शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

संत्राबागांत फळगळीने उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे यात कोट्यावधीचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : व्यापाऱ्यांकडून दिले जातात पडतीचे भाव

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांमागील संकटाची मालिका अव्याहत सुरू आहे. खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी उशिरा आलेल्या व आता परतीच्या पावसाने पळविले असतानाच, संत्राउत्पादक शेतकरीही परतीच्या पावसामुळे हवालदिल झाले आहेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे.तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे यात कोट्यावधीचे नुकसान होत आहे.पाऊस पडण्याआधी बऱ्यांपैकी असलेले भाव आता शेतकऱ्यांची पडती पाहून ३० हजार रुपये टन एवढ्या नीचांकीवर आले आहेत. फळगळती सुरूच असल्यामुळे वाचलेली फळे तात्काळ विकण्याशिवाय पर्याय शेतकºयांपुढे उरला नाही. अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना शेतकरी करीत असल्याचे मत पाळा येथील शेतकरी नरेंद्र जिचकार यांनी व्यक्त केले आहे.उष्णतेच्या प्रकोपाने आधीच फळगळती झाली होती. वाचलेल्या मालाचे पैसे होेतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. काही शेतकºयांनी फळपिकांचा विमा उतरविला आहे. त्याची नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे. वाळलेल्या संत्रा झाडांच्या भरपाईचीही शेतकºयांना प्रतीक्षाच आहे. खरीपात सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटले असताना संत्र्यावर शेतकरी, मजुराची भिस्त होती. शासनाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी तसेच विमा भरपाईबाबतही व्यापक जनजागृती शासनाने करावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.दरम्यान, विदर्भाच्या कॅलिफोर्नियाच्या पाचवीला पुजलेला संकटांचा फेरा कायम आहे. गत उन्हाळ्यात भूगर्भात पाणीच नसल्याने संत्राबागा मरणपंथाला लागल्या होत्या. आता अतिरिक्त पावसाचा फटका बसला आहे.