शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

यंदाही शाळांना वृक्षारोपणासाठी १० हजार खड्ड्यांचे ‘टार्गेट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:38 IST

अकोला : जमिनीची वाढलेली धूप, ग्लोबल वार्मिंगचा परिणाम आणि पर्यावरणाच्या ढासळत्या असमतोलामुळे मनुष्याला फटका बसत आहे. दुष्काळी परिस्थिती, अवकाळी ...

अकोला: जमिनीची वाढलेली धूप, ग्लोबल वार्मिंगचा परिणाम आणि पर्यावरणाच्या ढासळत्या असमतोलामुळे मनुष्याला फटका बसत आहे. दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस हा सर्व परिणाम वृक्षांची होत असलेल्या अवैध कत्तलीमुळे होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने यंदा पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षीप्रमाणे वृक्षारोपण मोहिमेमध्ये माध्यमिक शिक्षण विभागसुद्धा सहभागी होणार असून, त्यांतर्गत माध्यमिक शाळांना १0 हजारांवर खड्डे खोदण्याचे ‘टार्गेट’ देण्यात येणार आहे.राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सर्वच शासकीय विभाग सहभागी होणार आहेत. १ ते ३१ जुलैदरम्यान पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागसुद्धा सहभागी होणार असून, त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाला गतवर्षीप्रमाणेच यंदासुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक माध्यमिक शाळेला २0 खड्डे खोदण्याचे टार्गेट देण्यात येणार आहे. शाळांनी जुलै महिन्यातील वृक्षारोपण मोहिमेच्या दृष्टिकोनातून नियोजन करून खड्डे खोदण्याचे काम सुरू करावे, खोदलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. दिलेले टार्गेट प्रत्येक शाळेने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार यांनी केले आहे. या खड्ड्यांमध्ये शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थी व शिक्षकांच्या नावे वृक्षारोपण करण्यात येणार आहे, तसेच या वृक्षांच्या देखभालीचीसुद्धा जबाबदारी शाळांवर सोपविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा