शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेतकऱ्यांनी बंद  पाडले नया अंदुरा प्रकल्पाचे काम; प्रकल्पस्थळीच उपोषणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:44 IST

नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले.

ठळक मुद्दे२२० शेतकऱ्यांची ८५० एकर जमीन संपादित केल्या जात असून, बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत.परिसरातील ४५०० एकर शेतजमिनीवर सिंचन होणार आहे; मात्र आतापर्यंत प्रकल्पाची किंमत ५० कोटींवरून २१२ कोटी रुपये झाली आहे. मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम बंद आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.

नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले. तसेच प्रकल्पस्थळीच शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रकल्पस्थळी शुकशुकाट होता.नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पासाठी २०११ ते २०१३ या कालावधीत संपादित जमिनीला दोन लाख रुपये एवढाच अल्पदराने मोबदला मिळाला. या प्रकल्पबाधित कास्तकारांना २०१७-२०१८ च्या नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे वाढीव ८ ते १० लाख रुपये मोबदला द्यावा, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २ एप्रिलपासून सुरू केलेले उपोषण जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या लेखी प्रस्तावामुळे ३ एप्रिल रोजी संध्याकाळी उपोषण स्थगित केले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णय पूर्ण न झाल्यामुळे अखेर नया अंदुरा प्रकल्पच्या ठिकाणी जाऊन १७ एप्रिल रोजी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाचे काम बंद पाडून प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणास बसले.नया अंदुरा प्रकल्पात कारंजा रम., अंत्री मलकापूर, उरळ बु., उरळ खु. या गावांतील २२० शेतकऱ्यांची ८५० एकर जमीन संपादित केल्या जात असून, बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत. परिसरातील ४५०० एकर शेतजमिनीवर सिंचन होणार आहे; मात्र आतापर्यंत प्रकल्पाची किंमत ५० कोटींवरून २१२ कोटी रुपये झाली आहे. प्रकल्पाची किंमत दरवर्षी वाढत असताना अल्पदराने जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना वाढीव दर का नाही, असा संतप्त सवालही कास्तकारांनी उपस्थित केला आहे. जमिनीचा वाढीव भाव मिळावा, शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरी, पेन्शन योजना किंवा एकरकमी १० लाख रुपये द्यावे, बाळापूरचे उपविभागीय अधिकाºयांनी १.५ चा गुणांक लावून खरेदी केलेल्या त्या नवीन शासन परिपत्रकाप्रमाणे २ चा गुणांक लावून खरेदी कराव्यात, आधी पुनर्वसन मगच धरण, याप्रमाणे प्रकल्पबाधित घरांचे तत्काळ पुनर्वसन करून नवीन घरे बांधून देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम बंद आंदोलन व उपोषण सुरू केले आहे; मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणाचे ‘काम बंद’ आंदोलन व उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकºयांनी केला आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणBalapurबाळापूर