शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
4
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
5
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
6
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
7
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
8
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
11
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
12
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
13
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
14
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
15
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
16
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
17
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
18
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
19
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
20
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

अस्मानी संकटाने हिरावला कुटुंबाचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

अंगावर शहारे आणणारी ही स्थिती झाली आहे सिद्धनाथपूर येथील सुधाकर महादेव पाटेकर (४७) यांच्या चार मुलांची. ओल्या दुष्काळाने सर्व स्वप्नांचा चुराडा केला. सुधाकर पाटेकर यांची तीन व वडिलांच्या नावे असलेली तीन अशी एकूण सहा एकर कोरडवाहू शेती कुटुंबात आहे. त्यात पेरलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सोयाबीन कुजले. हाती-मुठी जे आले, त्याला भाव नाही. अशा अस्मानी व सुलतानी संकटांनी बेजार झालेल्या सुधाकर यांनी इहयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. समोरच केवळ प्रश्नच दिसत असल्याने त्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देसिद्धनाथपूर सुन्न : शोकमग्न वातावरणात अंतिमसंस्कार

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : दोन महिन्यांपूर्वी आजोबा देवाघरी गेले. त्या धक्क्याने आजी वारली. या दु:खाची सल कमी होते ना होते तोच पित्याच्या रूपाने असलेला घराचा आधारवड कोसळला. आता जगायचे कसे अन् कुणासाठी? घरातील दहाही डोळे शून्यात हरवले आहेत. आभाळभर दु:खाने अश्रूही सुकले आहेत. डोळे आणि देहबोलीतून एकच आर्त हाक उठते आहे - तुम्ही असे करायला नको होते बाबा!अंगावर शहारे आणणारी ही स्थिती झाली आहे सिद्धनाथपूर येथील सुधाकर महादेव पाटेकर (४७) यांच्या चार मुलांची. ओल्या दुष्काळाने सर्व स्वप्नांचा चुराडा केला. सुधाकर पाटेकर यांची तीन व वडिलांच्या नावे असलेली तीन अशी एकूण सहा एकर कोरडवाहू शेती कुटुंबात आहे. त्यात पेरलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सोयाबीन कुजले. हाती-मुठी जे आले, त्याला भाव नाही. अशा अस्मानी व सुलतानी संकटांनी बेजार झालेल्या सुधाकर यांनी इहयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. समोरच केवळ प्रश्नच दिसत असल्याने त्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. या निर्णयाने राणी, छकुली, वैशाली या तीन मुलींच्या पाठीवर झालेला चिमुकला अंश पोरका झाला. पतीच्या आत्महत्येनंतर चार मुलांना सांभाळण्याचे दिव्य वर्षा पाटेकर यांना पार पाडावे लागणार आहे.दरम्यान, विष प्राशनानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या सुधाकर पाटेकर यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात नातेवाइकांनी आणले. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर गावात आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास पाटेकर या चुलतभावाने त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. सारे गाव शोकसागरात बुडाले. नवरात्रात वडील महादेवराव वारले. पाठोपाठ दिवाळीच्या आदल्या दिवशी आई विमलाबाईचाही मृत्यू झाला. आधीच कर्जबाजारीपणा व त्यात नातेवाइकांकडून वडिलाच्या आजारासाठी घेतलेली उसनवारी, घरी लग्नाची मुलगी, त्यात परतीच्या पावसाने सोयाबीन कुजून खराब झाले. आता पुढे काय, या प्रश्नाने ते सर्व सैरभैर झाले आहेत.हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन परतीच्या पावसाने खराब झाले. शेतकरी पार खचून गेला आहे. अद्यापही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही.- मनोहरराव पाटेकर,शेतकरी, सिद्धनाथपूर.परतीच्या पावसाने शेतकºयाच्या शेतातील सोयाबीन कुजले. त्या कुजलेल्या सोयाबीनला भाव नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने ही घटना घडली.- सिद्धार्थ किर्दक,सिद्धनाथपूर

टॅग्स :Deathमृत्यू