शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत बांधावर : सोयाबीनला कोंब पाहून महिला शेतकरी बेशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:30 IST

दिग्रस बु. येथील महिला शेतकरी जिजाबाई त्र्यंबक गवई या ५ नोव्हेंबर रोजी दुपारी शेतातच बेशुद्ध पडल्या होत्या.

- राहुल सोनोने लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु : चांगले उत्पादन होईल, या आशेने कृ षी सेवा केंद्रातून उधारीत बियाणे आणून पेरणी केली. दमदार असलेली पिके काढणीला आलेला असताना परतीचा पाऊस झाला. या पावसाने होत्याचे नव्हते केले. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला जागेवरच कोंब फुटले. ही विदारक स्थिती पाहून दिग्रस बु. येथील महिला शेतकरी जिजाबाई त्र्यंबक गवई या ५ नोव्हेंबर रोजी दुपारी शेतातच बेशुद्ध पडल्या होत्या. पिकाची झालेली अवस्था पाहून उधारीसह कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न दिग्रस बु. परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.दिग्रस बु. येथील गोपाळ त्र्यंबक गवई यांच्याकडे ५ एकर शेती आहे. त्यांनी कृषी सेवा केंद्रातून ५५ हजारांचे खत, बियाणे, औषधी उधारीत पेरणी केली होती. पाच एकरात त्यांनी सोयाबीन, कपाशी लावली होती. गोपाल गवई यांचा उदरनिर्वाह पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. शेती मशागतीसाठी खर्च लागला. पिके चांगल्या स्थितीत असल्याने त्यांना उधारीसह कर्ज फेडू अशी आस होती; मात्र गेल्या २० दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोंगलेले सोयाबीन त्यांना घरी आणता आले नाही. सोयाबीनची सोंगणी करून त्यांनी शेतातच जुळ््या लावल्या होत्या. दोन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने मंगळवारी जिजाबाई गवई या आपल्या मुलाबरोबर शेत पहायला गेल्या होत्या. तेथे सोयाबीनला फुटलेले कोंब पाहून त्या जमिनवर बेशुद्ध होऊन कोसळल्या. तर पिकाची स्थिती पाहून गोपाळ गवई यांच्या डोळ्यात पाणी आले. आधीच पिकासाठी कर्ज झालेले असताना त्यांना आईवर उपचार करावे लागले. उत्पन्न झाले नसल्याने मुलांचे शिक्षण, घर खर्च कसा भागवावा असा प्रश्न गवई कुटुंबासमोर पडला आहे. गवई यांना दरवर्षी दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पादन होत होते. यावर्षी परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.उपचारासाठीही पैसे नव्हतेशेतातील पिकांची नासाडी पाहून जिजाबाई गवई यांना भोवळ आली. त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारासाठी गोपाळ गवई यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे उसणे घेऊन त्यांनी आईवर उपचार केले. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने पंचनामे न करता तातडीने मदत देण्याची गरज आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती