शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

नक्षलवादावरून शहरी डोकी भडकविण्याचे काम - अ‍ॅड. आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:25 IST

अकोला: सरकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुढे करून शहरी नागरिकांची डोकी भडकविण्याचे काम मोदी, फडणवीस करीत आहेत.

अकोला: सरकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुढे करून शहरी नागरिकांची डोकी भडकविण्याचे काम मोदी, फडणवीस करीत आहेत. हत्यारे सापडलेल्या सनातन्यांवर कारवाई करण्यातही कुचराई केली जात आहे, हा दुटप्पीपणा समजून आता नागरिकांनी देशाला वाचविण्यासाठी सरकारला धडा शिकवायला हवा, असे आवाहन भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. शासकीय विश्रामगृहात शनिवारी सायंकाळी त्यांनी विविध मुद्यांवर पत्रकारांना माहिती दिली.शहरी नक्षलवादी म्हणून मुंबई पोलिसांनी कारवाई केलेल्या लोकांकडे कोणतेच हत्यार सापडलेले नाही. त्याचवेळी सनातन्यांकडे बंदुका, बॉम्ब, हत्यारे सापडली. त्यांना पाठीशी घातले जात आहे. आतापर्यंत सापडलेले सर्व हत्यारधारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाले आहेत. त्यांच्या हत्यारांचाही लोकांवर परिणाम होत नाही, असे दिसत असल्याने शहरी नक्षलवादाची संकल्पना मांडली जात आहे, तर हत्यार न सापडलेल्यांना शहरी नक्षलवादी म्हणून नागरिकांची डोकी भडकविली जात आहेत. शहरी नक्षलवादी कोण आहेत, हे न ठरविताच नक्षलवादाचा मुद्दा लोकांपुढे नेला जात आहे. हा प्रकार मोदी, फडणवीस यांना वेडाचे झटके आल्यासारखा आहे, असा घणाघातही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.देशात सर्वच स्तरावर ब्लॅकमेलिंगची राजनीती सुरू आहे. ५०० कोटींपर्यंत मालमत्ता असलेल्या ७५ हजार कुटुंबांनी देश सोडून इतर देशात स्थायिक होणे पसंत केले आहे. सरकारच्या जाचाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्या कुटुंबांना स्थानिक पोलीस, आयकर विभाग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालयाकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी देश सोडल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, सिद्धार्थ सिरसाट, पराग गवई, पुरुषोत्तम अहिर, महादेव सिरसाट व विलास जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 शहरातील भाजप फायनान्सवरही कारवाईभाजपला अर्थ पुरवठा करणाºया अकोल्यातील एकावर काही दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाकडून कारवाई करण्यात आली. त्यातून संबंधिताला दमबाजीही करण्यात आली. या दमबाजीच्या राजकारणाने देशाचे नुकसान होत आहे. जे ७५ हजार कुटुंबे देशाबाहेर गेले, त्यांनी देशातील संपत्ती विकली. त्याचे रूपांतर डॉलरमध्ये केले. त्यामुळे डॉलरचा तुटवडा निर्माण झाला.परिणामी, डॉलरची किंमत वाढली. त्यातूनही देशाचे नुकसान झाल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

१२ मतदारसंघांची मागणीकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षाशी युती व्हावी, ही आमची भूमिका आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसकडे ३७ जागांवर प्रभावी उमेदवार नाहीत. त्यापैकी केवळ १२ जागांची आमची मागणी आहे. आमचा कोणताही उमेदवार निवडणूक न लढताही आघाडीसाठी तयार आहे; मात्र अजेंड्यावर बोलणी करण्यासाठी कोणीही तयार नसल्याची वस्तुस्थिती आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ