शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

World Environment Day : अकोलेकरांचा श्वास कोंडतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:06 IST

एकीकडे वाढत्या तापमानाची समस्या असतानाच धूळ व ध्वनी प्रदुषणही वाढतेच आहे. त्यामुळे अकोलेकरांचा श्वास कोंडत असल्याचे चित्र आहे.

अकोला : अकोला शहराचे वाढते तापमान हे जगप्रसिद्ध ठरत आहे. या उन्हाळ््यात लागोपाठ दोन वेळा अकोल्याच्या तापमानाने जगात उच्चांक गाठला. एकीकडे वाढत्या तापमानाची समस्या असतानाच धूळ व ध्वनी प्रदुषणही वाढतेच आहे. त्यामुळे अकोलेकरांचा श्वास कोंडत असल्याचे चित्र आहे.अकोल्याचे तापमान १०० वर्षापर्यंत तपासले असता ४७.८ अंश सेल्सिअस दिसत नाही. तथापि, यावर्षी हे कमाल तापमान एप्रिल व मे महिन्यात वाढले. ग्लोबल वॉर्मिंग तर आहेच; पण या मागची येथील कारणे तपासली तर मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड हे कारण पुढे येते.गावातील, रस्त्याच्या कडेची, शेताच्या बांधावरील वृक्ष गायब झाली आहेत. दुसरे म्हणजे वेगाने होणारे शहरांचे सिमेंटीकरण, मोटारीची वाढलेली संख्या त्यातून निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन, घरातील, वाहनातील वातानुकूलित यंत्र, रेफ्रीजेटर आदी तापमान वाढीला कारणीभूत ठरत आहे. या सर्वांचा परिणाम पावसावर झाल्याने आणखी मोठा धोका आपण तयार केला आहे. राज्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. तथापि, वृक्ष नंतर जातात कोठे, याचा शोध कागदावरच असतो. दरम्यान, विकास ही निरंतर प्रक्रिया असल्याने तसे नियोजन करू न पुढच्या ५० वर्षांची गरज बघून रस्ते व इतर विकास कामे गरजेचे आहे.

झाडे किती लावली?

  • अकोला महापालिकेला गेल्यावर्षी १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट होते. त्यापैकी महापालिकेने ग्रीन झोनमध्ये ११ हजार ४७६ झाडे लावली.
  •  
  • ३३ कोटी वृक्ष लागवड या महत्वाकांक्षी योजनेत गेल्यावर्षी जिल्ह्याने उद्दीष्टपूर्ती केल्याचे जिल्हा प्रशासनाचा अहवाल स्पष्ट करते.
  •  
  • ‘अमृत योजने’अंतर्गत महापालिकेच्या क्षेत्रात १३ ग्रीन झोन कार्यांन्वित असून, त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ’
  •  
  • यावर्षी महापालिकेला २0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. आजपर्यंत १३ हजार खड्डे खोदण्यात आले आहेत.

 

प्रशासन काय उपाय करतेय?३३ कोटी वृक्ष लागवड शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यावर्षी येत्या जुलैमध्ये वृक्ष लागवड करावयाची आहे. वृक्ष अंतर्गत अकोला जिल्ह्याला ६२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.कन्या बाल समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबात कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांना वृक्ष लागवडीसाठी १० वृक्ष मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामीण स्तरावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शहरी स्तरावर नगरपालिकेने यादी तयार करून सामाजिक वनीकरण विभागाला देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.कॉर्बन उत्सर्जन, ग्रीन हाऊसेस, वाहनांचा वाढलेला वापर, शहर, रस्त्याचे सिमेंटीकरण, पर्यावरणला घातक ठरत आहेत. अकोलासारख्या जिल्ह्यात वृक्ष संपदेचा ºहास तापमानात भर घालत आहे.- डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,

फळे, औषधी गुणधर्मयुक्त झाडे गावांमध्ये लावली तर त्यांचे संवर्धन करण्यात नागरिकांना जास्त स्वारस्य असते. त्यामुळे अशा झाडांचेच गावांमध्ये रोपण करावे, जेणेकरून ती वाचण्याची शक्यता अधिक राहील. झाडांसोबत भावनिक संबंध जोपासल्या गेले, तर ती झाडे जगण्याची शक्यता अधिक असते.- ए. एस. नाथन,संस्थापक, भारत वृक्ष क्रांती 

टॅग्स :World Environment DayWorld Environment Daypollutionप्रदूषणAkolaअकोला