शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. चा ४० ते ५० कोटी निधी परत जाणार!

By admin | Updated: April 12, 2017 02:13 IST

स्थायीची बैठक गाजणार : बांधकामसह सर्वच विभागांना फटका

अकोला: जिल्हा परिषदेचाa निधी खर्च ३१ मार्च रोजी थांबवण्याचा फटका केवळ बांधकाम विभागालाच नव्हे तर जवळपास सर्वच विभागांना बसत आहे. त्यातून सर्व योजनांचा मिळून ४० ते ५० कोटी रुपये निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीतीने गाळण उडालेल्या काही अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेत ठाण मांडले. सुरुवातीला जिल्हा परिषदेचा निधी खर्चाची समस्या केवळ बांधकाम विभागापुरती असल्याचा भास निर्माण झाला होता; मात्र आता अखर्चित राहणाऱ्या निधीबाबतचा ताळमेळ जसा पुढे येईल, त्यातून अनेक विभागाचा निधी परत जात असल्याचे स्पष्ट होत आहे. विविध लेखाशीर्षाखाली असलेले किमान ४० ते ५० कोटी रुपये शासनाकडे जाणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये समाजकल्याणच्या दलित वस्ती योजनेतून विकास कामे, शिष्यवृत्ती, शिक्षण विभागाचा उपस्थिती भत्ता, कर्मचाऱ्यांची वेतनेतर देयकांसाठी प्राप्त निधीही पंचायत समिती स्तरावर वाटप झालेला नाही. त्याचीही मुदत ३१ मार्च असते. त्यामुळे हा निधी अखर्चित राहिल्यास त्याची जबाबदारी कुणाची, हा प्रश्नही आता पुढे येत आहे. त्यासाठीच मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातील अधिकारी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात उपस्थित होते. स्थायीच्या अधिकारांचे उल्लंघन गाजणार आजजिल्हा परिषद अधिनियमातील कलम १०९ मध्ये स्थायी समितीचे अधिकार निश्चित आहेत. त्यातील परिच्छेद तीननुसार अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या खर्चावर पर्यवेक्षण करण्याचा अधिकार आहे. त्यापुढे कामाची प्रगती, त्यावर खर्चाचा नियत कालावधीत आढावा घेईल; मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी नागर यांनी तसा अहवाल सादरच केलेला नाही. त्याच्या कार्यकाळात कधीही स्थायी समितीपुढे दर तिमाही जमाखर्चाचे विवरणपत्र ठेवून मंजुरी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या लेखा संहितेमध्ये कलम ६० नुसारही स्थायी समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे; मात्र अर्थ किंवा स्थायी समितीपुढे सादरच केले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच अखर्चित रकमांचा घोळ वाढला आहे.