शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर शेतात काम; पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 10:49 IST

Farmer News भारनियमनामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी सिंचन करीत असल्याचे चित्र आहे.

- रवी दामोदर

अकोला : यंदा बळीराजाला खरीप हंगामात अति पावसाचा फटका बसला असून, रब्बी हंगामात पिके वाचविण्यासाठी शेतकरी दररोज आव्हानांचा सामना करीत आहे. पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटांशी दोन हात करावे लागत आहेत. भारनियमनामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी सिंचन करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषी पंपांना रात्री वीजपुरवठा केल्या जात असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबल्यानंतर, पुन्हा रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जागरण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद पिकावर अज्ञात व्हायरसने आक्रमण केल्याने पीक नष्ट झाले. त्यानंतर परतीच्या पावसामुळे सोयाबीनची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. कपाशीत्या पिकावर आशा होती; मात्र बोंडअळीने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात असतानाही पैशांची जुळवाजुळव करून रब्बी हंगामात पेरणी केली. सद्यास्थितीत गहू, हरभरा, कांदा पिके बहरलेली आहेत. चांगले उत्पादन व्हावे, यासाठी शेतकरी दिवसभर शेतात राबत असल्याचे चित्र आहे. सद्यास्थितीत गहू कमरेेएवढा झाला आहे. तसेच शेतात मोठमोठ्या भेगा, जिकडे तिकडे अंधारच अंधार असतानाही बॅटरीच्या उजेडात शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे. शेतकरी सकाळपासून शेतात राबूनही रात्री त्याच उमेदीने, त्याच इच्छाशक्तीने पिकाला पाणी देत असल्याचे दिसून येत आहे.

पावला पावलावर धोका!

शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये सरपटणारे प्राणी यांचा धोका कायम शेतकऱ्यांच्या मानगुटीवर राहतो. तसेच सद्यस्थितीत गहू पीक कमरेएवढे झाल्याने वन्य प्राणी दिसून येत नाहीत. पाणी शेवट्याच्या सरीतून पिकांपर्यंत पोहोचते का, याकडे लक्ष देतानाच रानडुकरांची भीती अधिक असते.

आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीजपुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. कृषी पंपांना सातही दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा.

- शुभम दामोदर, शेतकरी, टाकळी खुरेशी, ता. बाळापूर.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्याची परंपरा आहे. सध्या पिके वाढल्याने रात्रीचा धोका वाढला आहे. त्यामुळे शासनाने ही परंपरा मोडीत काढीत कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करावा. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊ.

- धनंजय दांदळे, उपसभापती, पं.स. बाळापूर.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेतीmahavitaranमहावितरण