शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लोकमत बांधावर : सोयाबीनला कोंब पाहून महिला शेतकरी बेशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:30 IST

दिग्रस बु. येथील महिला शेतकरी जिजाबाई त्र्यंबक गवई या ५ नोव्हेंबर रोजी दुपारी शेतातच बेशुद्ध पडल्या होत्या.

- राहुल सोनोने लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु : चांगले उत्पादन होईल, या आशेने कृ षी सेवा केंद्रातून उधारीत बियाणे आणून पेरणी केली. दमदार असलेली पिके काढणीला आलेला असताना परतीचा पाऊस झाला. या पावसाने होत्याचे नव्हते केले. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला जागेवरच कोंब फुटले. ही विदारक स्थिती पाहून दिग्रस बु. येथील महिला शेतकरी जिजाबाई त्र्यंबक गवई या ५ नोव्हेंबर रोजी दुपारी शेतातच बेशुद्ध पडल्या होत्या. पिकाची झालेली अवस्था पाहून उधारीसह कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न दिग्रस बु. परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.दिग्रस बु. येथील गोपाळ त्र्यंबक गवई यांच्याकडे ५ एकर शेती आहे. त्यांनी कृषी सेवा केंद्रातून ५५ हजारांचे खत, बियाणे, औषधी उधारीत पेरणी केली होती. पाच एकरात त्यांनी सोयाबीन, कपाशी लावली होती. गोपाल गवई यांचा उदरनिर्वाह पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. शेती मशागतीसाठी खर्च लागला. पिके चांगल्या स्थितीत असल्याने त्यांना उधारीसह कर्ज फेडू अशी आस होती; मात्र गेल्या २० दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोंगलेले सोयाबीन त्यांना घरी आणता आले नाही. सोयाबीनची सोंगणी करून त्यांनी शेतातच जुळ््या लावल्या होत्या. दोन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने मंगळवारी जिजाबाई गवई या आपल्या मुलाबरोबर शेत पहायला गेल्या होत्या. तेथे सोयाबीनला फुटलेले कोंब पाहून त्या जमिनवर बेशुद्ध होऊन कोसळल्या. तर पिकाची स्थिती पाहून गोपाळ गवई यांच्या डोळ्यात पाणी आले. आधीच पिकासाठी कर्ज झालेले असताना त्यांना आईवर उपचार करावे लागले. उत्पन्न झाले नसल्याने मुलांचे शिक्षण, घर खर्च कसा भागवावा असा प्रश्न गवई कुटुंबासमोर पडला आहे. गवई यांना दरवर्षी दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पादन होत होते. यावर्षी परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.उपचारासाठीही पैसे नव्हतेशेतातील पिकांची नासाडी पाहून जिजाबाई गवई यांना भोवळ आली. त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारासाठी गोपाळ गवई यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे उसणे घेऊन त्यांनी आईवर उपचार केले. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने पंचनामे न करता तातडीने मदत देण्याची गरज आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती