शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शेतकऱ्यांनी बंद  पाडले नया अंदुरा प्रकल्पाचे काम; प्रकल्पस्थळीच उपोषणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:44 IST

नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले.

ठळक मुद्दे२२० शेतकऱ्यांची ८५० एकर जमीन संपादित केल्या जात असून, बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत.परिसरातील ४५०० एकर शेतजमिनीवर सिंचन होणार आहे; मात्र आतापर्यंत प्रकल्पाची किंमत ५० कोटींवरून २१२ कोटी रुपये झाली आहे. मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम बंद आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.

नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले. तसेच प्रकल्पस्थळीच शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रकल्पस्थळी शुकशुकाट होता.नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पासाठी २०११ ते २०१३ या कालावधीत संपादित जमिनीला दोन लाख रुपये एवढाच अल्पदराने मोबदला मिळाला. या प्रकल्पबाधित कास्तकारांना २०१७-२०१८ च्या नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे वाढीव ८ ते १० लाख रुपये मोबदला द्यावा, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २ एप्रिलपासून सुरू केलेले उपोषण जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या लेखी प्रस्तावामुळे ३ एप्रिल रोजी संध्याकाळी उपोषण स्थगित केले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णय पूर्ण न झाल्यामुळे अखेर नया अंदुरा प्रकल्पच्या ठिकाणी जाऊन १७ एप्रिल रोजी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाचे काम बंद पाडून प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणास बसले.नया अंदुरा प्रकल्पात कारंजा रम., अंत्री मलकापूर, उरळ बु., उरळ खु. या गावांतील २२० शेतकऱ्यांची ८५० एकर जमीन संपादित केल्या जात असून, बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत. परिसरातील ४५०० एकर शेतजमिनीवर सिंचन होणार आहे; मात्र आतापर्यंत प्रकल्पाची किंमत ५० कोटींवरून २१२ कोटी रुपये झाली आहे. प्रकल्पाची किंमत दरवर्षी वाढत असताना अल्पदराने जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना वाढीव दर का नाही, असा संतप्त सवालही कास्तकारांनी उपस्थित केला आहे. जमिनीचा वाढीव भाव मिळावा, शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरी, पेन्शन योजना किंवा एकरकमी १० लाख रुपये द्यावे, बाळापूरचे उपविभागीय अधिकाºयांनी १.५ चा गुणांक लावून खरेदी केलेल्या त्या नवीन शासन परिपत्रकाप्रमाणे २ चा गुणांक लावून खरेदी कराव्यात, आधी पुनर्वसन मगच धरण, याप्रमाणे प्रकल्पबाधित घरांचे तत्काळ पुनर्वसन करून नवीन घरे बांधून देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम बंद आंदोलन व उपोषण सुरू केले आहे; मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणाचे ‘काम बंद’ आंदोलन व उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकºयांनी केला आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणBalapurबाळापूर