शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

मान्सूनकाळात १०२८ गावांना पुराचा धोका, १ जूनपासून प्रशासन अलर्ट मोडवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 2, 2023 16:18 IST

आठ लाख नागरिकांच्या सुरक्षेची चिंता

अमरावती : प्रशासनाचा पावसाळ्याला १ जूनपासून सुरु झाल्याने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ६१ नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. याशिवाय पावसाळ्यात नदी-नाल्याच्या काठावरील १०२८ गावे प्रभावित होत असल्याने सर्व नियंत्रण कक्ष २४ बाय ७ सुरु राहून व प्रशासन अलर्ट मोडवरआहे.

यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ४८२ गावे, बुलडाणा २८६, यवतमाळ १६९, अकोला ७७ व वाशिम जिल्ह्यात १४ गावे पुरप्रवण आहेत. या भागातील ८.१२ लाख नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १४२८ तात्पुरते निवारे तयार असल्याचे प्रशासनाने सांगितले. याशिवाय २६ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. विभागातील ३८८ मंडळातील हवामान केंद्राद्वारे पर्जन्यमानाची नोंद घेतल्या जाणार आहे.

आपत्तीचा सामना करण्यात विभागात १६ रबरीबोट, चार फायबर बोट, ८२१ लाईफ जॅकेट, ११४०० मीटर रोप बंडल व १६९८ प्रशिक्षित मनुष्यबळ तयार आहेत. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे पाचही जिल्ह्यात १२६२ बेड तयार ठेवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अमरदीप चोरपगार यांनी दिली.

स्ट्रक्चरल ऑडिट, १५ दिवसांत मागितला अहवाल

पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी. जुने रस्ते,पूल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी यंत्रणेला दिले. त्यांनी ३१ मे रोजी विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला.

टॅग्स :RainपाऊसAmravatiअमरावती