शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

संत्राबागांत फळगळीने उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे यात कोट्यावधीचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : व्यापाऱ्यांकडून दिले जातात पडतीचे भाव

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांमागील संकटाची मालिका अव्याहत सुरू आहे. खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी उशिरा आलेल्या व आता परतीच्या पावसाने पळविले असतानाच, संत्राउत्पादक शेतकरीही परतीच्या पावसामुळे हवालदिल झाले आहेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे.तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे यात कोट्यावधीचे नुकसान होत आहे.पाऊस पडण्याआधी बऱ्यांपैकी असलेले भाव आता शेतकऱ्यांची पडती पाहून ३० हजार रुपये टन एवढ्या नीचांकीवर आले आहेत. फळगळती सुरूच असल्यामुळे वाचलेली फळे तात्काळ विकण्याशिवाय पर्याय शेतकºयांपुढे उरला नाही. अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना शेतकरी करीत असल्याचे मत पाळा येथील शेतकरी नरेंद्र जिचकार यांनी व्यक्त केले आहे.उष्णतेच्या प्रकोपाने आधीच फळगळती झाली होती. वाचलेल्या मालाचे पैसे होेतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. काही शेतकºयांनी फळपिकांचा विमा उतरविला आहे. त्याची नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे. वाळलेल्या संत्रा झाडांच्या भरपाईचीही शेतकºयांना प्रतीक्षाच आहे. खरीपात सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटले असताना संत्र्यावर शेतकरी, मजुराची भिस्त होती. शासनाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी तसेच विमा भरपाईबाबतही व्यापक जनजागृती शासनाने करावी, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.दरम्यान, विदर्भाच्या कॅलिफोर्नियाच्या पाचवीला पुजलेला संकटांचा फेरा कायम आहे. गत उन्हाळ्यात भूगर्भात पाणीच नसल्याने संत्राबागा मरणपंथाला लागल्या होत्या. आता अतिरिक्त पावसाचा फटका बसला आहे.