शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सावधान! कोरोनाने काढले डोके वर, जूनमध्ये १०६ संक्रमितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 18:18 IST

जिल्ह्यात कोरोना हळूहळू पाय पसरू लागल्याने नागरिकांनी कोरोना अनुरूप वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक मुद्देकोविड अनुरूप वर्तन हवे, आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

अमरावती : तिसऱ्या लाटेनंतर माघारलेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. शुक्रवारी १२, तर जून महिन्यात एकूण १०६ संक्रमितांची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात कोरोना हळूहळू पाय पसरू लागल्याने नागरिकांनी कोरोना अनुरूप वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये कोरोनाचे जनुकीय उत्परिवर्तन होऊन तयार झालेल्या ओमायक्रॉन या विषाणूमुळे तिसऱ्या लाटेचे संकट ओढावले होते. या लाटेत दीड महिन्यात सात हजार कोरोनाग्रस्तांची नोंद झाली व या दरम्यान दहा रुग्णांचा मृत्यू देखील झाला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर संसर्ग माघारला होता. मात्र, जून-जुलै महिन्यात संसर्ग वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली होती. त्यामुळे शासनाद्वारा १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर देण्यात आलेला आहे.

शुक्रवारी १२ कोरोनाग्रस्तांची नोंद

शुक्रवारी नवसारी येथील ३२ वर्षीय, गोपालनगरातील ६२ व ६५ वर्षीय, राजापेठ ठाण्यामागील ३८ वर्षीय, साईनगरातील ४० वर्षीय, बालाजी प्लॉट येथील ४० वर्षीय, प्रतीक्षा केशव कॉलनीतील ३४ वर्षीय, कॅम्प रोडवरील ३७ वर्षीय व ३९ वर्षीय पुरुष व सातुर्णा येथील ४० वर्षीय महिला, तसेच चांदूर बाजार येथील ८२ वर्षीय पुरुष व माहुली येथील १४ वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सद्यस्थितीत मनपा क्षेत्रात १६ व ग्रामीणमध्ये २४ असे एकूण ४० सक्रिय रुग्ण आहेत.

बीए-२ व्हेरिएंटमुळे वाढला संसर्ग !

काही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथील एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये ओमायक्राॅनचा सबव्हेरिएंट असलेल्या बीए-२ या विषाणूचा अहवाल प्राप्त असल्याचे विद्यापीठ लॅबचे समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले. या विषाणूमुुळेच जिल्ह्यात संसर्ग वाढल्याची शक्यता आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस