शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर शेतात काम; पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 10:49 IST

Farmer News भारनियमनामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी सिंचन करीत असल्याचे चित्र आहे.

- रवी दामोदर

अकोला : यंदा बळीराजाला खरीप हंगामात अति पावसाचा फटका बसला असून, रब्बी हंगामात पिके वाचविण्यासाठी शेतकरी दररोज आव्हानांचा सामना करीत आहे. पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटांशी दोन हात करावे लागत आहेत. भारनियमनामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी सिंचन करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषी पंपांना रात्री वीजपुरवठा केल्या जात असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबल्यानंतर, पुन्हा रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जागरण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद पिकावर अज्ञात व्हायरसने आक्रमण केल्याने पीक नष्ट झाले. त्यानंतर परतीच्या पावसामुळे सोयाबीनची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. कपाशीत्या पिकावर आशा होती; मात्र बोंडअळीने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात असतानाही पैशांची जुळवाजुळव करून रब्बी हंगामात पेरणी केली. सद्यास्थितीत गहू, हरभरा, कांदा पिके बहरलेली आहेत. चांगले उत्पादन व्हावे, यासाठी शेतकरी दिवसभर शेतात राबत असल्याचे चित्र आहे. सद्यास्थितीत गहू कमरेेएवढा झाला आहे. तसेच शेतात मोठमोठ्या भेगा, जिकडे तिकडे अंधारच अंधार असतानाही बॅटरीच्या उजेडात शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे. शेतकरी सकाळपासून शेतात राबूनही रात्री त्याच उमेदीने, त्याच इच्छाशक्तीने पिकाला पाणी देत असल्याचे दिसून येत आहे.

पावला पावलावर धोका!

शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये सरपटणारे प्राणी यांचा धोका कायम शेतकऱ्यांच्या मानगुटीवर राहतो. तसेच सद्यस्थितीत गहू पीक कमरेएवढे झाल्याने वन्य प्राणी दिसून येत नाहीत. पाणी शेवट्याच्या सरीतून पिकांपर्यंत पोहोचते का, याकडे लक्ष देतानाच रानडुकरांची भीती अधिक असते.

आठवड्यातून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा, असे वीजपुरवठ्याचे वेळापत्रक असल्याने रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत आहे. कृषी पंपांना सातही दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा.

- शुभम दामोदर, शेतकरी, टाकळी खुरेशी, ता. बाळापूर.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्याची परंपरा आहे. सध्या पिके वाढल्याने रात्रीचा धोका वाढला आहे. त्यामुळे शासनाने ही परंपरा मोडीत काढीत कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करावा. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊ.

- धनंजय दांदळे, उपसभापती, पं.स. बाळापूर.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेतीmahavitaranमहावितरण