंडळांची निर्मिती, महसुली कामकाज होणार गतिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 16:27 IST

अमरावती : नागपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या परिमाणानुसार विभागातील तलाठी साझे व मंडळ यांची पुनर्रचना करण्यात आलीे.

- गजानन मोहोडअमरावती : नागपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या परिमाणानुसार विभागातील तलाठी साझे व मंडळ यांची पुनर्रचना करण्यात आलीे. यानुसार संबंधित जिल्हाधिका-यांनी ३१ आॅक्टोबरला अंतिम प्रारूप तयार केले आहे.लोकसंख्या, खातेदार व भौगोलिक क्षेत्राच्या गुणांकानुसार विभागात १०६ तलाठी साझांची व १८ महसूल मंडळांची वाढ करण्यात आली. यामुळे महसुली कामकाज सोईचे होणार आहे. तलाठी साझांच्या संख्यावाढीबाबत शासनाच्या महसूल विभागाने २५ मे २०१८ व प्रधान सचिवांनी १ जून रोजी आदेशित केले होते. विभागीय आयुक्त अनूपकुमार समितीने जाहीर केलेल्या निकषानुसार तलाठी साझ्यांची संख्यावाढ करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती विभागातील महापालिका क्षेत्रात १६ व महापालिकेच्या झालर (१० किमी परिसर) क्षेत्रात २, अकोला महापालिका क्षेत्रात ३ व झालर क्षेत्रात ५ साझ्यांची पुनर्रचना करण्यात आली. नगरपालिका क्षेत्रात ५, नगरपंचायत क्षेत्रात १४, ग्रामीणमध्ये ३९, आदिवासी क्षेत्रात १६ नवीन साझ्यांची निर्मिती करण्यात आली.राज्यातील तलाठी साझा निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी सन १९७४ मध्ये कपूर समिती स्थापित करण्यात आली होती. या समितीच्या निकषानुसार १९८३ मध्ये नवीन साझांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता २०१५ मध्ये अनूपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने सुचविलेल्या निकषानुसार १०० गुणांचे सूत्र तयार करण्यात आले. त्यानुसार ५०० खातेदार असल्यास ४० गुण, १८०० हेक्टर शेती कार्यक्षेत्रात असल्यास ३० गुण, हजार लोकसंख्या असल्यास १० गुण व चार गावांची संख्या असल्यास १० गुण या निकषानुसार साझ्यांची निर्मिती करण्यात आली.ग्रामीणमध्ये ३९, अदिवासी क्षेत्रात १६ साझांची वाढधारणी उपविभागातील धारणी तालुक्यात ९ व चिखलदरा तालुक्यात ७ असे एकूण १६ साझ्यांची संख्यावाढ होणार आहे. हे दोन्ही तालुके अतिदुर्गम व जंगलाने व्याप्त आहेत. त्यामुळे येथील पुनर्रचना करताना भौगोलिक संरचना, दोन गावांमधील अंतर, उपलब्ध दळणवळणाच्या साधनांचा विचार करण्यात आला. पेसा कायद्यांतर्गत जी महसुली गावे नाहीत, ती महसुली गावे म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात महसुली गावे वाढणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीणमध्ये १६ साझ्यांची वाढ होणार आहे.नव्याने साझ्यांची संख्यावाढविभागात साझ्यांच्या संख्येत १०६ ने वाढ झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात ५५८ साझे झालेत. ३४ नवीन साझे आहेत. अकोला जिल्ह्यात अस्तित्वातील ३१० व ८ नवीन असे ३१८, यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वातील ६२८ व नवीन ५४ असे ६८२, बुलडाणा जिल्ह्यात अस्तित्वातील ५२५ व नव्याने १० असे ५३५ साझे झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात जैसे थे स्थिती आहे. विभागात अस्तित्वातील ३७७ व नव्याने १८ असे ३९५ महसूल मंडळांची संख्या राहणार आहे. यामध्ये अमरावती ६, अकोला १, यवतमाळ ९ व बुलडाणा जिल्ह्यात २ मंडळे वाढणार आहेत.तलाठी, कोतवाल पदांची होणार निर्मितीजिल्ह्यासह राज्यात ३,१६५ तलाठी साझे व ५२८ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती होणार असल्याने स्वाभाविकच तलाठी व कोतवालपदांची भरती होणार आहे तसेच मंडळ अधिकाºयांची पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. विभागात तलाठ्यांची २,२८९ पदे मंजूर आहेत. यापैकी १११ रिक्त आहेत. मंडळ अधिकाºयांची ४०२ पदे आहेत. यामध्ये सात पदे रिक्त आहेत. आता नव्याने वाढलेली पदनिर्मिती होणार आहे.