शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

जि.प. चा ४० ते ५० कोटी निधी परत जाणार!

By admin | Updated: April 12, 2017 02:13 IST

स्थायीची बैठक गाजणार : बांधकामसह सर्वच विभागांना फटका

अकोला: जिल्हा परिषदेचाa निधी खर्च ३१ मार्च रोजी थांबवण्याचा फटका केवळ बांधकाम विभागालाच नव्हे तर जवळपास सर्वच विभागांना बसत आहे. त्यातून सर्व योजनांचा मिळून ४० ते ५० कोटी रुपये निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीतीने गाळण उडालेल्या काही अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेत ठाण मांडले. सुरुवातीला जिल्हा परिषदेचा निधी खर्चाची समस्या केवळ बांधकाम विभागापुरती असल्याचा भास निर्माण झाला होता; मात्र आता अखर्चित राहणाऱ्या निधीबाबतचा ताळमेळ जसा पुढे येईल, त्यातून अनेक विभागाचा निधी परत जात असल्याचे स्पष्ट होत आहे. विविध लेखाशीर्षाखाली असलेले किमान ४० ते ५० कोटी रुपये शासनाकडे जाणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये समाजकल्याणच्या दलित वस्ती योजनेतून विकास कामे, शिष्यवृत्ती, शिक्षण विभागाचा उपस्थिती भत्ता, कर्मचाऱ्यांची वेतनेतर देयकांसाठी प्राप्त निधीही पंचायत समिती स्तरावर वाटप झालेला नाही. त्याचीही मुदत ३१ मार्च असते. त्यामुळे हा निधी अखर्चित राहिल्यास त्याची जबाबदारी कुणाची, हा प्रश्नही आता पुढे येत आहे. त्यासाठीच मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातील अधिकारी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात उपस्थित होते. स्थायीच्या अधिकारांचे उल्लंघन गाजणार आजजिल्हा परिषद अधिनियमातील कलम १०९ मध्ये स्थायी समितीचे अधिकार निश्चित आहेत. त्यातील परिच्छेद तीननुसार अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या खर्चावर पर्यवेक्षण करण्याचा अधिकार आहे. त्यापुढे कामाची प्रगती, त्यावर खर्चाचा नियत कालावधीत आढावा घेईल; मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी नागर यांनी तसा अहवाल सादरच केलेला नाही. त्याच्या कार्यकाळात कधीही स्थायी समितीपुढे दर तिमाही जमाखर्चाचे विवरणपत्र ठेवून मंजुरी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या लेखा संहितेमध्ये कलम ६० नुसारही स्थायी समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे; मात्र अर्थ किंवा स्थायी समितीपुढे सादरच केले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच अखर्चित रकमांचा घोळ वाढला आहे.