शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बंद  पाडले नया अंदुरा प्रकल्पाचे काम; प्रकल्पस्थळीच उपोषणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:44 IST

नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले.

ठळक मुद्दे२२० शेतकऱ्यांची ८५० एकर जमीन संपादित केल्या जात असून, बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत.परिसरातील ४५०० एकर शेतजमिनीवर सिंचन होणार आहे; मात्र आतापर्यंत प्रकल्पाची किंमत ५० कोटींवरून २१२ कोटी रुपये झाली आहे. मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम बंद आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.

नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले. तसेच प्रकल्पस्थळीच शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रकल्पस्थळी शुकशुकाट होता.नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पासाठी २०११ ते २०१३ या कालावधीत संपादित जमिनीला दोन लाख रुपये एवढाच अल्पदराने मोबदला मिळाला. या प्रकल्पबाधित कास्तकारांना २०१७-२०१८ च्या नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे वाढीव ८ ते १० लाख रुपये मोबदला द्यावा, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २ एप्रिलपासून सुरू केलेले उपोषण जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या लेखी प्रस्तावामुळे ३ एप्रिल रोजी संध्याकाळी उपोषण स्थगित केले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णय पूर्ण न झाल्यामुळे अखेर नया अंदुरा प्रकल्पच्या ठिकाणी जाऊन १७ एप्रिल रोजी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाचे काम बंद पाडून प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणास बसले.नया अंदुरा प्रकल्पात कारंजा रम., अंत्री मलकापूर, उरळ बु., उरळ खु. या गावांतील २२० शेतकऱ्यांची ८५० एकर जमीन संपादित केल्या जात असून, बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत. परिसरातील ४५०० एकर शेतजमिनीवर सिंचन होणार आहे; मात्र आतापर्यंत प्रकल्पाची किंमत ५० कोटींवरून २१२ कोटी रुपये झाली आहे. प्रकल्पाची किंमत दरवर्षी वाढत असताना अल्पदराने जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना वाढीव दर का नाही, असा संतप्त सवालही कास्तकारांनी उपस्थित केला आहे. जमिनीचा वाढीव भाव मिळावा, शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरी, पेन्शन योजना किंवा एकरकमी १० लाख रुपये द्यावे, बाळापूरचे उपविभागीय अधिकाºयांनी १.५ चा गुणांक लावून खरेदी केलेल्या त्या नवीन शासन परिपत्रकाप्रमाणे २ चा गुणांक लावून खरेदी कराव्यात, आधी पुनर्वसन मगच धरण, याप्रमाणे प्रकल्पबाधित घरांचे तत्काळ पुनर्वसन करून नवीन घरे बांधून देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नया अंदुरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम बंद आंदोलन व उपोषण सुरू केले आहे; मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणाचे ‘काम बंद’ आंदोलन व उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकºयांनी केला आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणBalapurबाळापूर