शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

मान्सूनकाळात १०२८ गावांना पुराचा धोका, १ जूनपासून प्रशासन अलर्ट मोडवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 2, 2023 16:18 IST

आठ लाख नागरिकांच्या सुरक्षेची चिंता

अमरावती : प्रशासनाचा पावसाळ्याला १ जूनपासून सुरु झाल्याने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ६१ नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. याशिवाय पावसाळ्यात नदी-नाल्याच्या काठावरील १०२८ गावे प्रभावित होत असल्याने सर्व नियंत्रण कक्ष २४ बाय ७ सुरु राहून व प्रशासन अलर्ट मोडवरआहे.

यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ४८२ गावे, बुलडाणा २८६, यवतमाळ १६९, अकोला ७७ व वाशिम जिल्ह्यात १४ गावे पुरप्रवण आहेत. या भागातील ८.१२ लाख नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १४२८ तात्पुरते निवारे तयार असल्याचे प्रशासनाने सांगितले. याशिवाय २६ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. विभागातील ३८८ मंडळातील हवामान केंद्राद्वारे पर्जन्यमानाची नोंद घेतल्या जाणार आहे.

आपत्तीचा सामना करण्यात विभागात १६ रबरीबोट, चार फायबर बोट, ८२१ लाईफ जॅकेट, ११४०० मीटर रोप बंडल व १६९८ प्रशिक्षित मनुष्यबळ तयार आहेत. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे पाचही जिल्ह्यात १२६२ बेड तयार ठेवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अमरदीप चोरपगार यांनी दिली.

स्ट्रक्चरल ऑडिट, १५ दिवसांत मागितला अहवाल

पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी. जुने रस्ते,पूल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी यंत्रणेला दिले. त्यांनी ३१ मे रोजी विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला.

टॅग्स :RainपाऊसAmravatiअमरावती