शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

यंदाही केंद्रीय पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:09 IST

अकोला: दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रीय पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे गतवर्षीपासून अकोल्यात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यात आले होते. त्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी याविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. माध्यमिक शिक्षण विभागाची २८ मे रोजी सकाळी ११ वाजता रालतो विज्ञान महाविद्यालयात बैठक होणार आहे.

अकोला: दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रीय पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गतवर्षी केंद्रीय प्रवेश पद्धतीला अकोला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाही याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाची २८ मे रोजी सकाळी ११ वाजता रालतो विज्ञान महाविद्यालयात बैठक होणार आहे.गुणांची स्पर्धा वाढल्यामुळे दर्जेदार व नामांकित महाविद्यालयांमध्ये कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना सहजासहजी प्रवेश मिळत नाही. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी हजारो रुपये डोनेशन मागितल्या जाते आणि प्रवेशपत्रासाठी विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट केल्या जाते. राज्यात अनेक ठिकाणी अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केल्यामुळे अकोल्यातसुद्धा एनएसयूआय, अभाविपने केंद्रीय प्रवेश पद्धती राबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार गतवर्षीपासून अकोल्यात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यात आले होते. त्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी याविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. काही शिकवणी वर्ग संचालकांचे कनिष्ठ महाविद्यालये असल्यामुळे आपल्याच शिकवणी वर्गातील मुलांना ते महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास सांगत होते. या प्रवेश पद्धतीमुळे त्यांच्या या प्रकाराला चाप बसला होता. त्यामुळे यंदा ही प्रवेश पद्धती राबवून अकरावी विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने मनपा क्षेत्रातील प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक बोलाविली आहे. त्यांनी बैठकीला येताना विहित प्रपत्रामध्ये माहिती भरून आणावी, मुख्याध्यापक, प्राचार्यांनी बैठकीला उपस्थित न राहिल्यास आणि अकरावी विज्ञान प्रवेशाबाबतचे प्रपत्र जमा न केल्यास त्यांची कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेमध्ये नोेंद करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक