शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

मान्सूनकाळात १०२८ गावांना पुराचा धोका, १ जूनपासून प्रशासन अलर्ट मोडवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 2, 2023 16:18 IST

आठ लाख नागरिकांच्या सुरक्षेची चिंता

अमरावती : प्रशासनाचा पावसाळ्याला १ जूनपासून सुरु झाल्याने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ६१ नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. याशिवाय पावसाळ्यात नदी-नाल्याच्या काठावरील १०२८ गावे प्रभावित होत असल्याने सर्व नियंत्रण कक्ष २४ बाय ७ सुरु राहून व प्रशासन अलर्ट मोडवरआहे.

यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ४८२ गावे, बुलडाणा २८६, यवतमाळ १६९, अकोला ७७ व वाशिम जिल्ह्यात १४ गावे पुरप्रवण आहेत. या भागातील ८.१२ लाख नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १४२८ तात्पुरते निवारे तयार असल्याचे प्रशासनाने सांगितले. याशिवाय २६ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. विभागातील ३८८ मंडळातील हवामान केंद्राद्वारे पर्जन्यमानाची नोंद घेतल्या जाणार आहे.

आपत्तीचा सामना करण्यात विभागात १६ रबरीबोट, चार फायबर बोट, ८२१ लाईफ जॅकेट, ११४०० मीटर रोप बंडल व १६९८ प्रशिक्षित मनुष्यबळ तयार आहेत. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे पाचही जिल्ह्यात १२६२ बेड तयार ठेवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अमरदीप चोरपगार यांनी दिली.

स्ट्रक्चरल ऑडिट, १५ दिवसांत मागितला अहवाल

पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी. जुने रस्ते,पूल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी यंत्रणेला दिले. त्यांनी ३१ मे रोजी विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला.

टॅग्स :RainपाऊसAmravatiअमरावती