अमरावती : महापालिका क्षेत्रात श्वानांची संख्या १० हजारांवर आहे. दरवर्षी शेकडो व्यक्तींना चावा घेतला जात असताना त्यांच्या संख्यावाढीवर नियंत्रण नाही. या श्वानांच्या निर्बिजिकरणाची प्रक्रिया चार वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदर मोठ्या प्रमाणात वाढत असून, तातडीने ही प्रक्रिया राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
भटक्या श्वानांच्या नसबंदी संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या कडक गाईडलाईन आहेत. याशिवाय जिल्हा प्राणीक्लेश समिती व जिल्हा प्राणी जन्म नियंत्रण समितीच्यादेखील गाईडलाईन आहेत. सन २००१ पासून याची महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे पशुशल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनी सांगितले. या सर्व प्रकारांत एनजीओ पुढे येत नाही. महापालिकेद्वारा तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविली. आतादेखील निविदा प्रक्रियेतच असल्याचे बोंद्रे म्हणाले.
दरम्यान भटक्या श्वानांच्या जन्मसंख्येवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने या श्वानांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या श्वानांच्या बंदोबस्ताचा विषय अनेकदा चर्चेला आला. निर्बिजिकरणाचे २००० टार्गेटदेखील आहे. मात्र, अद्याप कुठलाच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बॉक्स
श्वान पकडण्यासाठी खासगी व्यक्ती
महापालिका क्षेत्रात श्वान पकडण्यासाठीचा कंत्राट एका खासगी व्यक्तीला देण्यात आलेला आहे. या विभागाजवळ याकरिता मनुष्यबळ नाही. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. श्वान पकडल्यानंतर त्यांना सोडणार कुठे, हा प्रश्नदेखील निर्माण होतो. यासाठी सेल्टर होम, प्रथमोपचार केंद्र आदिची सुविधा नाही. त्यामुळे पकडलेले श्वान पुन्हा त्याच भागात सोडले जात असल्याची माहिती आहे.
बॉक्स
या भागात भटके श्वान अधिक
ज्या भागात उघड्यावर अन्न, मांस टाकले जातात, त्या भागात भटक्या श्वानांची संख्या अधिक आहे. सध्या महापालिका क्षेत्रात लालखडी, इतवारा, गाडगेनगर व बडनेरा आदी भागांत भटक्या श्वानांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येते.
पाईंटर
एका श्वानाच्या नसबंदीसाठी खर्च १५०० रुपये
कंत्राटाकरिता सध्या निविदा प्रक्रिया
बॉक्स
रोज १५ ते २० तक्रारी
महापालिकेकडे साधारणपणे रोज १५ ते २० तक्रारी मोकाट श्वानांसंदर्भात दाखल होतात. प्रत्यक्षात किती कारवाई होतात, हे सांगणे अवघडच आहे. मुळात याबाबतची यंत्रणा नाही. मोकाट श्वान पकडल्यानंतर सेल्टर होम नाही, प्रथमोपचार सुविधा नाही. त्यामुळे या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
कोट
महपालिका क्षेत्रात सध्या भटक्या श्वानावर निर्बिजीकरणाची प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही. याविषयीची निविदा प्रक्रियेत आहे. तुर्तास खासगी एजंन्सीद्वारा हे श्वान पकडण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
डॉ सचिन बोंद्रे
पशू शल्य चिकीत्सक (महापालिका)