शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकटाने हिरावला कुटुंबाचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

अंगावर शहारे आणणारी ही स्थिती झाली आहे सिद्धनाथपूर येथील सुधाकर महादेव पाटेकर (४७) यांच्या चार मुलांची. ओल्या दुष्काळाने सर्व स्वप्नांचा चुराडा केला. सुधाकर पाटेकर यांची तीन व वडिलांच्या नावे असलेली तीन अशी एकूण सहा एकर कोरडवाहू शेती कुटुंबात आहे. त्यात पेरलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सोयाबीन कुजले. हाती-मुठी जे आले, त्याला भाव नाही. अशा अस्मानी व सुलतानी संकटांनी बेजार झालेल्या सुधाकर यांनी इहयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. समोरच केवळ प्रश्नच दिसत असल्याने त्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देसिद्धनाथपूर सुन्न : शोकमग्न वातावरणात अंतिमसंस्कार

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : दोन महिन्यांपूर्वी आजोबा देवाघरी गेले. त्या धक्क्याने आजी वारली. या दु:खाची सल कमी होते ना होते तोच पित्याच्या रूपाने असलेला घराचा आधारवड कोसळला. आता जगायचे कसे अन् कुणासाठी? घरातील दहाही डोळे शून्यात हरवले आहेत. आभाळभर दु:खाने अश्रूही सुकले आहेत. डोळे आणि देहबोलीतून एकच आर्त हाक उठते आहे - तुम्ही असे करायला नको होते बाबा!अंगावर शहारे आणणारी ही स्थिती झाली आहे सिद्धनाथपूर येथील सुधाकर महादेव पाटेकर (४७) यांच्या चार मुलांची. ओल्या दुष्काळाने सर्व स्वप्नांचा चुराडा केला. सुधाकर पाटेकर यांची तीन व वडिलांच्या नावे असलेली तीन अशी एकूण सहा एकर कोरडवाहू शेती कुटुंबात आहे. त्यात पेरलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सोयाबीन कुजले. हाती-मुठी जे आले, त्याला भाव नाही. अशा अस्मानी व सुलतानी संकटांनी बेजार झालेल्या सुधाकर यांनी इहयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. समोरच केवळ प्रश्नच दिसत असल्याने त्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. या निर्णयाने राणी, छकुली, वैशाली या तीन मुलींच्या पाठीवर झालेला चिमुकला अंश पोरका झाला. पतीच्या आत्महत्येनंतर चार मुलांना सांभाळण्याचे दिव्य वर्षा पाटेकर यांना पार पाडावे लागणार आहे.दरम्यान, विष प्राशनानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या सुधाकर पाटेकर यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात नातेवाइकांनी आणले. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर गावात आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास पाटेकर या चुलतभावाने त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. सारे गाव शोकसागरात बुडाले. नवरात्रात वडील महादेवराव वारले. पाठोपाठ दिवाळीच्या आदल्या दिवशी आई विमलाबाईचाही मृत्यू झाला. आधीच कर्जबाजारीपणा व त्यात नातेवाइकांकडून वडिलाच्या आजारासाठी घेतलेली उसनवारी, घरी लग्नाची मुलगी, त्यात परतीच्या पावसाने सोयाबीन कुजून खराब झाले. आता पुढे काय, या प्रश्नाने ते सर्व सैरभैर झाले आहेत.हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन परतीच्या पावसाने खराब झाले. शेतकरी पार खचून गेला आहे. अद्यापही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही.- मनोहरराव पाटेकर,शेतकरी, सिद्धनाथपूर.परतीच्या पावसाने शेतकºयाच्या शेतातील सोयाबीन कुजले. त्या कुजलेल्या सोयाबीनला भाव नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने ही घटना घडली.- सिद्धार्थ किर्दक,सिद्धनाथपूर

टॅग्स :Deathमृत्यू